शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

पवारांनी कृषिमंत्री असताना दौरे काढायला हवे होते : शेट्टी

By admin | Updated: August 25, 2015 23:52 IST

सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या हितासाठीच मागण्या राहिल्या आहेत. पवारांच्या काळातच स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याचा विषय झाला होता. मात्र,

सातारा : ‘माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीही केले नाही. मात्र, आता त्याच शेतकऱ्यासाठी ते रस्त्यावर आले आहेत. आपण दहा वर्षांत शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसल्याचे कबूल केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून त्यांना पाठिंबा देईल,’ असे आश्वासन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिले. सातारा येथे पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘स्वाभिमानी संघटनेने नेहमीच शेतकऱ्यांचा विचार करून आंदोलन, मोर्चे, निदर्शने केली आहे. सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या हितासाठीच मागण्या राहिल्या आहेत. पवारांच्या काळातच स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याचा विषय झाला होता. मात्र, त्यांनी या आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत. त्याच आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कृषिमंत्री असताना हे दौरे काढले असते तर शेतकऱ्यांचे काही तरी भले झाले असते.’ शेट्टी म्हणाले, ‘कारखानदारांची परिस्थिती असूनही ‘एफआरपी’ देण्यात आला नाही. यामध्ये कारखानदारांनी राजकारण करून शेतकऱ्याला सरकार विरूध्द भूमिका घेण्यास भाग पाडले जात आहे. ‘एफआरपी’ देण्यासाठी शासनाने ६ हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर करूनही ‘एफआरपी’ देण्यात आलेला नाही. राज्यात २ हजार ९६० कोटी एफआरपी आणि २,०५० कोटी व्याज अशी एकूण रक्कम सहा हजार कोटींच्या घरात आहे. त्यासाठी कारखानदारांनी बँकांमधून कर्ज काढून शेतकऱ्यांची बिले भागवावी.’ आक्रमकतेपेक्षा चर्चेतून प्रश्न सुटतात. या माध्यमातूनच प्रश्न मार्गी लावले जात आहे. एक किंवा दोन वर्षांसाठी शेतकऱ्यांचे नेतृत्व करायचे नसून दीर्घकाळ शेतकऱ्यांचे नेतृत्व करून त्यांच्या हिताचा विचार करणार आहे. यासाठी आक्रमकपणा कमी केला आहे. चर्चेतून मागण्या मान्य केल्या जात आहेत,’असेही यावेळी शेट्टी म्हणाले. (प्रतिनिधी)