शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘हाय व्होल्टेज प्रेशर’चे तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्य संख्येच्या जवळपास अडीचपट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्य संख्येच्या जवळपास अडीचपट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असताना, निवडणूक लागलेल्या गावांत ‘हाय व्होल्टेज प्रेशर’ पाहायला मिळत आहे. अर्ज माघारीसाठी साम, दाम, दंड या नीतीचा वापर केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडलेली आहे. ग्रामपंचायतींसाठी निवडून द्यायची सदस्य संख्या ७ हजार २६४ इतकी आहे. तब्बल १७ हजार ४०७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. आता सगळ्यांच्या नजरा ४ जानेवारी रोजी होणाऱ्या अर्ज माघारीकडे लागून राहिलेल्या आहेत. सध्याच्या घडीला अनेक ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे स्थानिक गट एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत, तर वाई, कऱ्हाड, माण, सातारा, जावली या तालुक्यांमध्ये भाजपनेही ‘तेल लावलेले पैलवान’ रिंगणात उतरवले आहेत.

गावातील प्रस्थापित नेतेमंडळींशी बंड करूनही काही जण लढायला उभे ठाकले आहेत. यामध्ये शेतकरी संघटना, शिवसेना या पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. काही झाले तरी कुठल्याही भूलथापा अथवा आमिषांना बळी न पडता निवडणुकीला निर्धाराने सामोरे जाणारे अपक्ष उमेदवारही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसते. आता सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिली आहे ती ४ जानेवारीची!

चौकट..

भावकीतल्या वादाला फुटले तोंड

गावा-गावांत असलेल्या भावकीच्या वादाला ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तोंड फुटलेय. या निवडणुकीत बांधावरून भांडणारे सख्खे भाऊ आता निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. इतर वेळी दोन भावांच्या भांडणात तेल ओतणारेच आता त्यांना सबुरीचा सल्ला देताना दिसत आहेत.

चौकट...

काही गावांत बिनविरोधसाठी पुढाकार

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर काही ग्रामपंचायतींमध्ये एखाद्‌दुसऱ्या जागेसाठी निवडणूक लागलेली आहे. तिथेही बिनविरोधचे प्रयत्न सुरू आहेत. भुरकवडी, नागाचे कुमठे, गाळेवाडी, गणेशवाडी, येरळवाडी, गारवडी, कणसेवाडी, गुंडेवाडी, पेडगाव (खटाव), या ग्रामपंचायती बिनविरोधच्या मार्गावर आहेत. अनेक गावांत राखीव कोट्यातील उमेदवार मिळाले नसल्याने अथवा भरलेले अर्ज अवैध ठरल्याने जागा रिक्त राहणार आहेत.

चौकट..

‘लक्ष्मीदर्शन’साठी अनेकजण व्याकूळ

अनेक गावांत हौसे-नवसे-गवसे आहेत. त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले असून, काय देता बोला... हा एकच सूर त्यांनी पॅनेल प्रमुखांकडे आळवायला सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतले जावेत, यासाठी गावातील विविध गटांची नेतेमंडळी अशा लोकांच्या घरी जाऊन समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतात जायला वाट ठेवणार नाही, परत आमच्याशीच गाठ आहे... असा दमही भरला जात आहे. त्यातूनही अनेक उमेदवार ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याशिवाय माघार नाही, असा हट्ट धरून बसलेले आहेत.

चौकट..

अर्ज भरल्यापासून अनेकजण गायब

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. २३ ते ३१ डिसेंबर या कालावधित उमेदवारी अर्ज भरण्यात आले. आता नेत्यांचा दबाव गृहित धरून अनेकजण गावातून निघून गेले आहेत. अनेकजण तीर्थयात्रेवर गेल्याचे समजते, तर अनेकांना पर्यटनाची संधीही मिळाली आहे. प्रवास, हॉटेलचे बुकिंग आधीच तयार होते. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक ट्रॅव्हल्स थेट तहसील कार्यालयासमोरच येऊन थांबण्याची शक्यता आहे.