शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

सर्वोत्कृष्ट संशोधन : सातारकर देशात अव्वल-संशोधक धीरज पवार यांचा दिल्लीत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:56 IST

या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले.

ठळक मुद्देयासाठी त्यांना शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

सागर गुजर ।सातारा : उडतारे, ता. वाई येथील डॉ. धीरज विपिन पवार यांनी केलेल्या संशोधन कार्याचा दिल्ली येथे गौरव करण्यात आला. त्यांचे संशोधन संपूर्ण देशात अव्वल ठरले. तेलबियांवर पडणाऱ्या रोगांशी सामना करण्याच्या त्यांच्या तंत्रज्ञानाचा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

‘देशात ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पिकांवर पडणा-या वेगवेगळ्या रोगांचे नियंत्रण, करायची पद्धत वेगवेगळी आहे. रोग पडल्यानंतर रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. ही बाब खर्चिक ठरते. पिकांचे नियोजन सुरुवातीपासूनच करणे आवश्यक आहे, तसे केल्यास रोगाला अटकाव बसून आर्थिक तोटा टाळता येईल,’ असे डॉ. धीरज पवार यांनी संशोधनाअंती सिद्ध कलेले आहे.

डॉ. पवार यांनी लसनाची पेस्ट, मित्र बुरशी यांचा उपयोग करून बीजप्रक्रिया केली. पेरणीआधीच बियांमध्ये काहीवेळा रोगाचे संक्रमण होते. त्यामुळे रोग वाढतो. बीजप्रक्रिया केल्याने रोग नियंत्रित करता येतो. लिंबोणी पाला, लसनाचा रस यांचे द्रावण रोग आटोक्यात आणू शकते. दोन वर्षे शेतात प्रात्यक्षिक घेतले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

दरम्यान, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथे भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्थेतर्फे ‘फायटोपॅथोलॉजी इन अचिव्हिंग यूएन सस्टेंशन डेव्हलपमेंट गोल्स’ या विषयावर दि. १६ ते २० जानेवारी या कालावधीत ७ व्या आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. यासाठी त्यांना शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. धीरज पवार हे स्वातंत्र्यसैनिक दिवंगत आनंदराव जगदेवराव पवार यांचे नातू व प्रगतशील शेतकरी विपीन आनंदराव पवार यांचे चिरंजीव आहेत.

 

  • तेलबिया पिकांना फायदा

हवामानाच्या दृष्टीने राज्याचे ९ विभाग आहेत. भौगोलिक वातावरणानुसार पिके घेतली जातात. अवेळी पाऊस पडत असल्याने बुरशीजन्य रोग वाढून पिकाला नुकसान पोहोचते. कोरडवाहू भागात तेलबिया पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ८० टक्के लोक शेतकरी ही पिके करतात. या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी डॉ. धीरज पवार यांचे संशोधन फायद्याचे ठरणार आहे.

 

शेतकरी मोठे भांडवल घालून तेलबिया पिके घेतात. वातावरणातील बदलांमुळे अनेकदा पिकांवर रोग पडल्यानंतर पिके वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. माझ्या संशोधनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट टळेल, याची मला खात्री वाटते.- प्रा. डॉ. धीरज पवार,बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ, दापोली.

टॅग्स :scienceविज्ञानSatara areaसातारा परिसर