शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

सर्वोत्कृष्ट संशोधन : सातारकर देशात अव्वल-संशोधक धीरज पवार यांचा दिल्लीत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:56 IST

या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले.

ठळक मुद्देयासाठी त्यांना शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

सागर गुजर ।सातारा : उडतारे, ता. वाई येथील डॉ. धीरज विपिन पवार यांनी केलेल्या संशोधन कार्याचा दिल्ली येथे गौरव करण्यात आला. त्यांचे संशोधन संपूर्ण देशात अव्वल ठरले. तेलबियांवर पडणाऱ्या रोगांशी सामना करण्याच्या त्यांच्या तंत्रज्ञानाचा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

‘देशात ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पिकांवर पडणा-या वेगवेगळ्या रोगांचे नियंत्रण, करायची पद्धत वेगवेगळी आहे. रोग पडल्यानंतर रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. ही बाब खर्चिक ठरते. पिकांचे नियोजन सुरुवातीपासूनच करणे आवश्यक आहे, तसे केल्यास रोगाला अटकाव बसून आर्थिक तोटा टाळता येईल,’ असे डॉ. धीरज पवार यांनी संशोधनाअंती सिद्ध कलेले आहे.

डॉ. पवार यांनी लसनाची पेस्ट, मित्र बुरशी यांचा उपयोग करून बीजप्रक्रिया केली. पेरणीआधीच बियांमध्ये काहीवेळा रोगाचे संक्रमण होते. त्यामुळे रोग वाढतो. बीजप्रक्रिया केल्याने रोग नियंत्रित करता येतो. लिंबोणी पाला, लसनाचा रस यांचे द्रावण रोग आटोक्यात आणू शकते. दोन वर्षे शेतात प्रात्यक्षिक घेतले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

दरम्यान, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथे भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्थेतर्फे ‘फायटोपॅथोलॉजी इन अचिव्हिंग यूएन सस्टेंशन डेव्हलपमेंट गोल्स’ या विषयावर दि. १६ ते २० जानेवारी या कालावधीत ७ व्या आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. यासाठी त्यांना शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. धीरज पवार हे स्वातंत्र्यसैनिक दिवंगत आनंदराव जगदेवराव पवार यांचे नातू व प्रगतशील शेतकरी विपीन आनंदराव पवार यांचे चिरंजीव आहेत.

 

  • तेलबिया पिकांना फायदा

हवामानाच्या दृष्टीने राज्याचे ९ विभाग आहेत. भौगोलिक वातावरणानुसार पिके घेतली जातात. अवेळी पाऊस पडत असल्याने बुरशीजन्य रोग वाढून पिकाला नुकसान पोहोचते. कोरडवाहू भागात तेलबिया पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ८० टक्के लोक शेतकरी ही पिके करतात. या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी डॉ. धीरज पवार यांचे संशोधन फायद्याचे ठरणार आहे.

 

शेतकरी मोठे भांडवल घालून तेलबिया पिके घेतात. वातावरणातील बदलांमुळे अनेकदा पिकांवर रोग पडल्यानंतर पिके वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. माझ्या संशोधनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट टळेल, याची मला खात्री वाटते.- प्रा. डॉ. धीरज पवार,बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ, दापोली.

टॅग्स :scienceविज्ञानSatara areaसातारा परिसर