शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जिल्ह्यात आजपासून खत, बियाणे विक्री बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:59 IST

सातारा : खत, बियाणे, औषध या शेतीशी संबंधित साहित्य विक्री करणाºयांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत व निलंबित करण्यात आलेले परवाने पूर्ववत करावेत, यासह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके डिलर असोसिएशनतर्फे गुरुवार, दि. २ ते शुक्रवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंत कृषी साहित्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार ...

सातारा : खत, बियाणे, औषध या शेतीशी संबंधित साहित्य विक्री करणाºयांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत व निलंबित करण्यात आलेले परवाने पूर्ववत करावेत, यासह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके डिलर असोसिएशनतर्फे गुरुवार, दि. २ ते शुक्रवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंत कृषी साहित्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.संघटनेतर्फे बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शशांक शहा, उपाध्यक्ष रणजित निंबाळकर, राजन मामनिया, भूषण शहा, एस. एस. पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.यवतमाळ जिल्ह्यातील पिकावर चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक औषध फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू झाले. तसेच बरेच शेतकरी व शेतमजूर बाधित झाले आहे. या घटनेला कीटकनाशके विक्रेतेच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. कृषी साहित्य विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. या परिस्थितीत कृषी साहित्य विक्रेत्यांना आपले व्यवसाय सुरू ठेवणे कठीण झाले आहे.ज्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यात यावेत, निलंबित करण्यात आलेले विक्री परवाने पूर्ववत देण्यात यावेत, आॅनलाईन परवान्यांत समाविष्ट केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत. शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या निविष्ठा कायद्याच्या कक्षेत कशा घेता येतील, याचा विचार करण्यात यावा, शासनाकडून सर्व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना त्यांचे उगम प्रमाणपत्र, कृषी विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे, बियाणे, कीटकनाशके व खते यांचे हस्तलिखित साठा रजिस्टर ऐवजी संगणकीय पद्धतीने ठेवण्यात आलेला साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे. दोन दिवस दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला जाणार आहे. बेमुदत दुकाने बंद ठेवणे आणि धरणे आंदोलन करणे या एकमेव पर्यायाचा अवलंबला जाईल, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :agricultureशेती