शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

तीनशे मीटर रस्त्यासाठी राजकीय आखाडा !

By admin | Updated: June 29, 2015 00:29 IST

श्रेयवादात ग्रामस्थांचे हाल : पाटणकर गटाने मंजूर केलेले काम देसाई गटाने बंद पाडले; ‘बांधकाम’चेही कानावर हात

एकनाथ माळी -तारळे -येथील बसस्थानक ते कदम हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ‘रस्ता गेला खड्यात’ म्हणण्याची वेळ आली आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे काम चुकीच्या पध्दतीने सुरू असल्याचा आरोप करीत देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी ते बंद पाडले. त्यावेळी दोन्ही गटात तु-तु मै-मै झाली. अधिकाऱ्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने राजकीय वादात तीनशे मीटर रस्त्याचा बळी जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. येवू घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तो कळीचा मुद्दा ठरणार आहे पाटण तालुक्यातील तारळे बसस्थानक ते कदम हॉस्पिटल रस्ता हा पाटण, घोट, ढोरोशी, जळव, बांबवडे, मुरूड, कडवे, सातारा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. दररोज हजारो प्रवासी, वाहने ये-जा करीत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाचा फटका मात्र सर्वांना सहन करावा लागत आहे. तेथील वाहतूकीचे अक्षरश: तीन तेरा वाजले आहेत. कदम हॉस्पिटलनजीक सुमारे एक ते दीड फूटाचा महाकाय खड्डा तयार झाला आहे. त्याठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथील मंजूर रस्ता राजकीय आखाड्यात अडकला असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्यांमधून रस्ता शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून सुमारे चाळीस लाखांंचा निधी गतवर्षी नाबार्ड योजनेतून मंजूर झाला. आर. सी. सी. गटर व १२ मीटर रस्ता होणार होता. त्यासाठी एका बाजूच्या गटाराच्या बांधकामाला प्रारंभ झाला; पण रस्त्याची आखणी चुकीच्या पध्दतीने केली आहे. अतिक्रमणाच्या मुद्याला बगल देवून कुणाचे तरी हीत साधण्यासाठी चुकीचे काम सुरू आहे, असे म्हणत अ‍ॅड. बाळासाहेब जाधव अभिजित पाटील व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम बंद पडले आहे. तारळे विभागातील लोकांच्या सोयीसाठी सुरू झालेले रस्त्याचे काम जाणूनबुजून बंद पाडले असल्याचा आरोप पाटणकर गटाने केला आहे. दोन्ही गटाच्या भांडणात रस्त्याचा मात्र बळी जावू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजकारणासाठी कायपण !तारळे ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आली आहे. त्यावेळी दोन्ही गटांकडून त्याचे राजकीय भांडवल करण्यात येणार यात शंका नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र कोणापुढे न झुकता निदान पावसाळ्यानंतर दोन्ही गटांच्या लोकांच्या म्हणण्यानुसार काम करून घ्यावे अन्यथा रस्त्यावर साठलेल्या खड्यात कोणाचा तरी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता रहदारीसाठी महत्वाचा आहे. त्यादृष्टीने विचार होण्याची खरी गरज आहे. रस्त्याचे काम विनाकारण बंद पाडले आहे. लवकर अतिक्रमण काढू म्हणणारे गेल्या सहा महिन्यांपासून चिडीचूप बसले आहेत. स्वत: काही विकासकामे करता येत नाहीत आणि आम्ही आणलेली विकासकामे काहीतरी विघ्न आणून बंद पाडण्यात येत आहेत.- सदाशिव जाधव, जिल्हा परिषद सदस्य अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू केल्यास आमचा विरोध नाही. अधिकाऱ्यांबरोबर तीन वेळा बैठक झाली; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने काही अतिक्रमणधारकांशी लागेबांधे असल्याने जाणून बुजून अतिक्रमणाला बगल दिली आहे. - अभिजित पाटील, उपतालुका प्रमुख, शंभूराज युवा संघटना