शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 22:58 IST

टेरीचा अहवाल. वर्षभर पर्यटनासाठी नियोजन आवश्यक

दीपक शिंदे                                                                                                                                                               

सातारा : कास पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. हाच कालावधी याठिकाणची जैवविविधता बहरात येण्याचा असतो. त्यामुळे त्यावर अतिरिक्त पर्यटकांचा विपरीत परिणाम होत असून, काही वनस्पती नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे याठिकाणचे पर्यटन आजूबाजूच्या ठिकाणी विभागले गेले तर स्थानिकांना अधिक फायदा होईल, असा अहवाल कास आव्हाने आणि संधी या विषयावर अभ्यास करणाऱ्या टेरी या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. राज्य आणि केंद्र सरकार तसेच युनेस्कोलाही हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

कास हे जागतिक वारसा केंद्र आहे. याठिकाणी आढळणाऱ्या विविध वनस्पती इतर कोणत्याही भागात आढळत नाहीत. मात्र, मागील काही वर्षात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. २०२० साली कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली होती. मात्र, २०१९ मध्ये एक लाख २ हजार ८५३ पर्यटकांनी भेट दिली होती. यातील ९७ हजार ५५८ पर्यटकांनी फक्त कास पठाराला भेट दिली आहे.

कासच्या आजूबाजूलाही पर्यटनासाठी अनेक चांगल्या जागा आहेत. त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणावर पर्यटन होऊ शकते. याचा विचार करून वर्षभर या भागात कसे पर्यटन राहील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही टेरीने आपल्या अहवालात म्हटले आहे. पर्यावरणाबाबत पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा अहवाल पर्यावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शज्तखाली बनविला आहे. त्यांना रानवाटाचे संदीप श्रोत्री, डॉ. अपर्णा वाटवे, प्रेरणा अग्रवाल, निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे, वनविभाग आणि वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले.

पर्यावरण आणि सुधारणा या दोन विरोधाभास असलेल्या संकल्पना नाहीत तर त्या एकाच बाजूच्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करतच सुधारणा होणे आवश्यक आहेत. तेव्हाच जीवसृष्टीचे योग्य रक्षण होऊ शकेल.- राजेंद्र शेंडे, अध्यक्ष, टेरी

टेरीच्या अहवालातील चार महत्त्वाच्या बाबी१. २०२० मध्ये पर्यटक कमी झाल्याने गवताच्या काही प्रजातींमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

२. गेल्या काही वर्षांपासून कासवर पर्यटकांच्या संख्येमुळे फुलांवर परिणाम झाला आहे. हा परिणाम टाळण्यासाठी पर्यटनावर नियंत्रण असायला हवे आणि फुलांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी निसर्गावर आधारित पर्यटनाला प्राधान्य दिले जावे.

३. पठारावर चराईसाठी येणाऱ्या जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्याचा फुलांच्या फुलण्यावरही परिणाम होत आहे. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करणे आवश्यक आहे.

४. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या मदतीने या भागातील पर्यटन वाढीसाठी आणि स्थानिकांना रोजगार निर्माण होण्यासाठी मदत होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :satara-pcसाताराKas Patharकास पठारtourismपर्यटन