शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

वीज पडल्याने तीन ठार

By admin | Updated: May 27, 2014 23:10 IST

वादळी पावसाने झोडपले : सातारा, कºहाड, फलटण, खंडाळा, वाईलाही तडाखा

सातारा/खंडाळा : सातार्‍यासह कºहाड, फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुक्यांना आज, मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपून काढले. खंडाळा तालुक्यातील धावडवाडीत वीज पडल्याने दोघे, तर कलेढोण (ता. खटाव) येथे एक मेंढपाळ असा तिघांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील हरळी येथील शिंदे यांच्या मालकीची शेतजमीन अहिरे-घाटदरे रस्त्यावर धावडवाडी हद्दीत आहे. तेथे टोमॅटोची बांधणी करण्याचे काम सुरू होते. या परिसरात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. याचवेळी शेतात काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये शेतमालक निखिल चंद्रकांत शिंदे (वय २२, रा. हरळी) व द्वारकाबाई तुकाराम बिचुकले (५५, रा. बिचुकले मळा, अहिर) यांचा मृत्यू झाला. दोघांनाही खंडाळा येथील ग्रामीण रुणालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व खंडाळा पंचायत समितीचे सदस्य रमेश धायगुडे-पाटील, तहसीलदार शिवाजीराव तळपे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन नातेवाइकांचे सांत्वन केले. (प्रतिनिधी) खटाव तालुक्यात मेंढपाळाचा मृत्यू वडूज : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील मेंढपाळ मच्छिंद्र किसन शिरतोडे (वय ५२) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कलेढोण येथील दबडे मळा नावाच्या शिवारात काही मेंढपाळांसोबत मच्छिंद्र शिरतोडे मेंढरे चरण्यासाठी गेले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक वीज गडगडल्याने सर्व मेंढपाळ एका झाडाखाली थांबले. याचवेळी, मच्छिंद्र शिरतोडे यांच्या मेंढ्या कळप सोडू लागल्याने त्यांना एकत्रित करण्यासाठी मच्छिंद्र शिरतोडे झाडाखालून निघाले असता एकदम विजेचा लोळ त्यांच्या अंगावर आला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. मच्छिंद्र शिरतोडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.