शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

साताऱ्यात यंदाही पारंपरिक वाद्ये अन् कृत्रिम तळी !

By admin | Updated: August 7, 2016 01:02 IST

गणेशोत्सव बैठक : सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज; मूर्ती विसर्जनासाठी तळ्यांची निर्मिती

सातारा : गणेशोत्सवाच्या कालावधीत ढोल-ताशा, झांझपथक अशा पारंपरिक वाद्यांना पोलिसांनी अडवणूक करू नये, ऐतिहासिक साताऱ्याची संस्कृती जपण्यासाठी साताऱ्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तयार असल्याची घोषणा शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केली. सामाजिक एकोपा वाढावा, उत्सवाचे पावित्र्य राहावे, या हेतूने पोलिस प्रशासनही सज्ज असल्याची घोषणा पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केली. पोलिस करमणूक केंद्रातील अलंकार हॉलमध्ये ही बैठक पार पडली. उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत प्रकाश मंडळाचे श्रीकांत शेटे, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, सप्ततारा मंडळाचे राजू गोडसे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील काळेकर आदींनी आपली मते मांडली. गणेशमूर्तींच्या उंचीचा मुद्दा श्रीकांत शेटे यांनी उपस्थित केला. मूर्तींची उंची जास्त आणि शहरातील वीज वाहिन्या १० ते १२ फूट उंचीवर अशी परिस्थिती असल्याने अनेकदा धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते. मूर्तींच्या उंचीवर निर्बंध घालावे लागतील. उत्सवातील विविध परवान्यांसाठी ‘एक खिडकी’ योजना तत्काळ सुरू व्हावी तसेच मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उत्सव काळात इतर कामे असल्याने परवाने कमी वेळात मिळावेत, असे मुद्दे शेटे यांनी मांडले. गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तळी तयार केली आहेत. राधिका रस्त्यावर जिल्हा परिषदेची ही तळ्याची जागा नगरपालिकेच्या ताब्यात मिळण्यासाठी प्रयत्न केले जावेत. या तळ्यासाठी जिल्हा नियोजनकडून निधी मिळावा, गणेशोत्सवाच्या काळात बसस्थानक परिसरातील गर्दी वाढते. या परिसरात नव्याने बसस्थानक तयार केले गेले असले तरी ते विक्रेत्यांनी बळकावले आहेत. या मार्गावरून रोज २ हजार विद्यार्थी बाहेरगावाहून साताऱ्यात शिकायला येत असतात, त्यांना चालण्यासाठी फूटपाथही नाही, त्यामुळे प्रशासनाने ही अतिक्रमणे पहिल्यांदा काढून घ्यावीत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना बक्षिसे द्यावीत. राजू गोडसे यांनी ढोल पथकांना पोलिस प्रशासनाकडून विरोध असल्याचा मुद्दा उपस्थित केला. डॉल्बी वाजविणाऱ्यांना ढिल आणि पारंपरिक वाद्ये वाजविणाऱ्यांना बंदी घालण्याचे प्रकार विसर्जन मिरवणुकीवेळी होत असतो. प्रशासनाने हे करू नये, साताऱ्यात संस्कृती जपण्यासाठी वेगळा प्रयोग होत आहे. यासाठी झांज पथकातील कार्यकर्ते कित्येक दिवस आधीपासून त्याचा सराव करत आहेत. त्यामुळे ढोल-ताशे वाजविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत परवानगी देण्यात यावी. यावर उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे यांनी वाहतुकीला अडथळा होत असेल तरच पोलिस संबंधित पथकांना सूचना करतात. इतरवेळी नाही, असे उत्तर दिले. दरम्यान, सदर बझार येथील भारतमाता मंडळाच्या कार्यकर्त्याने झांजपथकांना सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)