शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तीनचाकींना प्रथमच सातारा परिसरात जॅमर ‘लॉक किया जाए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:10 IST

सातारा : शहरात गेल्या काही दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांना कारवाईचा बडगा उचलला.

सातारा : शहरात गेल्या काही दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांना कारवाईचा बडगा उचलला. सोमवारी पोवई नाका परिसरात उभ्या असलेल्या चक्क रिक्षालाच जॅमर बसवला.

सातारा शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: राजवाडा, मोती चौक, खणआळी, राजपथ, पोवई नाका, एसटी स्टँड व भूविकास बँक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत असते. अनेकजण रस्त्यावर वाहने पार्क करून जात असतात. त्यावेळी वाहतुकीस अडथळा ठरणाºया दुचाकी उचलल्या जातात. तसेच चारचाकी वाहनांना जॅमर बसवला जात होता.

शहरात सर्वच परिसरात रिक्षांसाठी स्वतंत्र थांबे आहेत. तरीदेखील रिक्षाचालक रस्त्यावर कुठेही रिक्षा थांबून उभे असतात. रस्त्याच्याकडे रिक्षा न लावता रस्त्याच्या मध्येच ती उभी केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. अशाप्रकारे रिक्षाचालकांची मुजोरी वाढली होती. रिक्षाचालकांच्या आडमुठी धोरणामुळे अनेक रस्त्यावर इतर वाहनचालकांसोबत त्यांची ‘तुतू मैमै’ होत असते. अशात अपघाताच्या घटनांमध्ये वाढत होते असते.वाहतूक शाखेचे पोलिस त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जात होते.

दरम्यान, सोमवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणाºया रिक्षांच जॅमर बसवण्याची भूमिका घेतली. दोन दिवसांत साधारण राजवाडा, पोवई नाका, एसटी स्टँड परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाºया १० रिक्षांना अशाप्रकारे जॅमर बसवले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रिक्षा चालकांना झटका दिल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहेत.अपघाताचा धोकासातारा शहरात मोती ते शनिवार पेठ, पोवई नाका ते एसटी स्टँड, पोवई नाका ते जिल्हा परिषद, समर्थ मंदिर ते राजवाडा, माची पेठ ते शाहू चौक आदी उताराच्या ठिकाणी रिक्षाचालक रिक्षा न्युट्रल करून मुंगी पावलाने प्रवाशांची वाट पाहत बसलेले असतात.

वाहतूक पोलिसदेखील रिक्षामध्ये चालक असल्याने कारवाई करत नाही. मात्र, याच रिक्षा वाहतूक कोंडी आणि अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यांना रोखण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अशा प्रकारे रिक्षा रस्त्यांमध्ये उभ्या केल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.