शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

टोल माफिसाठी वेळे ग्रामस्थांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:55 IST

संपूर्ण पुणे ते सातारा महामार्गात वेळे गावच्या शेतकऱ्यांची बहुतांश जमीन यापूर्वीच्या रस्ता चौपदरीरणाच्या वेळी महामार्गासाठी गेली आहे. तसेच आता नव्याने होणाऱ्या सहापदरीकरण व नवीन दोन खंबाटकी बोगद्यास देखील वेळे येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे या महामार्गासाठी लागणाऱ्या एकूण जमिनिपैकी वेळे गावच्या जमिनीचे प्रमाण जास्त आहे.

ठळक मुद्देनागरिकांना दररोज जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी जावे लागते. परंतु आनेवाडी टोलनाक्यावर सवलत मिळत नसले कारणाने त्यांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. अनेकदा त्यामुळे वाद देखील होत असतात.

वेळे  - सातारापुणे ते सातारा महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर वेळेकर ग्रामस्थांना टोल मधून सवलत मिळावी म्हणून वेळे ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. वेळे परिसरातील कवठे, सरुर, केंजळ, शेंदूरजणे तसेच कोरेगाव तालुक्यातील काही गावांना टोल मध्ये सवलत मिळाली परंतु वेळे गाव या सवलतीपासून वंचित राहिले. त्यामुळे वेळेकर ग्रामस्थ संतापले आहेत.संपूर्ण पुणे ते सातारा महामार्गात वेळे गावच्या शेतकऱ्यांची बहुतांश जमीन यापूर्वीच्या रस्ता चौपदरीरणाच्या वेळी महामार्गासाठी गेली आहे. तसेच आता नव्याने होणाऱ्या सहापदरीकरण व नवीन दोन खंबाटकी बोगद्यास देखील वेळे येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे या महामार्गासाठी लागणाऱ्या एकूण जमिनिपैकी वेळे गावच्या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच महामार्गासाठी वेळे ग्रामस्थांचे योगदान हे खूप मोठे आहे. असे असूनही येथील ग्रामस्थांना न्याय मिळत नाही.वेळे हे गाव वाई तालुक्यात मोडते. गावालगत अगदी 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुरूर गावाला टोल मध्ये सवलत मिळते. सुरूर पासून वाई रस्त्यावर सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेंदूर जणे गावाला टोल मध्ये सवलत मिळते पण वेळे गाव अगदी महामार्गावर असून देखील ते या टोलमाफी पासून वंचित कसे काय राहते? असा सामान्य प्रश्न वेळेकर नागरिक विचारत आहेत. येथील नागरिकांना दररोज जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी जावे लागते. परंतु आनेवाडी टोलनाक्यावर सवलत मिळत नसले कारणाने त्यांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. अनेकदा त्यामुळे वाद देखील होत असतात.वेळे गावाचे योगदान पाहता येथील नागरिकांना टोल मधून सवलत मिळालीच पाहिजे यासाठी येथील ग्रामस्थांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांना विनंती देखील करण्यात आली होती. परंतु या विनंतीला केराची टोपली दाखवण्यात आली. पुणे ते सातारा महामार्गासाठी सर्वात जास्त क्षेत्र हे वेळे येथील ग्रामस्थांनी दिले आहे. तरीदेखील त्यांचेवर घोर अन्याय होताना दिसत आहे.येत्या काळात जर वेळे ग्रामस्थांना आनेवाडी येथील टोल नाक्यावर टोल माफी झाली नाही तर येथील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याचा तयारीत आहेत. येणाऱ्या ग्रामसभेत तसा ठराव करून त्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी महामार्ग प्रशासनाने वेळे गावाची वेळेवर दखल घेऊन तात्काळ येथील ग्रामस्थांना टोल माफी करून त्यांना न्याय द्यावा. अन्यथा संपूर्ण गाव रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही. 

वेळे गावाचे महामार्गासाठीचे योगदान हे खूप मोठे आहे. येथील ग्रामस्थांना अनेकवेळा कोणत्याही कारणाने जिल्ह्याच्या ठिकाणी जावेच लागते. परंतु चार आण्याच्या कोंबडीसाठी बारा आणे वाया घालवावे लागतात, हे थांबले पाहिजे. आमच्या वेळे गावाला संपूर्ण टोल माफी झालीच पाहिजे.-- सुरेश अंकुश पवार, ग्रामस्थ, वेळे.जिल्ह्याच्या ठिकाणी आठवड्यातून किमान एकदा तरी चेकपसाठी दवाखान्यात जावेच लागते. परंतु टोल मुळे आम्हाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. टोल माफी मिळत नसलेने आम्ही संतप्त झालो आहोत. आम्हाला टोल माफी मिळाली पाहिजे.विजय पवार, ग्रामस्थ, वेळे

टॅग्स :tollplazaटोलनाकाSatara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत