शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वळवानं तोंड फिरविलं... ... उन्हानं अंग करपलं !

By admin | Updated: May 27, 2016 22:20 IST

कुठे दडलाय पाऊस? : मान्सून अंदमानात; पण जिल्ह्यात केवळ काळ्या नभाच्या वाकुल्या--दुष्काळी व्यथा...

सातारा : मे महिना अखेरपर्यंत वळवाने सातारकरांना केवळ वाकुल्या दाखविल्या. काळे ढग जमून आले; पण कुठेतरी नुसते ‘भुंरगाट’ पडले, याने ना पिण्याच्या पाण्याची सोय झाली, ना रानातले नांगरटीचे ढेकूळ फुटले! ४२ अंशावर गेलेल्या पाऱ्यामुळे अंग करपून निघाले, कवी कल्पनेतल्या चातक पक्ष्यासारखी जिल्ह्यातल्या लोकांची अवस्था होऊन बसली असून, पाऊस कुठे दडून बसलाय?, असा प्रश्न जो-तो विचारत आहे.जिल्ह्यावर न भूतो...न भविष्यती, अशा दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. १९७२ मध्येही जेवढा नव्हता, त्यापेक्षाही मोठा व भयानक दुष्काळ पडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. महाबळेश्वर तालुका वगळता इतर तालुक्यांत अगदी तुरळक पाऊस झाल्याने खरीप पिके उन्मळून पडली आहेत. दुष्काळी भागातील तलाव कोरडे पडले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला असल्याने माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांवर स्थलांतराची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने बांधावर, माळरानावर गवतच उगवले नसल्याने चाराटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. फलटण तालुक्यात सर्वात कमी ९४.६ मिमी इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात पावसाची सरासरी ३८२ मिमी इतकी आहे. सरासरीच्या केवळ २४ टक्के पाऊस या तालुक्यात झालेला आहे. त्या खालोखाल कोरेगाव तालुक्यात १८०.४ मिमी म्हणजे सरासरीच्या २८ टक्के पाऊस झाला आहे.वळवाने दुष्काळी भागात काही ठिकाणी हजेरी लावली, जलयुक्त शिवारच्या कामांमुळे काही ठिकाणी बंधारे भरले; पण वळीव पाऊस सर्वत्र सारखा पडत नसल्याने एका गावात पाणी तर लगतच्या गावात कोरड, अशी वस्तुस्थिती आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात धरणे आहेत, या धरणांतून पिण्याच्या पाण्याची सोय झाली, आता मात्र ही धरणेही तळ गाठू लागली आहेत. या परिसरात वळवाने हुलकावणी दिली असल्याने धरणे कोरडी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. नैऋत्य मान्सूनने अंदमानमध्ये हजेरी लावली, तो पुढे सरकत केरळमार्गे देशात दाखल होईल, तोपर्यंत पाण्यावाचून तगमग कायम राहणार आहे, याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही.(प्रतिनिधी)नशिवारं मोकळी...पाण्याअभावी अनेक ठिकाणी द्राक्ष, डाळिंबाच्या बागा करपून गेल्या. सर्वात जास्त पाणी लागणारे उसाचे पीकही अल्प प्रमाणात उरले आहे. शिवारं मोकळी ठाक पडली आहेत. उन्हाळी पिके तर झालीच नाहीत. नांगरटीचे ढेकूळही अद्याप फुटलेले नाहीत. आता खरिपाची पेरणी कशी होणार?, हा प्रश्न आहे.