शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

गरीब रथने प्रवास म्हणजे आजही सुरक्षेची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

सातारा : जिल्ह्यातील जावळीचं दुर्गम खोरं, महाबळेश्वरच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या दऱ्या-खोऱ्या असो वा पाटणमधील घनदाट जंगल राज्य परिवहन महामंडळाची ...

सातारा : जिल्ह्यातील जावळीचं दुर्गम खोरं, महाबळेश्वरच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या दऱ्या-खोऱ्या असो वा पाटणमधील घनदाट जंगल राज्य परिवहन महामंडळाची एस.टी.बस त्या-त्या ठिकाणी पोहोचली आहे. अनेक भागात वाहन चालवताना चालकाची थोडी नजर चुकली तरी अपघात झालाच म्हणून समजा. तरीही जिल्ह्यात अपघाताच्या केवळ ३३ घटना घडल्या. त्यामुळे एस.टी.ने प्रवास म्हणजे सुरक्षा हे पुन्हा अधोरेखित झाले.

राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील शेकडो गाड्या राज्यभरात धावत असतात. यामधून हजारो प्रवाशांची ने-आण केली जाते. रस्त्यावर वाहन चालविणे म्हटल्यावर घात-अपघात आलेच. कधी चालकाच्या चुकांमुळे, कधी तांत्रिक बिघाडामुळे, तर काही वेळेस समोरील वाहन येऊन धडकल्यामुळे अपघात होत असतात. तरीही अपघात घडूच नयेत म्हणून एस.टी. महामंडळाकडून अनेक योजना राबविल्या जातात. विनाअपघात सेवा बजावलेल्या चालकांचा गौरव केला जातो. त्यांच्यासाठी खास बिल्ला दिला जातो. तो बिल्ला छातीवर लावून फिरणे अभिमानास्पद मानले जाते.

सातारा जिल्ह्यातील अनेक भाग दुर्गम आहे. त्यामुळे अपघात घडतच असतात. सातारा विभागात गेल्या वर्षभरात अपघातांच्या ३३ घटना घडल्या आहेत. यामध्ये ११ अपघात किरकोळ, तर १३ अपघात गंभीर स्वरुपाचे झाले आहेत. यात नऊजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा तालुका आघाडीवर आहे. यामध्ये आठ अपघात झाले आहेत. एस.टी.च्या चुकीमुळे अपघात होऊन कोणी जखमी झाल्यास तातडीने उपचारासाठी मदत दिली जाते. तसेच मृतांच्या नातेवाइकांनाही मदत केली जाते.

चौकट

जिल्ह्यातील एसटी चालक : १५८६

विनाअपघात एसटी चालविली म्हणून सत्कार

दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा : २८

पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा : २५

मागील वर्षात झालेले एसटीचे अपघात

सातारा ८

कऱ्हाड ५

महाबळेश्वर ५

कोरेगाव - २

फलटण - ३

वाई - ३

पाटण -

दहिवडी - १

मेढा - २

खंडाळा - ३

वडूज - १

सत्तरला स्पीड लॉक

उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने महामार्गावर सरासरी वेग मर्यादा ऐंशी केली आहे. तरी सातारा विभागातील अनेक गाड्या सत्तरच्या आसपासच लॉक केल्या आहेत. त्यामुळे चालकाने कितीही एसटी पळविण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. सातारा जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी होण्यामागील हेही एक कारण मानले जाते.

चालकांचे कौतुक

राज्य परिवहन महामंडळाचे चालक नेहमीच आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. पाठीमागे चाळीस माणसं बसलेली आहेत, याचे भान ठेवून वाहन चालवितात. त्यामुळे अपघात कमी होतात. विनाअपघात सेवा बजावलेल्यांचे नेहमीच कौतुक केले जाते.

- सागर पळसुले,

विभाग नियंत्रक, सातारा.

कोट :

रस्त्यावरील अवस्था, पादचाऱ्यांचा विचार करावा लागतो. त्यांना एसटीपासून त्रास होऊ नये. समोरुन येणारे वाहन कसे येणार हे सांगता येत नाही. त्यामुळे सातत्याने लक्ष ठेवावे लागते. घाई करून चालत नाही.

- नीलेश मेश्राम

चालक, मेढा आगार.

आयकार्ड फोटो