शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
3
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
4
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
5
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
6
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
7
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
8
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
9
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
10
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
12
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
13
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
14
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
15
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
16
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
17
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
18
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
19
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
20
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

त्यांना जमतेय... मग यांना काय होतेय?

By admin | Updated: August 6, 2015 20:40 IST

साताऱ्यातील चित्र : व्यवसायाच्या नावाखाली हव्यात मोक्याच्या जागा

सातारा : ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे कारणे देऊन नगर पालिकेने नुकतेच राजवाडा परिसारतील फळ विक्रेत्यांसमोर लोटांगण घातले. आणि लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले फ्रूट मार्केट तसेच पडून राहिले. या उलट पालिका प्रशासनाचा आदेश मानून पंचायत समितीच्या आड रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून फळविक्रेते आणि अलीकडेच आलेले स्वेटर व्यावसायिक त्यांचा व्यवसाय करत आहे. ‘त्यांना जमतयं... तर यांना का जमत नाही?,’ असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.सातारा शहरात शिस्तीचा प्रश्न येतो तेव्हा रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांविषयी चर्चा रंगते. गरिबांवर अन्याय नको, त्यांच्या व्यवसायावर परिणाम नको, ही भूमिका रास्त आहे. पण, प्रशस्त जागेत त्यांची सोय करूनही जर मुख्य रस्त्यावरच व्यवसाय होतो, हे म्हणणे पटत नाही.फळविक्रेते कुठेही बसले तरी त्यांच्याकडे ग्राहक येतो, हे सत्य कोणीच नाकारणार नाही. ग्राहक सेवेचा हा व्यवसाय असल्यामुळे ग्राहकांची पाठ अशी फिरत नाही. भाजी आणि फळे एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहक खूश असायला हवेत.राजवाडा परिसरातील फळ विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. पुढील सप्ताहात याविषयी एक महत्त्वपूर्ण बैठक पालिका आणि फेरीवाला संघटनेत होणार आहे. या बैठकीनंतर त्यांना कोणती जागा द्यायची, हे स्पष्ट होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राजवाडासमोर फळविक्रेते बसणार नाहीत. भविष्यात राजवाडा परिसर नो पार्किंग आणि नो हॉकर झोन होणार आहे. त्यामुळे येथे फळ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी मज्जाव करण्यात येणार आहे. - अभिजीत बापट, मुख्याधिकारी, नगर पालिका, साताराचार ठिकाणे... चार निर्णय! शहराच्या विकासाआड आलेल्यांची गय करू नका, असे फर्मान सोडत लोकप्रतिनिधींनी अतिक्रमणांविषयीची आपली भूमिका काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केली होती. त्यामुळे स्टॅण्ड परिसरातील रस्ता अतिक्रमण मुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे पंचायत समितीच्या बोळात फळ आणि स्वेटर विक्रेत्यांना जागा देऊन प्रशासनाने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.एवढेच काय जिल्हा परिषद परिसरात असलेल्या चायनिज व्यावसायिकांना तंबी देऊन सरळ करण्यात आले; पण राजवाडा फळ विक्रेत्यांजवळ आलं की, विकासाचं घोडं आडलं! ते का आडलं? याचे उत्तर एकच लोकप्रतिनिधीमुळे! शहराच्या तीन टोकांवर विकासाचा डंका पिटून स्थिर झालेल्या व्यावसायिकांना त्यांचा उद्योग हलवण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना राजवाडा व्यावसायिकांचे असे कोणते दु:ख दिसले की, त्यांना शहराच्या विकासापेक्षाही त्यांच्या व्यवसायाचा कळवळा आला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.