शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

रिक्षाची तीनचाकी थांबली; जगण्याचा कोंडमारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रिक्षाची तीनचाकी थांबली आहे. व्यवसाय होईल या आशेवरच रिक्षाचालक स्थानकावर थांबतात. मात्र ग्राहक मिळत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : रिक्षाची तीनचाकी थांबली आहे. व्यवसाय होईल या आशेवरच रिक्षाचालक स्थानकावर थांबतात. मात्र ग्राहक मिळत नसल्याने निराश होऊन घरी परततात. रिक्षाचालकांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. कर्जाचे हप्ते भरता येत नाहीत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्य पद्धतीने करता येत नाही, या जीवनसंघर्षात रिक्षाचालक सापडलेले आहेत.

राज्यामध्ये लॉकडाऊन करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानाधारक रिक्षाचालकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेला पंधरा दिवस उलटून गेले असले तरी रिक्षाचालकांना मदत मिळाली नाही. तसेच ही मदत कशा पद्धतीने मिळणार हेदेखील समजायला मार्ग नाही. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षाधारकांची नोंद आहे. या माध्यमातून रिक्षाचालकांना मदत देता येऊ शकते; परंतु शासनाने अजून ही मदत दिली नसल्याने रिक्षाचालक चिंतेत आहेत.

अनेकांच्या घराच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. रिक्षासाठी घेतलेले कर्जदेखील थकलेले आहे. शासनाने पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये सलग तीन महिने बँकांना कर्ज वसूल न करण्याचे आदेश दिले होते. बँकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले, मात्र तीन महिन्यांनंतर कर्जदारांकडून व्याजासकट रकमा वसूल करायला सुरुवात केली. त्यामुळे रिक्षाचालकांनी कर्जामध्ये भरलेले पैसे व्याजावर गेलेले आहेत. आता उरलेली मुद्दल आणि व्याज भरणे त्यांना शक्य नसल्याने शासनाने या लॉकडाऊनच्या काळामध्ये व्याज आणि मुद्दल माफ करावे, अशीदेखील रिक्षाचालकांची मागणी आहे.

कोट

शासनाने जाहीर केलेली मदत अजून मिळालेली नाही. सध्या रिक्षाला व्यवसाय नसल्याने शासनाने मदत करण्याची घोषणा केल्याने दिलासा मिळाला होता; परंतु अद्याप मदत दिलेली नसल्याने चिंता वाटते.

- राजाराम पवार

सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रशासनाने लोकांना बाहेर पडण्याची मुभा दिलेली आहे. अकरानंतर कारवाई केली जात असल्याने बाहेर रिक्षा फिरवणेदेखील कठीण आहे. त्यामुळे शासनाने घोषणा केल्याप्रमाणे मदत द्यावी.

- साहेबराव पवार

रोज रिक्षा स्टॅन्डवर जाऊन उभा राहतो, मात्र अनेकदा बोहनी होत नाही. दवाखान्यात जाणारे पेशंट यांचे भाडे कधीतरी मिळते. कर्जाचे हप्ते थकले आहेत. शासनाने लॉकडाऊन काळातील कर्जाची माफी द्यावी तरच लोक सावरतील.

- मंगेश बारटक्के

रोज लवकर रिक्षा लावली तरी भाडे मिळत नाही. ओळखीचे लोक फोनवरून संपर्क साधून बोलावतात, तेवढाच व्यवसाय होतो. मात्र इतर वेळी घरात बसून राहावे लागत आहे. शासनाने दीड हजार रुपये देण्याचे मान्य केले. आता लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे.

- सुनील प्रभाळे

रिक्षाचा प्रतीकात्मक फोटो वापरणे