शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाहतूक पोलिसांची गांधीगिरी..!

By admin | Updated: February 12, 2015 00:37 IST

सुरक्षेचा संदेश : स्वत:पासून हेल्मेट वापरण्यास सुरुवात; जनजागृतीच्या दिशेने एक पाऊल पुढे

सातारा : स्वसंरक्षणसाठी दुचाकीधारकांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, दुचाकीधारक या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चक्क वाहतूक पोलिसांनी स्वत:पासून सुरुवात करून नित्यनियमाने हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली आहे.शासनाने हेल्मेट सक्ती केली असली तरी जिल्ह्यात अजूनही हेल्मेटच्या वापराबाबतत उदासीनता दिसून येत आहे. याला वाहनचालकांची मानसिकता जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. हीच मानसिकता बदलण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी स्वत:पासून सुरुवात केली आहे. वाहतूक पोलीस आता हेल्मेटशिवाय बाहेर पडत नाहीत. विशेष म्हणजे, वाहतूक शाखेने चक्क हेल्मेटचा वापर न करणाऱ्या आपल्याच सहकाऱ्यावर कारवाई करून हेल्मेट किती नितांत गरजेचे आहे, याची शिस्त घालून दिली आहे. या कारवाईची धास्ती घेऊन पोलिसांनी आता स्वत:च्या सुरक्षेसाठी व इतरांना सुरक्षेबाबत जागृत करण्यासाठी डोक्यावर हेल्मेट परिधान केले आहे.काही कर्मचाऱ्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने हेल्मेट देण्यात आले आहेत. तर काहीनी स्वत: हेल्मेट विकत घेतली आहे. एका बाजूला पोलीस प्रशासन सुरक्षेबाबत सतर्क होत असताना इतर नागरिक मात्र याबाबत अजूनही उदासीन आहेत. काही वाहनचालक केवळ पोलिसांचा दंड चुकविण्यासाठी हेल्मेटचा वापर करतात. मात्र, असे न करता स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेऊन ‘आपले आयुष्य आपल्या हाती’ या योजनेत सहभागी व्हावे, एवढीच अपेक्षा पोलिसांची आहे. (प्रतिनिधी)न वापरण्याचे तोटे धुळीमुळे श्वसनाचे विकार डोळ्यांना त्रासहवेचा कर्ण पलटलांवर परिणामअपघातात डोक्याचा इजा होण्याची अधिक शक्यताअसे झाल्यास स्मृतिभ्रंश होऊ शकतो गंभीर दुखापत असल्यास मृत्यूही होऊ शकतोवापराचे फायदे जिल्ह्यामध्ये वर्षभरात सुमारे दोनशे दुचाकी अपघात झाले असून,अनेक वाहनचालकांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राण गमवावे लागले आहे. मानवी शरीरात मेंदू हा अतिसंवेदनशील घटक आहे. अपघातात डोक्याला इजा झाल्यास मेंदूतून रक्तस्त्राव होतो, तर संबंधित व्यक्तीचा स्मृतिभ्रंश होऊ शकतो. दुखापत गंभीर असल्यास मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेल्मेट वापरामुळे हा धोका टळू शकतो.