शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तब्बल एक कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रस्ते, मोऱ्या, संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, डांबरीकरण गटारे यांचे साधारण एक ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रस्ते, मोऱ्या, संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, डांबरीकरण गटारे यांचे साधारण एक कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. या नुकसानीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी उपस्थित होते.

तालुक्यात मे महिन्यात प्रारंभा पासूनच येथे पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु बुधवार, दि. १६ पासून येथे वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. शनिवारीही येथे पावसाचा जोर कायम आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, दरडीप्रमाणे रस्त्यांच्या कडेला असलेले संरक्षक कठडे, रस्त्यांचे भराव, लहान लहान गटारे, रस्त्यांचे डांबरीकरण यांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी रस्ते तुटून दरीत कोसळले आहेत. दरडी कोळल्यानंतर अनेकवेळा वाहतूक बंद होते. बंद झालेली वाहतूक तातडीने सुरळीत करणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी हे तातडीने आपत्कालीन पथक घटनास्थळी रवाना करतात. वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य देतात. रस्ता तातडीने रहदारीसाठी सुरू झाल्यानंतर पुन्हा रस्त्याचे जे नुकसान झाले आहे त्याची तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतात, परंतु गेली तीन दिवसात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने सार्वजनिक विभागाची चांगलीच धावपळ झाली आहे.

तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी म्हणाले, ‘तापोळा रस्त्यावर वाघेरा फाट्याजवळ मोठी दरड कोसळली. ही दरड रस्त्यावर आली होती. तीन ठिकाणी रस्ता खचला आहे. तापोळा कोट्रोशी रस्त्याचीही अतिवृष्टीमुळे दयनीय अवस्था झाली आहे. डोंगरावरून मातीचा भराव हा मोरीमध्ये गेल्याने त्या तुंबल्या आहेत. त्यामुळे डोंगरावरून खाली येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्याबरोबर डोंगरातील माती दगड-धोंडे रस्त्यावर येत आहेत. त्यामुळेही रस्त्याचे खूप नुकसान होत आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून येणारा पाण्याचा प्रवाह मोठा आहे. रस्त्यावरील मोऱ्या या लहान पडत आहेत. कुंभरोशी, कळमगाव, कोट्रोशी, तापोळा तसेच रेणोशी ते लामज या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच भागातील शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सर्व मिळून साधारण एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.