शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

आॅनलाईन कर्जमाफी यादीतून कोरेगाव तालुक्यातील तीन गावे गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 14:05 IST

वाठार स्टेशन : शासनाच्या कर्जमाफीत रोज नवनवीन गोंधळ ऐकायला मिळत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज आॅनलाईन भरण्याचे काम सुरूअसताना कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोली हे तीन  गावेच यादीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

ठळक मुद्देकोरेगाव तालुक्यातील तीन गावे पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोलीमधील ग्रामस्थांत नाराजीएकसारख्या नावांच्या गावांना फटका

वाठार स्टेशन : शासनाच्या कर्जमाफीत रोज नवनवीन गोंधळ ऐकायला मिळत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज आॅनलाईन भरण्याचे काम सुरूअसताना कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोली हे तीन  गावेच यादीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजना अमलात आणली. पण याबाबत असलेल्या चुकीच्या निकषामुळे शेतकरी योजनेबाबत उदासिन आहेत. कर्जमाफीत सरकारने कर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकºयाच्या वारसालासुध्दा यातुन वगळले आहे. एवढेच नाही तर पती किंवा पत्नी वारलेली असेल तर त्यांनाही यातून वगळले आहे. नियमीत कर्जदार ही कर्जमाफी निकषाबाहेर कसे राहतील अशा पध्दतीचे काम यामाध्यमातून केले आहे.

शेतकरी संघटना, आघाडी सरकार यांच्या दबावामुळे कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला मात्र काही दिवसांतच कर्जमाफीचा खरा चेहरा शेतकºयांसमोर आला. वेगवेगळ्या निकषांच्या कात्रित कर्जबाजारी शेतकºयाला अडकवले गेल्याने कर्जमाफिचा लाभ खरेच मिळणार काय? ही केवळ चेष्टा याचे उत्तर सर्वाना अपेक्षीत आहे.

शेतकºयांनी १ एप्रिल २००९ नंतर पीक व मध्यम मुदत कर्ज घेतले. ते ३० जून २०१६ पर्यत थकित आहे अशा शेतकºयांना दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. थकित कर्जाची रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असेल तर त्या शेतकºयांनी संपूर्ण कर्जाची रक्कम अगोदर बँकेत जमा केल्यानंतरच त्यांना दीड लाखाचा लाभ मिळणार आहे.

पीक कर्जाची परतफेड २०१५-१६ व २०१६-२०१७ मध्ये करणाºया शेतकºयांना कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजारांचा लाभ मिळणार आहे. वास्तविक सेवा सोसायट्यामार्फत कर्ज घेतलेल्या बहुतांशी शेतकºयांची कर्जे ही नियमित असल्याने त्यांना कर्जमाफिचा दीड लाखाचा लाभ मिळणार नाही. थकित संपुर्ण कर्ज भरण्यासाठी अनेकांकडे पैसे नाहीत कारण बँका त्यांना दुसरे कर्ज देण्यास तयार नाहीत.

कर्जमाफीसाठी सध्या महा-ई- सेवा केंद्रावर गर्दी होत आहे. मात्र या ठिकाणी जाताना ज्या शेतकºयाला पत्नी आहे त्यांचेच अर्ज भरुन घेतले जात आहेत. एकाच कुटुंबात चार खातेदार असतील आणी एकाचे कर्ज थकित असेल तर त्या शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही.

एकसारख्या नावांच्या गावांना फटका

सध्या आॅनलाईन अर्ज भरताना कोरेगाव तालुक्यात एकाच नावाची असलेल्या गावापैकी एकच गाव दिसत असल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन, अंबवडे (सं) वाघोली ही तीन गावांचा समावेशच नसल्याने या गावातील शेतकºयातून या योजनेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.