शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

उन्हाचा फटका, आकाशात उडणारे पक्षी जमिनीवर लागले कोसळू

By प्रगती पाटील | Updated: April 24, 2024 18:11 IST

उन्हाची तीव्रता वाढली : पाणवठेही कोरड ठाक

सातारा : उष्माघाताचा फटका माणसांबरोबरच पक्ष्यांनाही बसु लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातारा शहर व परिसरात उष्माघाताने पक्षी जमिनीवर कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. उन्हाची तिव्रता आणि निर्जलिकरणामुळे हे पक्षी कोसळत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. धक्कादायक बाब म्हणजे पशुपक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी मिळावे यासाठी तयार करण्यात आलेले पाणवठे कोरडे ठाक पडले आहेत. यात तातडीने पाणी भरण्यात यावे अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी गाठल्यामुळे सगळ्यांचीच लाहीलाही होत आहे. वृक्षतोड झाल्यामुळे डोंगर बोडके झाले आहेत तर सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे पक्ष्यांचा निवारा हिरावला गेला आहे. त्यातच वाढत्या उकाड्याने निसर्गातील पाणीस्त्रोत आटून गेले आहेत. निसर्गातील पाण्याचे झरे आटल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. मानवी वस्तीत वास्तव्यास असणारे पक्षीही अन्न व पाण्याच्या शोधात बाहेर पडत असताना आकाशातून कोसळण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा बळीउन्हाळ्याच्या महिन्यात उष्माघात आणि डिहायड्रेशनमुळे पक्ष्यांना त्रास हाेतोच. अलिकडच्या वर्षांत उष्म्याचा पारा वाढल्याने शहरातील तापमानात वाढ होत आहे. पक्ष्यांची वाढती संख्या डिहायड्रेशन आणि उष्माघाताला बळी पडते. वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेत उडताना पक्ष्यांना झटके आणि चक्कर येण्याची शक्यता असते, ज्यामुळे अनेकदा प्राणघातक पडझड होते. बहुतेक प्रकरणांमध्ये त्यांना उष्माघात, निर्जलीकरण आणि ताप सहन करावा लागतो. शरीराचे तापमान ४५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते. यामुळे मेंदूच्या पेशी आणि महत्वाच्या अवयवांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ज्यामुळे फेफरे, कोमा आणि पक्ष्याचा अंतिम मृत्यू होतो. पक्षांना वेळेवर उपचार केल्यास तीन ते चार दिवसांत बरे होण्यास मदत होऊ शकते.

शहरांमध्ये व्हावी पक्ष्यांच्या पाण्याची सोयरस्त्याच्या कोपऱ्यांवर पक्षी पाण्याचे फीडर बसवण्यासाठी सरकारी नियमांच्या गरजेवर प्राणी हक्क कार्यकर्ते भर देतात. हे फीडर विशेषतः गरम हवामानात पाण्याचा सहज उपलब्ध स्रोत प्रदान करतात. स्वच्छ पाण्याचा नियमित प्रवेश निर्जलीकरण टाळतो, स्ट्रोक आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका कमी करतो. ही साधी तरतूद पक्ष्यांच्या लोकसंख्येला आधार देते, त्यांच्या कल्याणासाठी आणि आव्हानात्मक वातावरणात टिकून राहण्यास मदत करते.

  • शहरीकरण आणि उंच इमारतींच्या वाढीमुळे, पक्ष्यांना पाणी मिळविण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. 
  • इमारतींवरील काचेच्या पृष्ठभागावर परावर्तित होणारा सूर्यप्रकाश त्यांना विचलित करू शकतो. 
  • उन्हाळ्यात रस्त्यावरील प्राणी आणि पक्ष्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
  • फॅन्सी वॉटर फीडर खरेदी करण्याची गरज नाही. 
  • पिण्याच्या पाण्याची बाटली किंवा भांडे वापरू शकता. 
  • बाल्कनी किंवा सोसायटी गेटच्या बाहेर पक्षी आणि प्राण्यांसाठी पाणी ठेवा

उन्हाळ्याची तिव्रता लक्षता घेता वन विभागाने तातडीने पाणवठ्यांमध्ये पाणी भरणे अपेक्षित आहे. बोलु शकणाऱ्या माणसाची घरात राहून लाहीलाही होतेय तिथे या मुक्या प्राण्यांची काय गत? कोट्यावधी रूपये खर्च करून वनक्षेत्रात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले. या पाणवठ्यांमध्ये एेन उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना पाणीच मिळत नसेल तर त्यावर केलेला खर्च वायाच गेला असं म्हणावं लागेल. - सुधीर सुकाळे, ड्रोंगो पर्यावरणीय संस्था

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान