शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रिक्षाची तीनचाकी थांबली; जगण्याचा कोंडमारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रिक्षाची तीनचाकी थांबली आहे. व्यवसाय होईल या आशेवरच रिक्षाचालक स्थानकावर थांबतात. मात्र ग्राहक मिळत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : रिक्षाची तीनचाकी थांबली आहे. व्यवसाय होईल या आशेवरच रिक्षाचालक स्थानकावर थांबतात. मात्र ग्राहक मिळत नसल्याने निराश होऊन घरी परततात. रिक्षाचालकांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. कर्जाचे हप्ते भरता येत नाहीत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्य पद्धतीने करता येत नाही, या जीवनसंघर्षात रिक्षाचालक सापडलेले आहेत.

राज्यामध्ये लॉकडाऊन करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानाधारक रिक्षाचालकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेला पंधरा दिवस उलटून गेले असले तरी रिक्षाचालकांना मदत मिळाली नाही. तसेच ही मदत कशा पद्धतीने मिळणार हेदेखील समजायला मार्ग नाही. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षाधारकांची नोंद आहे. या माध्यमातून रिक्षाचालकांना मदत देता येऊ शकते; परंतु शासनाने अजून ही मदत दिली नसल्याने रिक्षाचालक चिंतेत आहेत.

अनेकांच्या घराच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. रिक्षासाठी घेतलेले कर्जदेखील थकलेले आहे. शासनाने पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये सलग तीन महिने बँकांना कर्ज वसूल न करण्याचे आदेश दिले होते. बँकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले, मात्र तीन महिन्यांनंतर कर्जदारांकडून व्याजासकट रकमा वसूल करायला सुरुवात केली. त्यामुळे रिक्षाचालकांनी कर्जामध्ये भरलेले पैसे व्याजावर गेलेले आहेत. आता उरलेली मुद्दल आणि व्याज भरणे त्यांना शक्य नसल्याने शासनाने या लॉकडाऊनच्या काळामध्ये व्याज आणि मुद्दल माफ करावे, अशीदेखील रिक्षाचालकांची मागणी आहे.

कोट

शासनाने जाहीर केलेली मदत अजून मिळालेली नाही. सध्या रिक्षाला व्यवसाय नसल्याने शासनाने मदत करण्याची घोषणा केल्याने दिलासा मिळाला होता; परंतु अद्याप मदत दिलेली नसल्याने चिंता वाटते.

- राजाराम पवार

सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रशासनाने लोकांना बाहेर पडण्याची मुभा दिलेली आहे. अकरानंतर कारवाई केली जात असल्याने बाहेर रिक्षा फिरवणेदेखील कठीण आहे. त्यामुळे शासनाने घोषणा केल्याप्रमाणे मदत द्यावी.

- साहेबराव पवार

रोज रिक्षा स्टॅन्डवर जाऊन उभा राहतो, मात्र अनेकदा बोहनी होत नाही. दवाखान्यात जाणारे पेशंट यांचे भाडे कधीतरी मिळते. कर्जाचे हप्ते थकले आहेत. शासनाने लॉकडाऊन काळातील कर्जाची माफी द्यावी तरच लोक सावरतील.

- मंगेश बारटक्के

रोज लवकर रिक्षा लावली तरी भाडे मिळत नाही. ओळखीचे लोक फोनवरून संपर्क साधून बोलावतात, तेवढाच व्यवसाय होतो. मात्र इतर वेळी घरात बसून राहावे लागत आहे. शासनाने दीड हजार रुपये देण्याचे मान्य केले. आता लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे.

- सुनील प्रभाळे

रिक्षाचा प्रतीकात्मक फोटो वापरणे