शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

वारीसाठी दुचाकीवर औषधोपचाराचे किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:54 IST

सातारा : पालखी तळावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी व तंबू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचणे अवघड होते. त्यासाठी यंदा नव्याने आरोग्यदूत ही संकल्पना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राबविणार आहे. प्रत्येक आरोग्यदुताकडे दुचाकी व त्यावर एक वैद्यकीय अधिकारी औषधोपचार किटसह तैनात असणार आहे.आरोग्यदुताला ओळखण्यासाठी विशिष्ट गणवेश व दुचाकीला स्टिकर लावण्यात येणार आहे. ...

सातारा : पालखी तळावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी व तंबू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचणे अवघड होते. त्यासाठी यंदा नव्याने आरोग्यदूत ही संकल्पना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राबविणार आहे. प्रत्येक आरोग्यदुताकडे दुचाकी व त्यावर एक वैद्यकीय अधिकारी औषधोपचार किटसह तैनात असणार आहे.आरोग्यदुताला ओळखण्यासाठी विशिष्ट गणवेश व दुचाकीला स्टिकर लावण्यात येणार आहे. आरोग्यदुताला उपचार व आवश्यक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना त्वरित आरोग्यसेवा व उपचार मुक्कामी ठिकाणी मिळणार आहेत. त्यासाठी आरोग्यदुतांच्या २० टीम पालखी मार्गावर कार्यरत राहणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १३ जुलै रोजी लोणंद येथे आगमन होणार आहे. १७ जुलैपर्यंत सोहळा पंढरपूर दिशेने सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार आहे.जिल्ह्यामध्ये लोणंद, तरडगाव, फलटण, बरड असे चार मुक्काम आहेत. वारकºयांना साथीच्या आजारांना सामना करावा लागू नये म्हणून पालखी मार्गावरील पाण्याचे स्त्रोत व पाणीसाठ्यातील पाण्याचे नमुन्यांची अनुजैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात आली आहे. ब्लिचिंग पावडरद्वारे विहिरीतील पाण्याचे व टँकरमध्ये भरण्यात येणाºया पाण्याचे शुद्धीकर करण्यात येणार आहे. वारी मार्गावर १२ आरोग्य फिरते पथकाद्वारे उपचार करण्यात येणार आहेत. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक पुरेशा औषणसाठ्यांसहीत पालखी मार्गावर तैनात करण्यात येणार आहे.३८५ विहिरींचे होणार शुद्धीकरणनियमित पाणी शुद्ध करण्यासाठी एक आरोग्य सहायक, दोन आरोग्य सेवक यांचे एक पथक असून, पालखी मार्गावर ३८५ विहिरी ३३ पथकाद्वारे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. तसेच १८ टँकर भरण्याच्या ठिकाणाचे १८ पथकाद्वारे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे वारकºयांच्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली आहेत.