शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

मलमपट्टीअभावी चिघळते जखम!

By admin | Updated: October 8, 2015 21:56 IST

पदाधिकाऱ्यांनी घेतला अनुभव : कोरेगाव ग्रामपंचायतीमधील राजकारणावरून येतोय जिल्ह्याचा अंदाज

सातारा : कुठलीही जखम चिघळण्याआधी तिच्यावर मलमपट्टी केल्यास दुखणे वाढत नाही. कोरेगाव ग्रामपंचायतीत गेल्या काही काळात ‘महाभारत’ घडत असताना जिल्हा परिषद पदाधिकारी अनभिज्ञ होते काय?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.राज्यातील सत्ता गमावलेल्या राष्ट्रवादी व काँगे्रस या पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकआधी गावागावांत होणाऱ्या या जखमांवर इलाज न केल्यास सत्ता गमावण्याचा ‘रोग’ बळावू शकतो, असा अंदाज राजकीय अभ्यासक सांगतात.कोरेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जगताप यांचे निधन झाल्यानंतर कोरेगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक संघटना यांच्यातील धुमसणारा वाद समोर आला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात कर्मचारी काम करायलाच घाबरतात. स्थानिक राजकारणामुळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, पाणीपुरवठा कर्मचारी, क्लार्क, शिपाई यांना त्रासाला सामोरे जावे लागते. गावात दोन गट असतील तर वॉर्डात कामे वळविण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच अनेक गावांत पाहायला मिळते. विकासकामांच्या बाबतीत आग्रह धरणे ईष्ट असले तरी कर्मचाऱ्यांना दहशतीत ठेवणे, हे कुठल्या नियमात बसते?कर्मचारी चांगले काम करत नसतील, तर त्यांना कायदेशीर मार्गाने समज देण्याचे अधिकार ग्रामपंचायत कायद्यात आहेत. मात्र, परस्परांतील राजकारणाच्या ‘हुतूतू’ मध्ये कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्याची संधी राजकीय पदाधिकारी सोडत नाहीत, हे कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये घडलेल्या महाभारतातून समोर आले. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन पक्षांकडेच बहुतांश संस्थांच्या राजकारणाचे दोर आहेत. लोकशाहीत एकाच पक्षाकडे सत्ता अनेक काळ राहिली तर त्यात स्वैराचार माजू शकतो. राजकारण व्यक्तिकेंद्रित बनून दलालांचे फावते. या दलालांच्या डोक्यावर वरिष्ठांचे हात असले की त्यांना चेव येत असतो. हाच स्वैराचार जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माजला आहे काय?, असाही प्रश्न यानिमित्ताने पुढे येऊ लागला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, विकास सेवा सोसायट्या, सहकारी बँका, पतसंस्थांमध्ये ही मस्तवाल वृत्ती वाढीला लागली आहे.राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसाठी हा चिंतनाचा विषय आहे. जिल्ह्यातल्या ७११ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. १४ व्या वित्त आयोगानुसार ग्रामपंचायतींनाच निधी खर्च करण्याचे अधिकारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाले आहेत. साहजिकच जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील पदाधिकाऱ्यांनाच जास्त महत्त्व आल्याने मधल्या काळात अनेकांनी निवडणुकीचा सट्टा खेळला. या खेळात पैशांचा पाऊसही पाडला. आता पावसाचे हे पाणी आपल्या शेताकडे वळविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. अशावेळी ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या ग्रामसेवकांना दमबाजी करून नियमबाह्य कामे करण्यासाठी भाग पाडले जाऊ शकते.ग्रामपंचायतींची मातृसंस्था म्हणून जिल्हा परिषदेची जबाबदारी वाढलेली आहे. ग्रामपंचायतींमध्ये नियमबाह्य कामांना खतपाणी घालण्याचा प्रकार होत असेल तर त्यावर अंकुश ठेवायला हवा. जखम चिघळण्याआधीच त्यावर मलमपट्टी केली नाही, तर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात दोन दिवसांपूर्वी जशी हमरी-तुमरी माजली, तसे पुढे होणार नाही. (प्रतिनिधी)ग्रामविकास अधिकारी अजूनही हजर नाही!जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात दोन तास खल होऊन कोरेगाव ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी देण्याचा निर्णय झाला. मात्र, या निर्णयानंतर अजूनही ग्रामपंचायतीत नव्या ग्रामविकास अधिकाऱ्याने पाय ठेवलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या अत्यावश्यक सेवा खोळंबल्या आहेत. लोकांना दाखले मिळत नाहीत, पाणी शुद्धीकरणासाठी लागणारी तुरटी खरेदीही रखडली आहे. गेल्या १५ दिवसांपासून कोरेगाव शहरातील जनता अस्वस्थ आहे. नवीन ग्रामसेवकही दीर्घ रजेवर गेल्याची माहिती पुढे येत आहे.