शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे तीनतेरा ; सातारा ग्रामीण भागातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:25 IST

आजही हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी वर्ग हैराण : खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील स्थिती; संबंधित अधिकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

पुसेसावळी : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान सन्मान किसान योजना अंमलात आणली असून, यातून शेतक-यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत; पण ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये अपुºया सोयीसुविधा व कर्मचाºयांकडून होत असलेली टाळाटाळ यामुळे आजही हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

केंद्र शासनाकडून शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना निर्माण केली; पण गेल्या कित्येक महिन्यापासून या योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा होत नाहीत. यास प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.

यापूर्वी शेतक-यांनी गावामध्ये असणा-या अधिक-यांकडे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा केली होती. मात्र, ही कागदपत्रे संगणकावर भरताना संबंधित संगणक चालकाकडून अनेक शेतक-यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक तसेच बँकांची नावे चुकविलीही आहेत.

त्यामुळे आज अनेक शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात नेमलेल्या संगणक चालकांकडूनही शेतकरी वर्गाला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. तसेच संगणकावर खाते क्रमांक बदलण्याची सोय नसल्यामुळे शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे.

शेतक-यांच्या विकासासाठी असलेल्या या सन्मान योजनेचा अनेक शेतक-यांना लाभ मिळत नाही, त्यामुळे ही योजना म्हणजे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखीच झाली आहे. त्यामुळे संबंधित महसूल व ग्रामपंचायत विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

  • शासकीय कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात शेतकºयांच्या या सन्मान योजनेतील शासकीय कर्मचा-याकडून नजरचुकीने झालेल्या चुका सुधारण्यासाठी खासगी ग्राहक सेवा केंद्रात किंवा आॅनलाईन कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन ५० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

 

  • अनेक शेतक-यांची बँक खाते नंबर चुकीचे सेव्ह झालेले आहेत. तरी या शेतकºयांचे चुकलेले खाते नंबर दुरुस्त झाल्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे आॅनलाईन पोर्टलमध्ये खाते नंबर दुरुस्त करण्यासंबंधीचे अपडेट करणे गरजेचे आहे.

    -प्रशांत पिसाळ,सामाजिक कार्यकर्ते.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजना