शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दर गडगडल्याने टोमॅटो नाल्यात

By admin | Updated: November 24, 2014 23:13 IST

मसूर परिसरातील चित्र : लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने बळीराजा आला अडचणीत

जगन्नाथ कुंभार - मसूर -टोमॅटो पिकाला दर मिळत नसल्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारपेठेतील दर आणि उत्पादन खर्च यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे बळीराजा अडचणीत आला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील विक्रीचा दर परवडत नसल्यामुणे टोमॅटो नाल्यात तसेच शेताच्या बाहेर फेकून दिले आहेत. कऱ्हाड तालुक्यात अनेक ठिकाणी टोमॅटोकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागण केली आहे. मात्र, बाजारपेठत दराची घसरण झाल्यामुळे अनेक शेतकरी आता अडचणीत आले आहेत. उत्पादनाचा खर्चही बाहेर पडत नसल्यामुळे अवघड होऊ बसले आहे. कऱ्हाड तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आता तोडणी वाहतूक ही परवडेनासी झाली आहे. कऱ्हाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून टोमॅटोची लागण केली आहे. टोमॅटो पिकाची लागण करण्यापूर्वी शेती तयार करणे, सरी सोडणे, रोपे आणणे अथवा स्वत:च तरू तयार करणे अशी कितीतरी कामे सुरुवातीलाच करावी लागतात. लागण झाल्यानंतर त्यांचे संगोपन करताना विविध प्रकारची खते, औषध फवारणी, मजूरांचा पगार आणि फळे सुरु झाल्यानंतर तारा सोडून बांधणी करणे असा मिळून एकरी येणारा खर्च लाखांच्या घरात आहे. अनेकदा शेतकरी यासाठी कर्ज काढून सर्व खर्च भागवतात. मात्र, आजचा बाजारातील टोमॅटोचा दर लक्षात घेता, बळीराजा अडचणीत आला आहे. यावर्षी चांगले उत्पन्न निघेल या मोठ्या आशेने कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक केले, मात्र त्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. बळीराजा येतोय मेटाकुटीस...शेतातून जर टोमॅटो तोडून बाजारात विक्रीसाठी न्यायचे म्हणले तर येणार खर्च हजारांच्या घरात असतो. तोडणीसाठी मजूर लागतात. त्यांचाही खर्च तितकाच येतो. टोमॅटोची तोडणी केल्यापासून ते अगदी बाजारापर्यंत येणारा खर्च करतानाच बळीराजा मेटाकुटीला येत आहे. टोमॅटो पिकाला हमीभाव मिळावा म्हणून शेतीविभागाने पावले उचलली पाहिजेत. दरात जर घसरण होत राहिली तर टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहे. - विकास यादव, शेतकरी