शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 22:58 IST

टेरीचा अहवाल. वर्षभर पर्यटनासाठी नियोजन आवश्यक

दीपक शिंदे                                                                                                                                                               

सातारा : कास पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. हाच कालावधी याठिकाणची जैवविविधता बहरात येण्याचा असतो. त्यामुळे त्यावर अतिरिक्त पर्यटकांचा विपरीत परिणाम होत असून, काही वनस्पती नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे याठिकाणचे पर्यटन आजूबाजूच्या ठिकाणी विभागले गेले तर स्थानिकांना अधिक फायदा होईल, असा अहवाल कास आव्हाने आणि संधी या विषयावर अभ्यास करणाऱ्या टेरी या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. राज्य आणि केंद्र सरकार तसेच युनेस्कोलाही हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

कास हे जागतिक वारसा केंद्र आहे. याठिकाणी आढळणाऱ्या विविध वनस्पती इतर कोणत्याही भागात आढळत नाहीत. मात्र, मागील काही वर्षात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. २०२० साली कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली होती. मात्र, २०१९ मध्ये एक लाख २ हजार ८५३ पर्यटकांनी भेट दिली होती. यातील ९७ हजार ५५८ पर्यटकांनी फक्त कास पठाराला भेट दिली आहे.

कासच्या आजूबाजूलाही पर्यटनासाठी अनेक चांगल्या जागा आहेत. त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणावर पर्यटन होऊ शकते. याचा विचार करून वर्षभर या भागात कसे पर्यटन राहील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही टेरीने आपल्या अहवालात म्हटले आहे. पर्यावरणाबाबत पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा अहवाल पर्यावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शज्तखाली बनविला आहे. त्यांना रानवाटाचे संदीप श्रोत्री, डॉ. अपर्णा वाटवे, प्रेरणा अग्रवाल, निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे, वनविभाग आणि वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले.

पर्यावरण आणि सुधारणा या दोन विरोधाभास असलेल्या संकल्पना नाहीत तर त्या एकाच बाजूच्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करतच सुधारणा होणे आवश्यक आहेत. तेव्हाच जीवसृष्टीचे योग्य रक्षण होऊ शकेल.- राजेंद्र शेंडे, अध्यक्ष, टेरी

टेरीच्या अहवालातील चार महत्त्वाच्या बाबी१. २०२० मध्ये पर्यटक कमी झाल्याने गवताच्या काही प्रजातींमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

२. गेल्या काही वर्षांपासून कासवर पर्यटकांच्या संख्येमुळे फुलांवर परिणाम झाला आहे. हा परिणाम टाळण्यासाठी पर्यटनावर नियंत्रण असायला हवे आणि फुलांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी निसर्गावर आधारित पर्यटनाला प्राधान्य दिले जावे.

३. पठारावर चराईसाठी येणाऱ्या जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्याचा फुलांच्या फुलण्यावरही परिणाम होत आहे. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करणे आवश्यक आहे.

४. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या मदतीने या भागातील पर्यटन वाढीसाठी आणि स्थानिकांना रोजगार निर्माण होण्यासाठी मदत होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :satara-pcसाताराKas Patharकास पठारtourismपर्यटन