शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे मीटर रस्त्यासाठी राजकीय आखाडा !

By admin | Updated: June 29, 2015 00:29 IST

श्रेयवादात ग्रामस्थांचे हाल : पाटणकर गटाने मंजूर केलेले काम देसाई गटाने बंद पाडले; ‘बांधकाम’चेही कानावर हात

एकनाथ माळी -तारळे -येथील बसस्थानक ते कदम हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ‘रस्ता गेला खड्यात’ म्हणण्याची वेळ आली आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे काम चुकीच्या पध्दतीने सुरू असल्याचा आरोप करीत देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी ते बंद पाडले. त्यावेळी दोन्ही गटात तु-तु मै-मै झाली. अधिकाऱ्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने राजकीय वादात तीनशे मीटर रस्त्याचा बळी जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. येवू घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तो कळीचा मुद्दा ठरणार आहे पाटण तालुक्यातील तारळे बसस्थानक ते कदम हॉस्पिटल रस्ता हा पाटण, घोट, ढोरोशी, जळव, बांबवडे, मुरूड, कडवे, सातारा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. दररोज हजारो प्रवासी, वाहने ये-जा करीत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाचा फटका मात्र सर्वांना सहन करावा लागत आहे. तेथील वाहतूकीचे अक्षरश: तीन तेरा वाजले आहेत. कदम हॉस्पिटलनजीक सुमारे एक ते दीड फूटाचा महाकाय खड्डा तयार झाला आहे. त्याठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथील मंजूर रस्ता राजकीय आखाड्यात अडकला असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्यांमधून रस्ता शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून सुमारे चाळीस लाखांंचा निधी गतवर्षी नाबार्ड योजनेतून मंजूर झाला. आर. सी. सी. गटर व १२ मीटर रस्ता होणार होता. त्यासाठी एका बाजूच्या गटाराच्या बांधकामाला प्रारंभ झाला; पण रस्त्याची आखणी चुकीच्या पध्दतीने केली आहे. अतिक्रमणाच्या मुद्याला बगल देवून कुणाचे तरी हीत साधण्यासाठी चुकीचे काम सुरू आहे, असे म्हणत अ‍ॅड. बाळासाहेब जाधव अभिजित पाटील व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम बंद पडले आहे. तारळे विभागातील लोकांच्या सोयीसाठी सुरू झालेले रस्त्याचे काम जाणूनबुजून बंद पाडले असल्याचा आरोप पाटणकर गटाने केला आहे. दोन्ही गटाच्या भांडणात रस्त्याचा मात्र बळी जावू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजकारणासाठी कायपण !तारळे ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आली आहे. त्यावेळी दोन्ही गटांकडून त्याचे राजकीय भांडवल करण्यात येणार यात शंका नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र कोणापुढे न झुकता निदान पावसाळ्यानंतर दोन्ही गटांच्या लोकांच्या म्हणण्यानुसार काम करून घ्यावे अन्यथा रस्त्यावर साठलेल्या खड्यात कोणाचा तरी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता रहदारीसाठी महत्वाचा आहे. त्यादृष्टीने विचार होण्याची खरी गरज आहे. रस्त्याचे काम विनाकारण बंद पाडले आहे. लवकर अतिक्रमण काढू म्हणणारे गेल्या सहा महिन्यांपासून चिडीचूप बसले आहेत. स्वत: काही विकासकामे करता येत नाहीत आणि आम्ही आणलेली विकासकामे काहीतरी विघ्न आणून बंद पाडण्यात येत आहेत.- सदाशिव जाधव, जिल्हा परिषद सदस्य अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू केल्यास आमचा विरोध नाही. अधिकाऱ्यांबरोबर तीन वेळा बैठक झाली; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने काही अतिक्रमणधारकांशी लागेबांधे असल्याने जाणून बुजून अतिक्रमणाला बगल दिली आहे. - अभिजित पाटील, उपतालुका प्रमुख, शंभूराज युवा संघटना