शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

टोल ५५ अन् खड्डे ५५ हजार!

By admin | Updated: August 7, 2014 00:15 IST

महामार्ग गेला खड्ड्यात! : पैसे देऊन दुखणं विकत घेतल्याच्या वाहनचालकांमधून प्रतिक्रिया

सातारा : एखाद्या शहराचा विकास करायचा असेल तर सर्वात प्रथम तेथील दळणवळणाची व्यवस्था दर्जेदार असायला हवी. सातारच्याबाबतीत मात्र उलटेच घडत आहे. दुपदरी महामार्गाचे चारपदरीकरण झाले. सहापदरीकरणाचे कामही सुरू झाले, मात्र पुढचे पाठ मागचे सपाट याप्रमाणे महामार्गाची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की, खेड्यापाड्यातले रस्ते बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. महामार्गाची ऐशी-तैशी झाली तरी वाहनधारकांकडून टोल मात्र सहापदरीकरणाचा वसूल केला जात आहे. सहापदरीकरणाचे काम बंद...महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खोदकाम, साईडपट्ट्यांची अर्धवट कामे अपघातास निमंत्रण देत आहे. सहापदरीकरणाचा टोल वसूल केला जातो, मात्र तशा सुविधा मिळत नसल्याने मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.सेवारस्त्यांची ऐशी-तैशीशिरवळ : शिरवळला येताय? थांबा, अन्यथा अपघात होऊ शकतो, असे म्हणण्याची वेळ सध्या शिरवळकरांवर आली आहे. महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्सच्या कृपेने महामार्ग व सेवारस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. खड्ड्यांतून महामार्ग शोधावा लागत आहे. पावसामुळे महामार्ग आणि गावांना जोडणाऱ्या सेवारस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शिरवळ येथे तर कोणता खड्डा चकवू, अशी अवस्था वाहनचालकांची होत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साठल्यामुळे वाहनचालकांची मोठी पंचाईत होत आहे. खड्डे मुजविण्याचा प्रयत्न केला आहे. पण अवघ्या दोन तासांतच जैसे थे परिस्थिती झाली आहे.