शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Satara: हल्ल्यानंतर काश्मीरचे पर्यटक मिनी काश्मीरकडे!; महाबळेश्वरनगरी स्वागताला सज्ज 

By जगदीश कोष्टी | Updated: April 28, 2025 17:55 IST

आणखी पर्यटक वाढण्याची शक्यता

जगदीश कोष्टीसातारा : काश्मीरला ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ म्हटले जाते. देश-विदेशातून हौसी पर्यटक येथे दरवर्षी जातात. यामध्ये सातारकरांची संख्याही मोठी आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यभरातील असंख्य पर्यटकांनी काश्मीरची सहल रद्द केली आहे. त्यामुळे पर्यटन कंपन्या ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर, तापोळ्याला जाण्याचा त्यांना सल्ला देत आहेत. यामुळे मिनी काश्मीरमधील पर्यटकांची ओघ वाढत आहे.जम्मू-काश्मीर गेल्या काही वर्षांपासून भारतातील जागतिक कीर्तीचे पर्यटन केंद्र बनले होते. उन्हाळ्यात लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. त्यावर तेथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे तेथील तरुण पर्यटकांना देवापेक्षाही वरचे स्थान देतात; पण याच नात्याला कोणाची तरी दृष्ट लागली आणि मंगळवार, दि. २२ रोजी दहशतवाद्यांनी हेरून गोळ्या झाडल्या. यामध्ये २८ जणांचा बळी गेला होता. जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आता कोठे स्वगृही परतू लागले आहेत. त्यांच्याकडून त्यावेळच्या परिस्थितीची आपबिती ऐकूनच येथील नागरिकांची बोबडी वळत आहे. यामुळे अनेक जण नियोजित काश्मीर ट्रीप रद्द करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

उन्हाळा हंगाम सुरूमहाबळेश्वरमध्ये दरवर्षी १५ एप्रिलपासूनच उन्हाळा हंगाम सुरू होतो; पण यंदा राज्य शासनाच्या निर्णयामुळे अनेक शाळांना आता सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे १ तारखेपासून खऱ्या अर्थाने हंगाम सुरू होऊ शकतो.

हॉटेल व्यावसायिक सज्जयेणाऱ्या पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी येथील हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत. त्यांनी पर्यटकांसाठी विविध योजना लागू केली आहे. याबाबत संकेतस्थळावरून माहिती दिली जाते. त्यामुळे बहुसंख्य पर्यटक येथे येण्यापूर्वीच खाणे, पिणे, राहण्याची सोय करून येत असतात.

तीन दिवस महाबळेश्वर महोत्सवमहाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे या कालावधीत होणार आहे. यामुळे पर्यटनवाढीसाठी चालना मिळणार आहे.

येथे आल्यावर हे पाहता येणार

  • किल्ले प्रतापगड
  • महाबळेश्वरमधील २५ हून अधिक निसर्गरम्य ठिकाणे
  • पाचगणी टेबल लॅण्ड
  • तापोळा जलपर्यटन
  • वाईतील महागणपती
  • मेणवली
  • धोम धरणात नौकाविहार

कमवा, पण ओरबडून खाऊ नकामहाबळेश्वरमध्ये हंगामात हॉटेल व्यवसाय खूपच तेजीत असतो. अनेकदा दुप्पट-तिप्पट दर आकारले जातात. हा दर प्रत्येक पर्यटकांना परवडतोच असा नाही. त्यामुळे अनेक पर्यटक वाईमध्ये येऊन मुक्काम करतात. त्यामुळे हॉटेलचालकांनो हॉटेल व्यवसाय करा; पण ओरबाडून खाऊ नका, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

पहलगाम येथील घटनेनंतर जम्मू-काश्मीरकडे जाणाऱ्या काही सहली रद्द झाल्या आहेत. सध्या पर्यटकांचा हिमाचल, महाबळेश्वर तसेच गोव्याकडे जाण्याचा कल वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत ही पर्यटनस्थळे आणखीन गजबजून जाणार आहेत. - नीलम गायकवाड, टूर ऑर्गनायझर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाtourismपर्यटनJammu Kashmirजम्मू-काश्मीर