शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे मीटर रस्त्यासाठी राजकीय आखाडा !

By admin | Updated: June 29, 2015 00:29 IST

श्रेयवादात ग्रामस्थांचे हाल : पाटणकर गटाने मंजूर केलेले काम देसाई गटाने बंद पाडले; ‘बांधकाम’चेही कानावर हात

एकनाथ माळी -तारळे -येथील बसस्थानक ते कदम हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ‘रस्ता गेला खड्यात’ म्हणण्याची वेळ आली आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे काम चुकीच्या पध्दतीने सुरू असल्याचा आरोप करीत देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी ते बंद पाडले. त्यावेळी दोन्ही गटात तु-तु मै-मै झाली. अधिकाऱ्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने राजकीय वादात तीनशे मीटर रस्त्याचा बळी जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. येवू घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तो कळीचा मुद्दा ठरणार आहे पाटण तालुक्यातील तारळे बसस्थानक ते कदम हॉस्पिटल रस्ता हा पाटण, घोट, ढोरोशी, जळव, बांबवडे, मुरूड, कडवे, सातारा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. दररोज हजारो प्रवासी, वाहने ये-जा करीत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाचा फटका मात्र सर्वांना सहन करावा लागत आहे. तेथील वाहतूकीचे अक्षरश: तीन तेरा वाजले आहेत. कदम हॉस्पिटलनजीक सुमारे एक ते दीड फूटाचा महाकाय खड्डा तयार झाला आहे. त्याठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथील मंजूर रस्ता राजकीय आखाड्यात अडकला असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्यांमधून रस्ता शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून सुमारे चाळीस लाखांंचा निधी गतवर्षी नाबार्ड योजनेतून मंजूर झाला. आर. सी. सी. गटर व १२ मीटर रस्ता होणार होता. त्यासाठी एका बाजूच्या गटाराच्या बांधकामाला प्रारंभ झाला; पण रस्त्याची आखणी चुकीच्या पध्दतीने केली आहे. अतिक्रमणाच्या मुद्याला बगल देवून कुणाचे तरी हीत साधण्यासाठी चुकीचे काम सुरू आहे, असे म्हणत अ‍ॅड. बाळासाहेब जाधव अभिजित पाटील व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम बंद पडले आहे. तारळे विभागातील लोकांच्या सोयीसाठी सुरू झालेले रस्त्याचे काम जाणूनबुजून बंद पाडले असल्याचा आरोप पाटणकर गटाने केला आहे. दोन्ही गटाच्या भांडणात रस्त्याचा मात्र बळी जावू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजकारणासाठी कायपण !तारळे ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आली आहे. त्यावेळी दोन्ही गटांकडून त्याचे राजकीय भांडवल करण्यात येणार यात शंका नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र कोणापुढे न झुकता निदान पावसाळ्यानंतर दोन्ही गटांच्या लोकांच्या म्हणण्यानुसार काम करून घ्यावे अन्यथा रस्त्यावर साठलेल्या खड्यात कोणाचा तरी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता रहदारीसाठी महत्वाचा आहे. त्यादृष्टीने विचार होण्याची खरी गरज आहे. रस्त्याचे काम विनाकारण बंद पाडले आहे. लवकर अतिक्रमण काढू म्हणणारे गेल्या सहा महिन्यांपासून चिडीचूप बसले आहेत. स्वत: काही विकासकामे करता येत नाहीत आणि आम्ही आणलेली विकासकामे काहीतरी विघ्न आणून बंद पाडण्यात येत आहेत.- सदाशिव जाधव, जिल्हा परिषद सदस्य अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू केल्यास आमचा विरोध नाही. अधिकाऱ्यांबरोबर तीन वेळा बैठक झाली; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने काही अतिक्रमणधारकांशी लागेबांधे असल्याने जाणून बुजून अतिक्रमणाला बगल दिली आहे. - अभिजित पाटील, उपतालुका प्रमुख, शंभूराज युवा संघटना