शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तब्बल एक कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रस्ते, मोऱ्या, संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, डांबरीकरण गटारे यांचे साधारण एक ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रस्ते, मोऱ्या, संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, डांबरीकरण गटारे यांचे साधारण एक कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. या नुकसानीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी उपस्थित होते.

तालुक्यात मे महिन्यात प्रारंभा पासूनच येथे पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु बुधवार, दि. १६ पासून येथे वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. शनिवारीही येथे पावसाचा जोर कायम आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, दरडीप्रमाणे रस्त्यांच्या कडेला असलेले संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, लहान लहान गटारे, रस्त्यांचे डांबरीकरण यांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी रस्ते तुटून दरीत कोसळले आहेत. दरडी कोळल्यानंतर अनेकवेळा वाहतूक बंद होते. बंद झालेली वाहतूक तातडीने सुरळीत करणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी हे तातडीने आपत्कालीन पथक घटनास्थळी रवाना करतात. वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य देतात. रस्ता तातडीने रहदारीसाठी सुरू झाल्यानंतर पुन्हा रस्त्याचे जे नुकसान झाले आहे त्याची तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतात, परंतु गेली तीन दिवसात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने सार्वजनिक विभागाची चांगलीच धावपळ झाली आहे.

तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी म्हणाले, ‘तापोळा रस्त्यावर वाघेरा फाट्याजवळ मोठी दरड कोसळली. ही दरड रस्त्यावर आली होती. तीन ठिकाणी रस्ता खचला आहे. तापोळा कोट्रोशी रस्त्याचीही अतिवृष्टीमुळे दयनीय अवस्था झाली आहे. डोंगरावरून मातीचा भराव हा मोरीमध्ये गेल्याने त्या तुंबल्या आहेत. त्यामुळे डोंगरावरून खाली येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्याबरोबर डोंगरातील माती दगड-धोंडे रस्त्यावर येत आहेत. त्यामुळेही रस्त्याचे खूप नुकसान होत आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून येणारा पाण्याचा प्रवाह मोठा आहे. रस्त्यावरील मोऱ्या या लहान पडत आहेत. कुंभरोशी, कळमगाव, कोट्रोशी, तापोळा तसेच रेणोशी ते लामज या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच भागातील शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सर्व मिळून साधारण एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.