शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

तीनशे मीटर रस्त्यासाठी राजकीय आखाडा !

By admin | Updated: June 29, 2015 00:29 IST

श्रेयवादात ग्रामस्थांचे हाल : पाटणकर गटाने मंजूर केलेले काम देसाई गटाने बंद पाडले; ‘बांधकाम’चेही कानावर हात

एकनाथ माळी -तारळे -येथील बसस्थानक ते कदम हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ‘रस्ता गेला खड्यात’ म्हणण्याची वेळ आली आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे काम चुकीच्या पध्दतीने सुरू असल्याचा आरोप करीत देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी ते बंद पाडले. त्यावेळी दोन्ही गटात तु-तु मै-मै झाली. अधिकाऱ्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने राजकीय वादात तीनशे मीटर रस्त्याचा बळी जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. येवू घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तो कळीचा मुद्दा ठरणार आहे पाटण तालुक्यातील तारळे बसस्थानक ते कदम हॉस्पिटल रस्ता हा पाटण, घोट, ढोरोशी, जळव, बांबवडे, मुरूड, कडवे, सातारा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. दररोज हजारो प्रवासी, वाहने ये-जा करीत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाचा फटका मात्र सर्वांना सहन करावा लागत आहे. तेथील वाहतूकीचे अक्षरश: तीन तेरा वाजले आहेत. कदम हॉस्पिटलनजीक सुमारे एक ते दीड फूटाचा महाकाय खड्डा तयार झाला आहे. त्याठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथील मंजूर रस्ता राजकीय आखाड्यात अडकला असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्यांमधून रस्ता शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून सुमारे चाळीस लाखांंचा निधी गतवर्षी नाबार्ड योजनेतून मंजूर झाला. आर. सी. सी. गटर व १२ मीटर रस्ता होणार होता. त्यासाठी एका बाजूच्या गटाराच्या बांधकामाला प्रारंभ झाला; पण रस्त्याची आखणी चुकीच्या पध्दतीने केली आहे. अतिक्रमणाच्या मुद्याला बगल देवून कुणाचे तरी हीत साधण्यासाठी चुकीचे काम सुरू आहे, असे म्हणत अ‍ॅड. बाळासाहेब जाधव अभिजित पाटील व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम बंद पडले आहे. तारळे विभागातील लोकांच्या सोयीसाठी सुरू झालेले रस्त्याचे काम जाणूनबुजून बंद पाडले असल्याचा आरोप पाटणकर गटाने केला आहे. दोन्ही गटाच्या भांडणात रस्त्याचा मात्र बळी जावू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजकारणासाठी कायपण !तारळे ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आली आहे. त्यावेळी दोन्ही गटांकडून त्याचे राजकीय भांडवल करण्यात येणार यात शंका नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र कोणापुढे न झुकता निदान पावसाळ्यानंतर दोन्ही गटांच्या लोकांच्या म्हणण्यानुसार काम करून घ्यावे अन्यथा रस्त्यावर साठलेल्या खड्यात कोणाचा तरी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता रहदारीसाठी महत्वाचा आहे. त्यादृष्टीने विचार होण्याची खरी गरज आहे. रस्त्याचे काम विनाकारण बंद पाडले आहे. लवकर अतिक्रमण काढू म्हणणारे गेल्या सहा महिन्यांपासून चिडीचूप बसले आहेत. स्वत: काही विकासकामे करता येत नाहीत आणि आम्ही आणलेली विकासकामे काहीतरी विघ्न आणून बंद पाडण्यात येत आहेत.- सदाशिव जाधव, जिल्हा परिषद सदस्य अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू केल्यास आमचा विरोध नाही. अधिकाऱ्यांबरोबर तीन वेळा बैठक झाली; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने काही अतिक्रमणधारकांशी लागेबांधे असल्याने जाणून बुजून अतिक्रमणाला बगल दिली आहे. - अभिजित पाटील, उपतालुका प्रमुख, शंभूराज युवा संघटना