शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

स्वातंत्र्याच्या बहात्तरीनंतरही आबालवृद्धांचा झोळीतून प्रवास- पाठरवाडीतील अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:01 IST

तांबवे : रस्ता हे दळणवळणाचे विकासातील मुख्य साधन आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या बहात्तरीनंतर अजूनही डोंगरावर वसलेल्या पाठरवाडी गावाला रस्ताच नाही. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान भैरवनाथ देवस्थान म्हणून प्रसिद्ध

ठळक मुद्देरस्त्याअभावी ग्रामस्थांची पायपीट; सोसतायंत मरणयातना

दीपक पवार ।तांबवे : रस्ता हे दळणवळणाचे विकासातील मुख्य साधन आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या बहात्तरीनंतर अजूनही डोंगरावर वसलेल्या पाठरवाडी गावाला रस्ताच नाही. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान भैरवनाथ देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाठरवाडीकरांची रस्त्याअभावी सध्या परवडच सुरू आहे. येथील आबालवृद्धांना झोळीतून प्रवास करावा लागतोय तर पावसाळ्यात येथील लोक मरणयातनाच सोसतात.

पुढारलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील कºहाडसारख्या सधन तालुक्यातील पाठरवाडीकरांनी अनेकदा गावाच्या रस्त्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, शासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.तांबवे गावच्या पश्चिमेकडील डोंगरावर पाठरवाडी गाव वसले आहे. गमेवाडी ग्रामपंचायतीचा एक भाग म्हणून पाठरवाडी गणली जाते. तेथे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलदैवत भैरवनाथाचे मोठे मंदिर आहे. तेथे यात्रेसाठी दरवर्षी मोठी गर्दी असते. मात्र संबंधित भाविकांना दरवर्षी देवदर्शनासाठी पाठरवाडीच्या डोंगरावर पायी चालत जावे लागते. त्यामुळे त्यांचे मोठी अडचण होते.त्याचबरोबर पाठरवाडीला रस्ता नसल्याने तेथील आबालवृध्दांना दैनंदिन व्यवहारासह, शिक्षण, आरोग्याच्या सेवांसाठी डोंगर उतरून खाली असलेल्या तांबवे येथे ये-जा करावे लागते. महिलांचा प्रसूती किंवा वयोवृद्ध महिला, पुरुष आजारी पडल्यावर त्यांना पाळणा किंवा झोळीतून खांद्यावरून डोंगर उतरून खाली आणावे लागते व परत वर न्यावे लागते. गावच्या रस्त्यासाठी अनेकांकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडेकोणीही लक्ष द्यायला तयार नाही. ३०० ते ४०० लोकसंख्या असलेल्याया वाडीगावाच्या रस्त्याच्या प्रतीक्षेत सध्या पाठरवाडी ग्रामस्थआहेत.बिबट्याचीनेहमीच दहशतपाठरवाडी हे डोंगरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गाव आहे. तेथे गडद झाडी असल्याने त्या परिसरात असलेल्या वाघधुंडी गुहेत बिबट्याचे कायमच वास्तव्य असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी पाठरवाडीत जाताना किंवा पहाटेच्यावेळी पाठरवाडीचा डोंगर उतरून खाली येत असताना विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना बिबट्याची चांगलीच धास्ती असते. अनेकदा बिबट्याचे राजरोस दर्शन होत असल्याने त्याच्या दहशतीतीच जीव मुठीत धरून लोकांना तेथे राहावे लागते.विद्यार्थ्यांचा दररोजपायी प्रवासपाठरवाडीतून शाळेसाठी दररोज येथील विद्यार्थ्यांना पाऊलवाटेने खाली यावे लागते. पावसाळा, हिवाळा तसेच उन्हाळा अशा तिन्हीही ऋतूत विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निमाण होते.मुलांच्यालग्नाचा प्रश्नपाठरवाडी हे साठ ते सत्तर हुंबरा असलेले गाव आहे. तेथील मुलांना शाळेसाठी दररोज डोंगरातील पाऊलवाटेने प्रवास करावा लागतो. शिक्षण घेऊन मोठे झाल्यावर नोकरी लागली तरी हे गाव डोंगरावर वसलेले असल्यामुळे येथील अनेक मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. का तर गावाला रस्ता नाही. नोकरी नसलेल्यांची तर फारच वाईट स्थिती आहे.आमच्या गावाला अनेक वर्षांपासून रस्त्याची समस्या हाय. एखादी महिला आजारी फडली तर तिला झोळीतून आणावं लागत. गरदोर महिलाची तर लयच वाईट अवस्था होते. काही वेळा अनेक महिलांना आपल्या जीवाला मुकावं लागलं हाय. कुठेही सरकार आलं तरी आम्हाकडं कुणाचं लक्ष न्हाय. स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली तरी रस्ता नाही.- रुक्मिणी यादवगृहिणी, पाठरवाडी,ता. कºहाडपाठरवाडी, ता. कºहाड येथे रस्त्याअभावी वयोवृद्धांना ग्रामस्थांकडून उपचारासाठी झोळीतून न्यावे लागत आहे.