शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

पवारांनी कृषिमंत्री असताना दौरे काढायला हवे होते : शेट्टी

By admin | Updated: August 25, 2015 23:52 IST

सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या हितासाठीच मागण्या राहिल्या आहेत. पवारांच्या काळातच स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याचा विषय झाला होता. मात्र,

सातारा : ‘माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीही केले नाही. मात्र, आता त्याच शेतकऱ्यासाठी ते रस्त्यावर आले आहेत. आपण दहा वर्षांत शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसल्याचे कबूल केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून त्यांना पाठिंबा देईल,’ असे आश्वासन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिले. सातारा येथे पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘स्वाभिमानी संघटनेने नेहमीच शेतकऱ्यांचा विचार करून आंदोलन, मोर्चे, निदर्शने केली आहे. सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या हितासाठीच मागण्या राहिल्या आहेत. पवारांच्या काळातच स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याचा विषय झाला होता. मात्र, त्यांनी या आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत. त्याच आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कृषिमंत्री असताना हे दौरे काढले असते तर शेतकऱ्यांचे काही तरी भले झाले असते.’ शेट्टी म्हणाले, ‘कारखानदारांची परिस्थिती असूनही ‘एफआरपी’ देण्यात आला नाही. यामध्ये कारखानदारांनी राजकारण करून शेतकऱ्याला सरकार विरूध्द भूमिका घेण्यास भाग पाडले जात आहे. ‘एफआरपी’ देण्यासाठी शासनाने ६ हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर करूनही ‘एफआरपी’ देण्यात आलेला नाही. राज्यात २ हजार ९६० कोटी एफआरपी आणि २,०५० कोटी व्याज अशी एकूण रक्कम सहा हजार कोटींच्या घरात आहे. त्यासाठी कारखानदारांनी बँकांमधून कर्ज काढून शेतकऱ्यांची बिले भागवावी.’ आक्रमकतेपेक्षा चर्चेतून प्रश्न सुटतात. या माध्यमातूनच प्रश्न मार्गी लावले जात आहे. एक किंवा दोन वर्षांसाठी शेतकऱ्यांचे नेतृत्व करायचे नसून दीर्घकाळ शेतकऱ्यांचे नेतृत्व करून त्यांच्या हिताचा विचार करणार आहे. यासाठी आक्रमकपणा कमी केला आहे. चर्चेतून मागण्या मान्य केल्या जात आहेत,’असेही यावेळी शेट्टी म्हणाले. (प्रतिनिधी)