शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

Satara tourism: कास पर्यटन भारी.. वाहनतळापासून पुष्प पठारापर्यंत प्रवासासाठी खासगीऐवजी हवी लालपरी !

By जगदीश कोष्टी | Updated: July 7, 2025 15:53 IST

प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे

जगदीश कोष्टीसातारा : कास येथील पुष्प पठार हे पर्यावरणप्रेमींसाठी पंढरीच असते. ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत पुष्प पठाराला जवळपास लाख-दीड लाख पर्यटक भेट देतात. पर्यावरण रक्षण आणि पठारावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पठाराच्या अलीकडेच वाहनतळ केलेले असते. वाहनतळावर गाड्या लावून समितीच्या गाडीतून जाणे अपेक्षित आहे. पण त्या गाड्या खासगी आहेत. त्याऐवजी एसटीच्या ई-शिवाई गाड्यांचा पर्याय म्हणून विचार व्हायला हवा.सातारा जिल्ह्याला निसर्गाने दहा हातांनी वरदान भरभरून दिले आहे. महाबळेश्वरमधील असंख्य पॉईंट, सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा, काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या दऱ्या, पाचगणीमधील टेबल लॅण्ड नेहमीच देश भुरळ घातल असते. या भागात असंख्य पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. कास पुष्प पठार हा येथे लाभलेला एक नैसर्गिक चमत्कारच मानला पाहिजे. कारण पठारावर फुलत असलेली फुले अन्यत्र कोठेच उगवत नाहीत. तसेच ठराविक कालावधीनंतर विविध रंगातील, आकारातील, प्रकारातील फुलांचा बहर पाहावयास मिळत असतो. निसर्गाचा हा नजराणा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. यातील ९० टक्के पर्यटक खासगी वाहनांनी येतात. यामुळे प्रदूषण होते. तसेच वाहतूक कोंडीही होत असते. हे टाळण्यासाठी कास समितीकडून खास वाहनांची सोय केली आहे. वाहनतळापासून त्या पठारापर्यंत सोडत असतात.दरवेळी भाड्याची गाडीप्रत्येक हंगामात कास कार्यकारी समिती खासगी वाहतूकदार कंपनीकडून भाडेतत्त्वावर गाड्या घेत असते. त्या गाड्या वाहन तळापासून कासपर्यंत पर्यटकांना पोहोचवणे आणि पुन्हा घेऊन येण्याचे काम करते. पण यामध्ये खासगी कंपनी मोठी होत असते. २०२३ च्या हंगामात कास कार्यकारी समितीने पुण्यातील ई-बसचा वापर केला. पण त्यांचे भाडे परवडणारे नाही.यापूर्वी एसटीच्या मिनी बसकास पुष्प पठाराला आठ ते दहा वर्षांपूर्वी युनोस्कोच्या पथकाने भेट दिली होती. तेव्हा पठारापर्यंत येत असलेल्या गाड्या पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली होती. गाड्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाहनतळ दुसरीकडे ठेवून धूरविरहित गाड्यांतून पर्यटकांना आणण्याचा सल्ला देण्यात आला. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी, एसटीचे अधिकारी अन् कास समितीची बैठक झाली. त्या हंगामात एसटीच्या मिनी बसचा वापर करण्यात आला होता.

प्रदूषणमुक्त गाड्याएसटी ताब्यात सध्या ई-शिवाई तसेच नवीन लालपरी गाड्या आल्या आहेत. या गाड्यांमधून धूरही फार येत नाही. त्यामुळे या गाड्या पर्यावरण पूरक आहेत. त्याचवेळी एसटी तोट्यात आहे म्हणून एकीकडे ओरड करायची आणि दुसरीकडे दररोज हजारो पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करायचा. हे योग्य वाटत नाही. त्यामुळे एसटीचा वापर करावा, अशी मागणी केली जात आहे.शेवटचा पर्यटकही न्यावाकास पठारावरील सेवा दररोज सायंकाळी सहानंतर बंद होते. पण काहीजण पर्यटक, एखादे कुटुंब चुकून उशिरा आले तर ते पठारावरच राहू नये. शेवटच्या पर्यटकाला घेऊन जाण्यासाठी एसटी थांबायला हवी. - ज्ञानेश्वर आखाडे, सदस्य, कास कार्यकारी समिती