शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 22:58 IST

टेरीचा अहवाल. वर्षभर पर्यटनासाठी नियोजन आवश्यक

दीपक शिंदे                                                                                                                                                               

सातारा : कास पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. हाच कालावधी याठिकाणची जैवविविधता बहरात येण्याचा असतो. त्यामुळे त्यावर अतिरिक्त पर्यटकांचा विपरीत परिणाम होत असून, काही वनस्पती नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे याठिकाणचे पर्यटन आजूबाजूच्या ठिकाणी विभागले गेले तर स्थानिकांना अधिक फायदा होईल, असा अहवाल कास आव्हाने आणि संधी या विषयावर अभ्यास करणाऱ्या टेरी या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. राज्य आणि केंद्र सरकार तसेच युनेस्कोलाही हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

कास हे जागतिक वारसा केंद्र आहे. याठिकाणी आढळणाऱ्या विविध वनस्पती इतर कोणत्याही भागात आढळत नाहीत. मात्र, मागील काही वर्षात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. २०२० साली कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली होती. मात्र, २०१९ मध्ये एक लाख २ हजार ८५३ पर्यटकांनी भेट दिली होती. यातील ९७ हजार ५५८ पर्यटकांनी फक्त कास पठाराला भेट दिली आहे.

कासच्या आजूबाजूलाही पर्यटनासाठी अनेक चांगल्या जागा आहेत. त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणावर पर्यटन होऊ शकते. याचा विचार करून वर्षभर या भागात कसे पर्यटन राहील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही टेरीने आपल्या अहवालात म्हटले आहे. पर्यावरणाबाबत पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा अहवाल पर्यावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शज्तखाली बनविला आहे. त्यांना रानवाटाचे संदीप श्रोत्री, डॉ. अपर्णा वाटवे, प्रेरणा अग्रवाल, निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे, वनविभाग आणि वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले.

पर्यावरण आणि सुधारणा या दोन विरोधाभास असलेल्या संकल्पना नाहीत तर त्या एकाच बाजूच्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करतच सुधारणा होणे आवश्यक आहेत. तेव्हाच जीवसृष्टीचे योग्य रक्षण होऊ शकेल.- राजेंद्र शेंडे, अध्यक्ष, टेरी

टेरीच्या अहवालातील चार महत्त्वाच्या बाबी१. २०२० मध्ये पर्यटक कमी झाल्याने गवताच्या काही प्रजातींमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

२. गेल्या काही वर्षांपासून कासवर पर्यटकांच्या संख्येमुळे फुलांवर परिणाम झाला आहे. हा परिणाम टाळण्यासाठी पर्यटनावर नियंत्रण असायला हवे आणि फुलांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी निसर्गावर आधारित पर्यटनाला प्राधान्य दिले जावे.

३. पठारावर चराईसाठी येणाऱ्या जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्याचा फुलांच्या फुलण्यावरही परिणाम होत आहे. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करणे आवश्यक आहे.

४. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या मदतीने या भागातील पर्यटन वाढीसाठी आणि स्थानिकांना रोजगार निर्माण होण्यासाठी मदत होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :satara-pcसाताराKas Patharकास पठारtourismपर्यटन