शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काळोशीच्या डोक्यावर शिळांचा ‘काळ’

By admin | Updated: July 30, 2015 00:29 IST

ग्रामस्थांची पुनर्वसनाची मागणी : वर्षभरानंतरही गावावरील संकटाची परिस्थिती ‘जैसे थे’

प्रगती जाधव-पाटील -सातारा -वाघजाई देवीच्या छत्रछायेखाली वसलेल्या परळी खोऱ्यातील काळोशी गावावर चार भल्या मोठ्या शिळा काळ म्हणून उभ्या राहिल्या आहेत. गतवर्षी माळीणच्या घटनेनंतर ‘लोकमत’ने लक्ष वेधले आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी येथे जुजबी पाहणी केली. मात्र, वर्षभरात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे धक्कादायक चित्र एक वर्षाने पाहायला मिळाले.परळी खोऱ्यातील काळोशी हे अडीचशे उंबऱ्यांचे गाव. सुमारे बाराशे लोकसंख्या असणाऱ्या या गावाच्या उत्तरेस यवतेश्वर गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. त्या डोंगराचा काही भाग ढिसाळ झाला असून, तो दिवसेंदिवस सुटत चालला आहे. त्यापासून गावात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बरेचसे छोटे-मोठे दगड खाली येऊन गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या ओढा किंवा कडे-कपारीत येऊन अडकले आहेत. मात्र, त्यामुळे काही मोठ्या प्रमाणावर नुकसान अथवा हानी झाली नाही.गेल्या अनेक वर्षांपासून या डोंगरावरील काही शिळा निसटण्याच्या अवस्थेत आहेत. खूप वर्षांपूर्वी हा दगड गावावर कोसळणार होता. पण गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी वाघजाई देवी प्रकटली. देवीने हा दगड हाताने अडविला. तेव्हापासून कितीही मोठ्ठा पाऊस असला तरीही या शिळा तसूभरही हालल्या नाहीत, अशी ग्रामस्थांची भाबडी श्रद्धा आहे. या दगडावर वाघजाई देवीच्या हाताचा पंजा दिसत असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. काळोशी गाव तीव्र उतारावर वसले आहे. या गावातील ९० टक्के चाकरमानी मुंबईस्थित आहेत. लहरी पावसाच्या जिवावर येथील शेती फुलते. त्यामुळे दिवसभर गावात ज्येष्ठ आणि लहानग्यांचा वावर अधिक असतो. या डोगरावरील शिळा गेल्या काही वर्षांत निसटू लागल्या आहेत. जोरदार पाऊस सुरू झाला तर अनेक मोठे दगड कपारीतून ओघळून खाली देवीच्या मंदिरापर्यंत आले आहेत. डोंगरावरील निसटलेल्या अवस्थेत असलेल्या शिळा एका जोरदार पावसाच्या सरीत कोसळण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. मोठ्या पावसाने जर या शिळा खाली आल्या तर तीव्र उतार आणि जडत्वाच्या नियमानुसार अतिवेगाने या शिळा अवघ्या गावावर वरवंटा फिरवून पुढे जाऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. देवीवर अपार श्रध्दा असलेले येथील ग्रामस्थ आजही ‘देवी आमच्यावर संकट येऊ देणार नाही,’ हे खूप आत्मविश्वासाने सांगतात. पण, निसर्गाने रौद्ररूप धारण केले तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही, हेही ग्रामस्थांच्या अंतमर्नात कोरलेले आहे. काय व्हायला हवे...काळोशी गावाच्या डोंगरावरील शिळा कोणत्याही मोठ्या पावसाने कोसळू शकतात. त्यामुळे येथे तज्ज्ञांच्या सल्ल्याने कार्यवाही होणे आवश्यक आहे. तातडीने निधी उपलब्ध करून प्रशासनाने शिळांमधील वाढत चाललेल्या फटींमध्ये काँक्रिटीकरण करून वरून जाळी बसविणे अपेक्षित आहे. तसेच देवळाच्या वरील बाजूस संरक्षक जाळी बसविण्याचीही मागणी आहे. काय झाले वर्षभरात...पुणे जिल्ह्यातील माळीण येथील दुर्घटना घडल्यानंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील काही गावांची पाहणी केली होती. सातारा तालुक्यातील काळोशी हे गाव धोक्याच्या सावटाखाली होते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाने दोन अधिकारी पाठवून पाहणी केली. त्यानंतर वर्षभरात येथे काहीही झाले नाही.रात्रीच्या वेळी पाऊस सुरू झाल्यानंतर खूप भयंकर आवाज येतो. जोराच्या पावसाच्या रेट्यात कधी एखादा छोटा दगड खाली गडगडत आला तरीही त्याचा अत्यंत भीषण आवाज येतो. या आवाजाने गावकरी भयग्रस्त होतात.- अमोल निकम, अध्यक्ष, तंटामुक्त समितीकाळोशीच्या डोंगरावरील चार शिळा कोणत्याही क्षणी गावावर येऊ शकतात. प्रशासनाने गावाचे पुर्नवसन करावे; अन्यथा या शिळांना जाळी बसवून त्यांना खाली येण्यापासून अडविणे आवश्यक आहे. - सोमनाथ पवार, पं. स. सदस्यगावावरील हे डोंगरी संकट दूर करण्यासाठी आम्ही प्रशासनाला लेखी कळविले आहे. पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. या शिळांमुळे अवघ्या गावाला जिवाचा धोका आहे.- यशवंत निकम, सरपंच