शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे तीनतेरा ; सातारा ग्रामीण भागातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:25 IST

आजही हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी वर्ग हैराण : खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील स्थिती; संबंधित अधिकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

पुसेसावळी : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान सन्मान किसान योजना अंमलात आणली असून, यातून शेतक-यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत; पण ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये अपुºया सोयीसुविधा व कर्मचाºयांकडून होत असलेली टाळाटाळ यामुळे आजही हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

केंद्र शासनाकडून शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना निर्माण केली; पण गेल्या कित्येक महिन्यापासून या योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा होत नाहीत. यास प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.

यापूर्वी शेतक-यांनी गावामध्ये असणा-या अधिक-यांकडे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा केली होती. मात्र, ही कागदपत्रे संगणकावर भरताना संबंधित संगणक चालकाकडून अनेक शेतक-यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक तसेच बँकांची नावे चुकविलीही आहेत.

त्यामुळे आज अनेक शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात नेमलेल्या संगणक चालकांकडूनही शेतकरी वर्गाला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. तसेच संगणकावर खाते क्रमांक बदलण्याची सोय नसल्यामुळे शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे.

शेतक-यांच्या विकासासाठी असलेल्या या सन्मान योजनेचा अनेक शेतक-यांना लाभ मिळत नाही, त्यामुळे ही योजना म्हणजे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखीच झाली आहे. त्यामुळे संबंधित महसूल व ग्रामपंचायत विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

  • शासकीय कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात शेतकºयांच्या या सन्मान योजनेतील शासकीय कर्मचा-याकडून नजरचुकीने झालेल्या चुका सुधारण्यासाठी खासगी ग्राहक सेवा केंद्रात किंवा आॅनलाईन कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन ५० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

 

  • अनेक शेतक-यांची बँक खाते नंबर चुकीचे सेव्ह झालेले आहेत. तरी या शेतकºयांचे चुकलेले खाते नंबर दुरुस्त झाल्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे आॅनलाईन पोर्टलमध्ये खाते नंबर दुरुस्त करण्यासंबंधीचे अपडेट करणे गरजेचे आहे.

    -प्रशांत पिसाळ,सामाजिक कार्यकर्ते.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजना