शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

तीनचाकींना प्रथमच सातारा परिसरात जॅमर ‘लॉक किया जाए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:10 IST

सातारा : शहरात गेल्या काही दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांना कारवाईचा बडगा उचलला.

सातारा : शहरात गेल्या काही दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांना कारवाईचा बडगा उचलला. सोमवारी पोवई नाका परिसरात उभ्या असलेल्या चक्क रिक्षालाच जॅमर बसवला.

सातारा शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: राजवाडा, मोती चौक, खणआळी, राजपथ, पोवई नाका, एसटी स्टँड व भूविकास बँक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत असते. अनेकजण रस्त्यावर वाहने पार्क करून जात असतात. त्यावेळी वाहतुकीस अडथळा ठरणाºया दुचाकी उचलल्या जातात. तसेच चारचाकी वाहनांना जॅमर बसवला जात होता.

शहरात सर्वच परिसरात रिक्षांसाठी स्वतंत्र थांबे आहेत. तरीदेखील रिक्षाचालक रस्त्यावर कुठेही रिक्षा थांबून उभे असतात. रस्त्याच्याकडे रिक्षा न लावता रस्त्याच्या मध्येच ती उभी केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. अशाप्रकारे रिक्षाचालकांची मुजोरी वाढली होती. रिक्षाचालकांच्या आडमुठी धोरणामुळे अनेक रस्त्यावर इतर वाहनचालकांसोबत त्यांची ‘तुतू मैमै’ होत असते. अशात अपघाताच्या घटनांमध्ये वाढत होते असते.वाहतूक शाखेचे पोलिस त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जात होते.

दरम्यान, सोमवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणाºया रिक्षांच जॅमर बसवण्याची भूमिका घेतली. दोन दिवसांत साधारण राजवाडा, पोवई नाका, एसटी स्टँड परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाºया १० रिक्षांना अशाप्रकारे जॅमर बसवले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रिक्षा चालकांना झटका दिल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहेत.अपघाताचा धोकासातारा शहरात मोती ते शनिवार पेठ, पोवई नाका ते एसटी स्टँड, पोवई नाका ते जिल्हा परिषद, समर्थ मंदिर ते राजवाडा, माची पेठ ते शाहू चौक आदी उताराच्या ठिकाणी रिक्षाचालक रिक्षा न्युट्रल करून मुंगी पावलाने प्रवाशांची वाट पाहत बसलेले असतात.

वाहतूक पोलिसदेखील रिक्षामध्ये चालक असल्याने कारवाई करत नाही. मात्र, याच रिक्षा वाहतूक कोंडी आणि अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यांना रोखण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अशा प्रकारे रिक्षा रस्त्यांमध्ये उभ्या केल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.