शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

सर्वोत्कृष्ट संशोधन : सातारकर देशात अव्वल-संशोधक धीरज पवार यांचा दिल्लीत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:56 IST

या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले.

ठळक मुद्देयासाठी त्यांना शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

सागर गुजर ।सातारा : उडतारे, ता. वाई येथील डॉ. धीरज विपिन पवार यांनी केलेल्या संशोधन कार्याचा दिल्ली येथे गौरव करण्यात आला. त्यांचे संशोधन संपूर्ण देशात अव्वल ठरले. तेलबियांवर पडणाऱ्या रोगांशी सामना करण्याच्या त्यांच्या तंत्रज्ञानाचा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

‘देशात ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पिकांवर पडणा-या वेगवेगळ्या रोगांचे नियंत्रण, करायची पद्धत वेगवेगळी आहे. रोग पडल्यानंतर रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. ही बाब खर्चिक ठरते. पिकांचे नियोजन सुरुवातीपासूनच करणे आवश्यक आहे, तसे केल्यास रोगाला अटकाव बसून आर्थिक तोटा टाळता येईल,’ असे डॉ. धीरज पवार यांनी संशोधनाअंती सिद्ध कलेले आहे.

डॉ. पवार यांनी लसनाची पेस्ट, मित्र बुरशी यांचा उपयोग करून बीजप्रक्रिया केली. पेरणीआधीच बियांमध्ये काहीवेळा रोगाचे संक्रमण होते. त्यामुळे रोग वाढतो. बीजप्रक्रिया केल्याने रोग नियंत्रित करता येतो. लिंबोणी पाला, लसनाचा रस यांचे द्रावण रोग आटोक्यात आणू शकते. दोन वर्षे शेतात प्रात्यक्षिक घेतले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

दरम्यान, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथे भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्थेतर्फे ‘फायटोपॅथोलॉजी इन अचिव्हिंग यूएन सस्टेंशन डेव्हलपमेंट गोल्स’ या विषयावर दि. १६ ते २० जानेवारी या कालावधीत ७ व्या आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. यासाठी त्यांना शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. धीरज पवार हे स्वातंत्र्यसैनिक दिवंगत आनंदराव जगदेवराव पवार यांचे नातू व प्रगतशील शेतकरी विपीन आनंदराव पवार यांचे चिरंजीव आहेत.

 

  • तेलबिया पिकांना फायदा

हवामानाच्या दृष्टीने राज्याचे ९ विभाग आहेत. भौगोलिक वातावरणानुसार पिके घेतली जातात. अवेळी पाऊस पडत असल्याने बुरशीजन्य रोग वाढून पिकाला नुकसान पोहोचते. कोरडवाहू भागात तेलबिया पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ८० टक्के लोक शेतकरी ही पिके करतात. या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी डॉ. धीरज पवार यांचे संशोधन फायद्याचे ठरणार आहे.

 

शेतकरी मोठे भांडवल घालून तेलबिया पिके घेतात. वातावरणातील बदलांमुळे अनेकदा पिकांवर रोग पडल्यानंतर पिके वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. माझ्या संशोधनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट टळेल, याची मला खात्री वाटते.- प्रा. डॉ. धीरज पवार,बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ, दापोली.

टॅग्स :scienceविज्ञानSatara areaसातारा परिसर