शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

आॅनलाईन कर्जमाफी यादीतून कोरेगाव तालुक्यातील तीन गावे गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 14:05 IST

वाठार स्टेशन : शासनाच्या कर्जमाफीत रोज नवनवीन गोंधळ ऐकायला मिळत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज आॅनलाईन भरण्याचे काम सुरूअसताना कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोली हे तीन  गावेच यादीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

ठळक मुद्देकोरेगाव तालुक्यातील तीन गावे पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोलीमधील ग्रामस्थांत नाराजीएकसारख्या नावांच्या गावांना फटका

वाठार स्टेशन : शासनाच्या कर्जमाफीत रोज नवनवीन गोंधळ ऐकायला मिळत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज आॅनलाईन भरण्याचे काम सुरूअसताना कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोली हे तीन  गावेच यादीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजना अमलात आणली. पण याबाबत असलेल्या चुकीच्या निकषामुळे शेतकरी योजनेबाबत उदासिन आहेत. कर्जमाफीत सरकारने कर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकºयाच्या वारसालासुध्दा यातुन वगळले आहे. एवढेच नाही तर पती किंवा पत्नी वारलेली असेल तर त्यांनाही यातून वगळले आहे. नियमीत कर्जदार ही कर्जमाफी निकषाबाहेर कसे राहतील अशा पध्दतीचे काम यामाध्यमातून केले आहे.

शेतकरी संघटना, आघाडी सरकार यांच्या दबावामुळे कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला मात्र काही दिवसांतच कर्जमाफीचा खरा चेहरा शेतकºयांसमोर आला. वेगवेगळ्या निकषांच्या कात्रित कर्जबाजारी शेतकºयाला अडकवले गेल्याने कर्जमाफिचा लाभ खरेच मिळणार काय? ही केवळ चेष्टा याचे उत्तर सर्वाना अपेक्षीत आहे.

शेतकºयांनी १ एप्रिल २००९ नंतर पीक व मध्यम मुदत कर्ज घेतले. ते ३० जून २०१६ पर्यत थकित आहे अशा शेतकºयांना दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. थकित कर्जाची रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असेल तर त्या शेतकºयांनी संपूर्ण कर्जाची रक्कम अगोदर बँकेत जमा केल्यानंतरच त्यांना दीड लाखाचा लाभ मिळणार आहे.

पीक कर्जाची परतफेड २०१५-१६ व २०१६-२०१७ मध्ये करणाºया शेतकºयांना कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजारांचा लाभ मिळणार आहे. वास्तविक सेवा सोसायट्यामार्फत कर्ज घेतलेल्या बहुतांशी शेतकºयांची कर्जे ही नियमित असल्याने त्यांना कर्जमाफिचा दीड लाखाचा लाभ मिळणार नाही. थकित संपुर्ण कर्ज भरण्यासाठी अनेकांकडे पैसे नाहीत कारण बँका त्यांना दुसरे कर्ज देण्यास तयार नाहीत.

कर्जमाफीसाठी सध्या महा-ई- सेवा केंद्रावर गर्दी होत आहे. मात्र या ठिकाणी जाताना ज्या शेतकºयाला पत्नी आहे त्यांचेच अर्ज भरुन घेतले जात आहेत. एकाच कुटुंबात चार खातेदार असतील आणी एकाचे कर्ज थकित असेल तर त्या शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही.

एकसारख्या नावांच्या गावांना फटका

सध्या आॅनलाईन अर्ज भरताना कोरेगाव तालुक्यात एकाच नावाची असलेल्या गावापैकी एकच गाव दिसत असल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे (सं) वाघोली ही तीन गावांचा समावेशच नसल्याने या गावातील शेतकºयातून या योजनेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.