शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

Satara tourism: कास पर्यटन भारी.. वाहनतळापासून पुष्प पठारापर्यंत प्रवासासाठी खासगीऐवजी हवी लालपरी !

By जगदीश कोष्टी | Updated: July 7, 2025 15:53 IST

प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे

जगदीश कोष्टीसातारा : कास येथील पुष्प पठार हे पर्यावरणप्रेमींसाठी पंढरीच असते. ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत पुष्प पठाराला जवळपास लाख-दीड लाख पर्यटक भेट देतात. पर्यावरण रक्षण आणि पठारावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पठाराच्या अलीकडेच वाहनतळ केलेले असते. वाहनतळावर गाड्या लावून समितीच्या गाडीतून जाणे अपेक्षित आहे. पण त्या गाड्या खासगी आहेत. त्याऐवजी एसटीच्या ई-शिवाई गाड्यांचा पर्याय म्हणून विचार व्हायला हवा.सातारा जिल्ह्याला निसर्गाने दहा हातांनी वरदान भरभरून दिले आहे. महाबळेश्वरमधील असंख्य पॉईंट, सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा, काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या दऱ्या, पाचगणीमधील टेबल लॅण्ड नेहमीच देश भुरळ घातल असते. या भागात असंख्य पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. कास पुष्प पठार हा येथे लाभलेला एक नैसर्गिक चमत्कारच मानला पाहिजे. कारण पठारावर फुलत असलेली फुले अन्यत्र कोठेच उगवत नाहीत. तसेच ठराविक कालावधीनंतर विविध रंगातील, आकारातील, प्रकारातील फुलांचा बहर पाहावयास मिळत असतो. निसर्गाचा हा नजराणा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. यातील ९० टक्के पर्यटक खासगी वाहनांनी येतात. यामुळे प्रदूषण होते. तसेच वाहतूक कोंडीही होत असते. हे टाळण्यासाठी कास समितीकडून खास वाहनांची सोय केली आहे. वाहनतळापासून त्या पठारापर्यंत सोडत असतात.दरवेळी भाड्याची गाडीप्रत्येक हंगामात कास कार्यकारी समिती खासगी वाहतूकदार कंपनीकडून भाडेतत्त्वावर गाड्या घेत असते. त्या गाड्या वाहन तळापासून कासपर्यंत पर्यटकांना पोहोचवणे आणि पुन्हा घेऊन येण्याचे काम करते. पण यामध्ये खासगी कंपनी मोठी होत असते. २०२३ च्या हंगामात कास कार्यकारी समितीने पुण्यातील ई-बसचा वापर केला. पण त्यांचे भाडे परवडणारे नाही.यापूर्वी एसटीच्या मिनी बसकास पुष्प पठाराला आठ ते दहा वर्षांपूर्वी युनोस्कोच्या पथकाने भेट दिली होती. तेव्हा पठारापर्यंत येत असलेल्या गाड्या पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली होती. गाड्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाहनतळ दुसरीकडे ठेवून धूरविरहित गाड्यांतून पर्यटकांना आणण्याचा सल्ला देण्यात आला. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी, एसटीचे अधिकारी अन् कास समितीची बैठक झाली. त्या हंगामात एसटीच्या मिनी बसचा वापर करण्यात आला होता.

प्रदूषणमुक्त गाड्याएसटी ताब्यात सध्या ई-शिवाई तसेच नवीन लालपरी गाड्या आल्या आहेत. या गाड्यांमधून धूरही फार येत नाही. त्यामुळे या गाड्या पर्यावरण पूरक आहेत. त्याचवेळी एसटी तोट्यात आहे म्हणून एकीकडे ओरड करायची आणि दुसरीकडे दररोज हजारो पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करायचा. हे योग्य वाटत नाही. त्यामुळे एसटीचा वापर करावा, अशी मागणी केली जात आहे.शेवटचा पर्यटकही न्यावाकास पठारावरील सेवा दररोज सायंकाळी सहानंतर बंद होते. पण काहीजण पर्यटक, एखादे कुटुंब चुकून उशिरा आले तर ते पठारावरच राहू नये. शेवटच्या पर्यटकाला घेऊन जाण्यासाठी एसटी थांबायला हवी. - ज्ञानेश्वर आखाडे, सदस्य, कास कार्यकारी समिती