शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

दर गडगडल्याने टोमॅटो नाल्यात

By admin | Updated: November 24, 2014 23:13 IST

मसूर परिसरातील चित्र : लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने बळीराजा आला अडचणीत

जगन्नाथ कुंभार - मसूर -टोमॅटो पिकाला दर मिळत नसल्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारपेठेतील दर आणि उत्पादन खर्च यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे बळीराजा अडचणीत आला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील विक्रीचा दर परवडत नसल्यामुणे टोमॅटो नाल्यात तसेच शेताच्या बाहेर फेकून दिले आहेत. कऱ्हाड तालुक्यात अनेक ठिकाणी टोमॅटोकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागण केली आहे. मात्र, बाजारपेठत दराची घसरण झाल्यामुळे अनेक शेतकरी आता अडचणीत आले आहेत. उत्पादनाचा खर्चही बाहेर पडत नसल्यामुळे अवघड होऊ बसले आहे. कऱ्हाड तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आता तोडणी वाहतूक ही परवडेनासी झाली आहे. कऱ्हाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून टोमॅटोची लागण केली आहे. टोमॅटो पिकाची लागण करण्यापूर्वी शेती तयार करणे, सरी सोडणे, रोपे आणणे अथवा स्वत:च तरू तयार करणे अशी कितीतरी कामे सुरुवातीलाच करावी लागतात. लागण झाल्यानंतर त्यांचे संगोपन करताना विविध प्रकारची खते, औषध फवारणी, मजूरांचा पगार आणि फळे सुरु झाल्यानंतर तारा सोडून बांधणी करणे असा मिळून एकरी येणारा खर्च लाखांच्या घरात आहे. अनेकदा शेतकरी यासाठी कर्ज काढून सर्व खर्च भागवतात. मात्र, आजचा बाजारातील टोमॅटोचा दर लक्षात घेता, बळीराजा अडचणीत आला आहे. यावर्षी चांगले उत्पन्न निघेल या मोठ्या आशेने कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक केले, मात्र त्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. बळीराजा येतोय मेटाकुटीस...शेतातून जर टोमॅटो तोडून बाजारात विक्रीसाठी न्यायचे म्हणले तर येणार खर्च हजारांच्या घरात असतो. तोडणीसाठी मजूर लागतात. त्यांचाही खर्च तितकाच येतो. टोमॅटोची तोडणी केल्यापासून ते अगदी बाजारापर्यंत येणारा खर्च करतानाच बळीराजा मेटाकुटीला येत आहे. टोमॅटो पिकाला हमीभाव मिळावा म्हणून शेतीविभागाने पावले उचलली पाहिजेत. दरात जर घसरण होत राहिली तर टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहे. - विकास यादव, शेतकरी