शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धोम धरणातील माशांवर विषप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:20 IST

पांडुरंग भिलारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवाई : धोम धरणात मासेमारी करणाऱ्यांनी माशांवर विषप्रयोग केल्याने धरणाच्या चहूबाजूला हजारो मृत माशांचा सडा पडला आहे. धरणातील पाण्यालाही दुर्गंधीयुक्त वास येत आहे. मासेमाºयांकडून पाण्यात गुंगीचे औषध टाकून मासेमारी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून धरणात मासे मृत होण्याच्या घटनेत ...

पांडुरंग भिलारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवाई : धोम धरणात मासेमारी करणाऱ्यांनी माशांवर विषप्रयोग केल्याने धरणाच्या चहूबाजूला हजारो मृत माशांचा सडा पडला आहे. धरणातील पाण्यालाही दुर्गंधीयुक्त वास येत आहे. मासेमाºयांकडून पाण्यात गुंगीचे औषध टाकून मासेमारी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून धरणात मासे मृत होण्याच्या घटनेत वाढ झाली असताना पाटबंधारे विभाग मात्र, अजूनही अनभिज्ञ आहे.धोम धरणातील नौकाविहाराचा ठेका फलटणकरांकडे आहे, तर मासेमारीचा ठेका पाटबंधारे खात्याने पुण्याच्या भाजपच्या खासदारांकडे दिला आहे. दोघांमधील वाद माशांच्या जीवावर बेतल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात सुरू आहे, याआधी असे कधीही झाले नाही. धरणात पाणीच शिल्लक नसल्याने उर्वरित पाण्यातूनच पर्यटक रपेट मारण्यासाठी बोटिंग करतात, त्यामुळे पाणी गढूळ होऊन आत असणाºया माशांचा जीव जात असल्याचे निदर्शनास आले आहे.बोटिंग क्लबजवळ दहा ते पंधरा किलोचे मासे मृतावस्थेत धरणाच्या किनाºयांवर वाहत येत आहेत. त्याला प्रचंड दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने मरून दोन-तीन दिवसांचा कालावधी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे अनेक मासे मृतावस्थेत त्या पाण्यात असण्याची शक्यता आहे. धोम पाटबंधारे खात्याच्या गलथानपणामुळे धरणावर संरक्षणासाठी कोणीही वाली नसल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे.धोम धरणात गेल्या अनेक वर्षांपासून मासेमारी सुरू आहे. मात्र, आजपर्यंत कधीही याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले नव्हते. मासेमारी करणारे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मासेमारी करू लागले आहे. पाण्यात गुंगीचे औषध टाकले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी याचा माशांवर परिणाम होत आहे. एकप्रकारचा हा विषप्रयोग असल्याने जलाशयातील हजारो मासे मृत पावले आहेत. या बाबीपासून अनभिज्ञ असलेल्या पाटबंधारे विभागाने संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा धोम परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.आमदारांनी लक्ष घालावे..धोम धरणात मृत माशांचा चाललेला दुर्दैवी प्रकार अतिशय निंदनीय आहे. पाटबंधारे खात्याला याची पुसटशी कल्पना देखील नाही. त्यामुळे चोरांचे फावले असून, लाखो माशांचा जीव टांगणीला लागला आहे. तरी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मकरंद पाटील यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी मागणी स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे.संसर्गजन्य रोगांच्या फैलावाची शक्यता..मृत मासे बाजारात विक्रीसाठी आल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.निसर्गाचा लहरीपणामुळे पर्यावरणात विविध प्रकारच्या विषाणूंचा शिरकाव होऊन ‘निपाह’सारख्या रोगांना निमंत्रण मिळत आहे.धोम धरणाच्या पाण्यावर लाखो लोकांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याच्या योजना आहेत.गावांना मिळणारे पाणी दूषित मिळाल्यास संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होऊन विविध प्रकारच्या रोगांना निमंत्रण मिळू शकते.