शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

गरीब रथने प्रवास म्हणजे आजही सुरक्षेची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

सातारा : जिल्ह्यातील जावळीचं दुर्गम खोरं, महाबळेश्वरच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या दऱ्या-खोऱ्या असो वा पाटणमधील घनदाट जंगल राज्य परिवहन महामंडळाची ...

सातारा : जिल्ह्यातील जावळीचं दुर्गम खोरं, महाबळेश्वरच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या दऱ्या-खोऱ्या असो वा पाटणमधील घनदाट जंगल राज्य परिवहन महामंडळाची एस.टी.बस त्या-त्या ठिकाणी पोहोचली आहे. अनेक भागात वाहन चालवताना चालकाची थोडी नजर चुकली तरी अपघात झालाच म्हणून समजा. तरीही जिल्ह्यात अपघाताच्या केवळ ३३ घटना घडल्या. त्यामुळे एस.टी.ने प्रवास म्हणजे सुरक्षा हे पुन्हा अधोरेखित झाले.

राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील शेकडो गाड्या राज्यभरात धावत असतात. यामधून हजारो प्रवाशांची ने-आण केली जाते. रस्त्यावर वाहन चालविणे म्हटल्यावर घात-अपघात आलेच. कधी चालकाच्या चुकांमुळे, कधी तांत्रिक बिघाडामुळे, तर काही वेळेस समोरील वाहन येऊन धडकल्यामुळे अपघात होत असतात. तरीही अपघात घडूच नयेत म्हणून एस.टी. महामंडळाकडून अनेक योजना राबविल्या जातात. विनाअपघात सेवा बजावलेल्या चालकांचा गौरव केला जातो. त्यांच्यासाठी खास बिल्ला दिला जातो. तो बिल्ला छातीवर लावून फिरणे अभिमानास्पद मानले जाते.

सातारा जिल्ह्यातील अनेक भाग दुर्गम आहे. त्यामुळे अपघात घडतच असतात. सातारा विभागात गेल्या वर्षभरात अपघातांच्या ३३ घटना घडल्या आहेत. यामध्ये ११ अपघात किरकोळ, तर १३ अपघात गंभीर स्वरुपाचे झाले आहेत. यात नऊजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा तालुका आघाडीवर आहे. यामध्ये आठ अपघात झाले आहेत. एस.टी.च्या चुकीमुळे अपघात होऊन कोणी जखमी झाल्यास तातडीने उपचारासाठी मदत दिली जाते. तसेच मृतांच्या नातेवाइकांनाही मदत केली जाते.

चौकट

जिल्ह्यातील एसटी चालक : १५८६

विनाअपघात एसटी चालविली म्हणून सत्कार

दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा : २८

पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा : २५

मागील वर्षात झालेले एसटीचे अपघात

सातारा ८

कऱ्हाड ५

महाबळेश्वर ५

कोरेगाव - २

फलटण - ३

वाई - ३

पाटण -

दहिवडी - १

मेढा - २

खंडाळा - ३

वडूज - १

सत्तरला स्पीड लॉक

उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने महामार्गावर सरासरी वेग मर्यादा ऐंशी केली आहे. तरी सातारा विभागातील अनेक गाड्या सत्तरच्या आसपासच लॉक केल्या आहेत. त्यामुळे चालकाने कितीही एसटी पळविण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. सातारा जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी होण्यामागील हेही एक कारण मानले जाते.

चालकांचे कौतुक

राज्य परिवहन महामंडळाचे चालक नेहमीच आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. पाठीमागे चाळीस माणसं बसलेली आहेत, याचे भान ठेवून वाहन चालवितात. त्यामुळे अपघात कमी होतात. विनाअपघात सेवा बजावलेल्यांचे नेहमीच कौतुक केले जाते.

- सागर पळसुले,

विभाग नियंत्रक, सातारा.

कोट :

रस्त्यावरील अवस्था, पादचाऱ्यांचा विचार करावा लागतो. त्यांना एसटीपासून त्रास होऊ नये. समोरुन येणारे वाहन कसे येणार हे सांगता येत नाही. त्यामुळे सातत्याने लक्ष ठेवावे लागते. घाई करून चालत नाही.

- नीलेश मेश्राम

चालक, मेढा आगार.

आयकार्ड फोटो