शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

संरक्षणासाठी चक्क रस्त्यात लावले झाड

By admin | Updated: April 8, 2015 00:33 IST

खड्डा ठरतोय कर्दनकाळ : वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी सदर बजार येथील नागरिकांचा पुढाकार; उपाययोजनेची मागणी

सातारा : नागरी सुविधांसाठी अनेकवेळा आंदोलने केली जातात. त्यामध्ये रास्ता रोको, मोर्चा, निदर्शन तर कधी रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारापोणही केले जाते. यामुळे अनेकदा आंदोलनकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु येथील समाजकल्याण कार्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून सदर बजार येथील नागरिकांनी एकत्र येवून वाहनधारकांच्या संरक्षणासाठी या खड्ड्यात चक्क झाड उभे केले.सदर बजार येथील समाजकल्याण कार्यालयालगत गेल्या दोन महिन्यांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. गळतीमुळे नुकताच डांबरीकरण केलेला रस्ताही उखडला आहे. पाईपलाईनला लागलेल्या सततच्या गळतीमुुळे याठिकाणी रस्त्यावर सुमारे तीन फुुट व्यासाचा व दोन फुट खोलीचा खड्डा पडला आहे. दिवसभर या खड्ड्यातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचली आहेत. वाहत्या पाण्यामुळे डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता उघडण्याची शक्यता नाकारात येत नाही. दरम्यान जलवाहिनी फुटलेल्या खड्ड्यात दिवसभर पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. प्रामुुख्याने रात्रीच्या वेळी या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. नुकतेच मध्यरात्री एक महागडे चारचाकी वाहन या खड्ड्यात आदळून दुभाजकाला धडकले होते. त्यामुळे या वाहनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही नुुकसान भरपाई कोणाकडे मागायची? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या समस्येमुळे वाहनधारकांच्या संरक्षणासाठी सदर बजार येथील नागरिकांनी पुढाकार घेवून रस्त्यात पडलेल्या या खड्ड्यात चक्क एक झाड उभे केले. जेणेकरून रात्रीच्या वेळी अपघात होणार नाहीत. रस्त्यात लावलेल्या या झाडामुळे वाहनचालकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी संबंधित विभागाने या बाबीकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)हजारो लीटर पाणी वायागेल्या एक महिन्यापासून या रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागली आहे. गळतीमुळे रस्ताही उखडला आहे. सदर बजारच्या पूर्व भागात नागरिकांना अजुुनही मुबलक पाणी मिळत नाही. मात्र, या रस्त्यावर दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तरीदेखील संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर बजारकडे जाणारा हा मुख्य मार्ग असून या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे जलवाहिनीची गळती काढने गरजेचे आहे.- विकास धुमाळ, नागरिक