शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वळवानं तोंड फिरविलं... ... उन्हानं अंग करपलं !

By admin | Updated: May 27, 2016 22:20 IST

कुठे दडलाय पाऊस? : मान्सून अंदमानात; पण जिल्ह्यात केवळ काळ्या नभाच्या वाकुल्या--दुष्काळी व्यथा...

सातारा : मे महिना अखेरपर्यंत वळवाने सातारकरांना केवळ वाकुल्या दाखविल्या. काळे ढग जमून आले; पण कुठेतरी नुसते ‘भुंरगाट’ पडले, याने ना पिण्याच्या पाण्याची सोय झाली, ना रानातले नांगरटीचे ढेकूळ फुटले! ४२ अंशावर गेलेल्या पाऱ्यामुळे अंग करपून निघाले, कवी कल्पनेतल्या चातक पक्ष्यासारखी जिल्ह्यातल्या लोकांची अवस्था होऊन बसली असून, पाऊस कुठे दडून बसलाय?, असा प्रश्न जो-तो विचारत आहे.जिल्ह्यावर न भूतो...न भविष्यती, अशा दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. १९७२ मध्येही जेवढा नव्हता, त्यापेक्षाही मोठा व भयानक दुष्काळ पडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. महाबळेश्वर तालुका वगळता इतर तालुक्यांत अगदी तुरळक पाऊस झाल्याने खरीप पिके उन्मळून पडली आहेत. दुष्काळी भागातील तलाव कोरडे पडले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला असल्याने माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांवर स्थलांतराची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने बांधावर, माळरानावर गवतच उगवले नसल्याने चाराटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. फलटण तालुक्यात सर्वात कमी ९४.६ मिमी इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात पावसाची सरासरी ३८२ मिमी इतकी आहे. सरासरीच्या केवळ २४ टक्के पाऊस या तालुक्यात झालेला आहे. त्या खालोखाल कोरेगाव तालुक्यात १८०.४ मिमी म्हणजे सरासरीच्या २८ टक्के पाऊस झाला आहे.वळवाने दुष्काळी भागात काही ठिकाणी हजेरी लावली, जलयुक्त शिवारच्या कामांमुळे काही ठिकाणी बंधारे भरले; पण वळीव पाऊस सर्वत्र सारखा पडत नसल्याने एका गावात पाणी तर लगतच्या गावात कोरड, अशी वस्तुस्थिती आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात धरणे आहेत, या धरणांतून पिण्याच्या पाण्याची सोय झाली, आता मात्र ही धरणेही तळ गाठू लागली आहेत. या परिसरात वळवाने हुलकावणी दिली असल्याने धरणे कोरडी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. नैऋत्य मान्सूनने अंदमानमध्ये हजेरी लावली, तो पुढे सरकत केरळमार्गे देशात दाखल होईल, तोपर्यंत पाण्यावाचून तगमग कायम राहणार आहे, याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही.(प्रतिनिधी)नशिवारं मोकळी...पाण्याअभावी अनेक ठिकाणी द्राक्ष, डाळिंबाच्या बागा करपून गेल्या. सर्वात जास्त पाणी लागणारे उसाचे पीकही अल्प प्रमाणात उरले आहे. शिवारं मोकळी ठाक पडली आहेत. उन्हाळी पिके तर झालीच नाहीत. नांगरटीचे ढेकूळही अद्याप फुटलेले नाहीत. आता खरिपाची पेरणी कशी होणार?, हा प्रश्न आहे.