शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

एप्रिलमध्ये आंदोलनाची ठिणगी पडेल

By admin | Updated: March 25, 2016 00:05 IST

राजू शेट्टी : पार्लेत ‘स्वाभिमानी’च्या शेतकऱ्यांचा आनंदोत्सव मेळावा

कोपर्डे हवेली : ‘गळीत हंगाम सुरू होताना आंदोलनाला पूरक परिस्थिती नव्हती. पाणीटंचाईने शेतकरी अडचणीत होता. त्यामुळे आम्ही आंदोलनाची चढाई केली नाही. सध्या एफआरपीनुसार शेतकऱ्यांना ८० टक्के रक्कम मिळाली आहे. २० टक्के रक्कम येणे बाकी आहे. सध्या साखरेचे दर वाढले आहेत. त्यासाठी सहकार मंत्र्यांना भेटणार असून, यातूनही साखर सम्राटांनी काहीच ऐकले नाही तर एप्रिल महिन्यात पुन्हा आंदोलन करणार आहे,’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.पार्ले, ता. कऱ्हाड येथे स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांचा आनंदोत्सव मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश नलवडे, कऱ्हाड उत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन नलवडे, विनायक भोसले, रामभाऊ रैनाक, भरत चव्हाण, धनाजी शिंदे, साखर खोत, वसंतराव चव्हाण, देवानंद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.खासदार शेट्टी म्हणाले, ‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कारखानदारी मोडीत काढली आहे. तर सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण झाले आहे. आम्ही आमच्या तत्वापासून बाजूला नाही. सर्वांनी ही चळवळ पुढे नेली पाहिजे. गेल्या पाच वर्षांपासून बऱ्याच प्रमाणात कारखान्याकडून चोरी करण्याचे मार्ग बंद करीत आणले आहे. धन, दौलतीपेक्षा माझे कार्यकर्तेच माझी मोठी संपत्ती आहे.’सदाभाऊ खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या चळवळीमुळे शेतकऱ्यांना साखरेसह उपपदार्थ मिळणाऱ्या पैशाचा हिशेब कळू लागला आहे. कारखानदार हुकूमशहा पद्धतीने वागत आहे. कारखानदारी हेच त्यांचे वतन आहे. पारंपरिक लोकच या ठिकाणी कायम बसले आहेत. साखरेच्या वाढीव दरासाठी आपणाला दुसरे आंदोलन करावे लागणार आहे. उसाबरोबर दूध धंदा तोट्यात सुरू आहे. त्यासाठी दूध शासनाने खरेदी केले पाहिजे. संघटनेच्या ताकदीमुळे आणि सहकाऱ्यांना उसाचे थकित पैसे मिळाले. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा उभा केला,’ असे प्रतिपादन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.शेवटी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी संघटनेची शपथ घेतली. सचिन नलवडे यांनी प्रास्ताविक केले. संदीप पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)