शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तीनचाकींना प्रथमच सातारा परिसरात जॅमर ‘लॉक किया जाए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:10 IST

सातारा : शहरात गेल्या काही दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांना कारवाईचा बडगा उचलला.

सातारा : शहरात गेल्या काही दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांना कारवाईचा बडगा उचलला. सोमवारी पोवई नाका परिसरात उभ्या असलेल्या चक्क रिक्षालाच जॅमर बसवला.

सातारा शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: राजवाडा, मोती चौक, खणआळी, राजपथ, पोवई नाका, एसटी स्टँड व भूविकास बँक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत असते. अनेकजण रस्त्यावर वाहने पार्क करून जात असतात. त्यावेळी वाहतुकीस अडथळा ठरणाºया दुचाकी उचलल्या जातात. तसेच चारचाकी वाहनांना जॅमर बसवला जात होता.

शहरात सर्वच परिसरात रिक्षांसाठी स्वतंत्र थांबे आहेत. तरीदेखील रिक्षाचालक रस्त्यावर कुठेही रिक्षा थांबून उभे असतात. रस्त्याच्याकडे रिक्षा न लावता रस्त्याच्या मध्येच ती उभी केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. अशाप्रकारे रिक्षाचालकांची मुजोरी वाढली होती. रिक्षाचालकांच्या आडमुठी धोरणामुळे अनेक रस्त्यावर इतर वाहनचालकांसोबत त्यांची ‘तुतू मैमै’ होत असते. अशात अपघाताच्या घटनांमध्ये वाढत होते असते.वाहतूक शाखेचे पोलिस त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जात होते.

दरम्यान, सोमवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणाºया रिक्षांच जॅमर बसवण्याची भूमिका घेतली. दोन दिवसांत साधारण राजवाडा, पोवई नाका, एसटी स्टँड परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाºया १० रिक्षांना अशाप्रकारे जॅमर बसवले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रिक्षा चालकांना झटका दिल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहेत.अपघाताचा धोकासातारा शहरात मोती ते शनिवार पेठ, पोवई नाका ते एसटी स्टँड, पोवई नाका ते जिल्हा परिषद, समर्थ मंदिर ते राजवाडा, माची पेठ ते शाहू चौक आदी उताराच्या ठिकाणी रिक्षाचालक रिक्षा न्युट्रल करून मुंगी पावलाने प्रवाशांची वाट पाहत बसलेले असतात.

वाहतूक पोलिसदेखील रिक्षामध्ये चालक असल्याने कारवाई करत नाही. मात्र, याच रिक्षा वाहतूक कोंडी आणि अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यांना रोखण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अशा प्रकारे रिक्षा रस्त्यांमध्ये उभ्या केल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.