शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्ये आंदोलनाची ठिणगी पडेल

By admin | Updated: March 25, 2016 00:05 IST

राजू शेट्टी : पार्लेत ‘स्वाभिमानी’च्या शेतकऱ्यांचा आनंदोत्सव मेळावा

कोपर्डे हवेली : ‘गळीत हंगाम सुरू होताना आंदोलनाला पूरक परिस्थिती नव्हती. पाणीटंचाईने शेतकरी अडचणीत होता. त्यामुळे आम्ही आंदोलनाची चढाई केली नाही. सध्या एफआरपीनुसार शेतकऱ्यांना ८० टक्के रक्कम मिळाली आहे. २० टक्के रक्कम येणे बाकी आहे. सध्या साखरेचे दर वाढले आहेत. त्यासाठी सहकार मंत्र्यांना भेटणार असून, यातूनही साखर सम्राटांनी काहीच ऐकले नाही तर एप्रिल महिन्यात पुन्हा आंदोलन करणार आहे,’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.पार्ले, ता. कऱ्हाड येथे स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांचा आनंदोत्सव मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश नलवडे, कऱ्हाड उत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन नलवडे, विनायक भोसले, रामभाऊ रैनाक, भरत चव्हाण, धनाजी शिंदे, साखर खोत, वसंतराव चव्हाण, देवानंद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.खासदार शेट्टी म्हणाले, ‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कारखानदारी मोडीत काढली आहे. तर सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण झाले आहे. आम्ही आमच्या तत्वापासून बाजूला नाही. सर्वांनी ही चळवळ पुढे नेली पाहिजे. गेल्या पाच वर्षांपासून बऱ्याच प्रमाणात कारखान्याकडून चोरी करण्याचे मार्ग बंद करीत आणले आहे. धन, दौलतीपेक्षा माझे कार्यकर्तेच माझी मोठी संपत्ती आहे.’सदाभाऊ खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या चळवळीमुळे शेतकऱ्यांना साखरेसह उपपदार्थ मिळणाऱ्या पैशाचा हिशेब कळू लागला आहे. कारखानदार हुकूमशहा पद्धतीने वागत आहे. कारखानदारी हेच त्यांचे वतन आहे. पारंपरिक लोकच या ठिकाणी कायम बसले आहेत. साखरेच्या वाढीव दरासाठी आपणाला दुसरे आंदोलन करावे लागणार आहे. उसाबरोबर दूध धंदा तोट्यात सुरू आहे. त्यासाठी दूध शासनाने खरेदी केले पाहिजे. संघटनेच्या ताकदीमुळे आणि सहकाऱ्यांना उसाचे थकित पैसे मिळाले. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा उभा केला,’ असे प्रतिपादन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.शेवटी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी संघटनेची शपथ घेतली. सचिन नलवडे यांनी प्रास्ताविक केले. संदीप पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)