शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

संरक्षणासाठी चक्क रस्त्यात लावले झाड

By admin | Updated: April 8, 2015 00:33 IST

खड्डा ठरतोय कर्दनकाळ : वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी सदर बजार येथील नागरिकांचा पुढाकार; उपाययोजनेची मागणी

सातारा : नागरी सुविधांसाठी अनेकवेळा आंदोलने केली जातात. त्यामध्ये रास्ता रोको, मोर्चा, निदर्शन तर कधी रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारापोणही केले जाते. यामुळे अनेकदा आंदोलनकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु येथील समाजकल्याण कार्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून सदर बजार येथील नागरिकांनी एकत्र येवून वाहनधारकांच्या संरक्षणासाठी या खड्ड्यात चक्क झाड उभे केले.सदर बजार येथील समाजकल्याण कार्यालयालगत गेल्या दोन महिन्यांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. गळतीमुळे नुकताच डांबरीकरण केलेला रस्ताही उखडला आहे. पाईपलाईनला लागलेल्या सततच्या गळतीमुुळे याठिकाणी रस्त्यावर सुमारे तीन फुुट व्यासाचा व दोन फुट खोलीचा खड्डा पडला आहे. दिवसभर या खड्ड्यातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचली आहेत. वाहत्या पाण्यामुळे डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता उघडण्याची शक्यता नाकारात येत नाही. दरम्यान जलवाहिनी फुटलेल्या खड्ड्यात दिवसभर पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. प्रामुुख्याने रात्रीच्या वेळी या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. नुकतेच मध्यरात्री एक महागडे चारचाकी वाहन या खड्ड्यात आदळून दुभाजकाला धडकले होते. त्यामुळे या वाहनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही नुुकसान भरपाई कोणाकडे मागायची? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या समस्येमुळे वाहनधारकांच्या संरक्षणासाठी सदर बजार येथील नागरिकांनी पुढाकार घेवून रस्त्यात पडलेल्या या खड्ड्यात चक्क एक झाड उभे केले. जेणेकरून रात्रीच्या वेळी अपघात होणार नाहीत. रस्त्यात लावलेल्या या झाडामुळे वाहनचालकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी संबंधित विभागाने या बाबीकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)हजारो लीटर पाणी वायागेल्या एक महिन्यापासून या रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागली आहे. गळतीमुळे रस्ताही उखडला आहे. सदर बजारच्या पूर्व भागात नागरिकांना अजुुनही मुबलक पाणी मिळत नाही. मात्र, या रस्त्यावर दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तरीदेखील संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर बजारकडे जाणारा हा मुख्य मार्ग असून या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे जलवाहिनीची गळती काढने गरजेचे आहे.- विकास धुमाळ, नागरिक