शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
4
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
5
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
6
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
7
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
8
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
9
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
10
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
11
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
12
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
13
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
14
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
15
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
16
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
17
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
18
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
19
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पर्यटकांचे रिक्षातून भारतभ्रमण

By admin | Updated: January 7, 2015 23:26 IST

ये जिंदगी ना मिलेगी दोबारा : भुर्इंजमधील मिसळचा यथेच्छ पाहुणचार

भुर्इंज : आयर्लंडमधील एक तरुण व तीन तरुणी आॅटोरिक्षातून भटकंती करत आहेत. केरळहून राजस्थानकडे जाताना या चौघांनी भुर्इंजमध्ये यथेच्छ पाहुणचार घेत आपल्या या अनोख्या रिक्षाप्रवासाची माहितीही ‘लोकमत’शी दिली. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील मित्रांच्या भटकंतीची आठवण करून देणारी परदेश तरुण-तरुणींची भटकंती मंगळवार, दि. ६ रोजी भुर्इंजकरांनी अनुभवली. रिक्षातून भटकंती करणारे हे परदेशी पाहुणे भुर्इंज परिसरात चर्चेचा विषय ठरले. पूर्व आयर्लंडच्या किलडेअर येथील रॉस मॅकमॅहन या तरुणासह मध्य आयर्लंडमधील आओफ डोहरसी, पूर्व आयर्लंडमधील विकलो येथील मायरेड डोहरसी, पश्चिम आयर्लंडमधील नाईम्ह फेगारसी या तीन तरुण गेली पंधरा दिवस भारतभ्रमण करत आहेत. या रिक्षातून हे चौघे केरळ, कर्नाटक आणि गोवा पाहून आता महाराष्ट्रात आले आहेत. येथून ते गुजरातमार्गे राजस्थानला जाणार आहेत. हे चौघेही इंजिनिअर असून, बीएमस, लिंक्टन, सिमेन्स, स्ट्रायकर अशा नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. हे चौघे कॉलेज जीवनातील मित्र असून, आयुष्य वाचविण्यासाठी ते भारत दौऱ्यावर पर्यटनासाठी आले आहेत. भारत अधिक जवळून पाहता यावा, यासाठी त्यांनी रिक्षातून प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यात त्यांना भारताबद्दल अतिशय चांगले अनुभव आले आहेत. येथील अन्नपदार्थांची तर त्यांना भुरळच पडली आहे. मसाला डोसा, पनीर, आलूपालक, हैद्राबादी बिर्याणी अशी अस्सल भारतीय पदार्थांची नावे धडाधड सांगत त्यांनी भुर्इंजमधील एका हॉटेलमध्ये झणझणीत मिसळवर यथेच्छ ताव मारला. भारतीय फूड ‘स्पायसी’ असले तरी ‘डिलिशियस’ आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. रिक्षासारखी बंद पडत असल्याने प्रवासात व्यत्यय येत असला तरीही भारतातील लोक प्रेमळ असून, मदत करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)अतिथी देवो भव : रिक्षातून आलेल्या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. सुरुवातीला त्यांना येथे संवाद साधताना खूपच अडचणी आल्या. काही हॉटेलमधून ते भाषेच्या अडचणीमुळे बाहेरही पडले. मात्र, राजन जाधवराव यांनी त्यांचा उडालेला गोंधळ पाहून त्यांच्याशी इंग्रजीमधून संवाद साधला आणि नंतर या परदेशी तरुणांना भुर्इंजकरांच्या अतिथी देवो भव: या भावनेची प्रचिती आली. आओफ डोहरसी, मायरेड, नाईम्ह फेगारसी या तिघींनंी भारतीय जेवण, निसर्गसौंदर्य खूपच छान असून, येथील गाई खूपच आवडल्याचे सांगितले. रॉस याने भारताबद्दल जेवढं वाचलं होते, त्यापेक्षा भारत कितीतरी पटीने सुंदर देश असल्याचे सांगितले.