शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आनेवाडी टोलनाक्यावर कदापिही मॉल नाही!

By admin | Updated: May 29, 2015 23:45 IST

जमीन फक्त टोलनाक्यासाठी आणि नियंत्रण कार्यालय, अपघातग्रस्त मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच संपादन

मुदगल : पुणे-बंगळूर महामार्गावरील कामांबाबतच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करासातारा : राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे कामकाज जलद गतीने पुर्ण करावे, असे आदेश देत आनेवाडी व विरमाडे येथील जमीन मॉल साठी नव्हे तर फक्त टोलनाक्यासाठी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच आवश्यक असेल तेवढी संपादीत करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाबाबत उड्डाण पुलांवरील चालू असलेल्या व बंद असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.बैठकीस राजेश कुंडल (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग पुणे), भूसंपादन समन्वयचे उपजिल्हाधिकारीे अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे, वाईचे प्रांताधिकारी रविंद्र खेबुडकर, सातारा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री शिवणकर, माजी आमदार मदन भोसले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या उड्डाण पुलाचे काम चालू आहे ते जून २०१५ पूर्वी पूर्ण करुन वाहतूकीसाठी सुरु करावेत. तसेच ज्या उड्डाण पुलाची कामे अद्याप सुरु झालेली नाहीत अशी कामे तात्काळ सुरु करावीत. महामार्गाच्या सहापदरीच्या ठिकाणी दिशादर्शक किंवा वाहतूकीचे सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आनेवाडी व विरमाडे येथील टोल नाक्यासाठी जमीन संपादनाबाबत, मॉलसाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात येणार आहे अशी अफवा पसरल्याने त्याठिकाणी जमीन संपादन करण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणांत विरोध आहे. ती जमीन फक्त टोलनाक्यासाठी आणि नियंत्रण कार्यालय, अपघातग्रस्त मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच संपादन करण्यात येणार आहे.पुवीर्ची मोजणी आलेली रद्द करुन दुरुस्त मोजणी नकाशा सादर करण्यासाठी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांना सुचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी म्हणाले, आनेवाडीमधील ० हेक्टर ६२ आर आणि विरमाडेमधील एक हेक्टर १२ आर ऐवढी जमीन संपादीत करावी. विरमाडे मधील स्थानिकशेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन झालेला गैरसमज दुर करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी रविंद्र खेबूडकर यांना दिल्या. (प्रतिनिधी)उड्डाणपुलाबाबत प्रस्ताव सादर करापाचवड येथे किसनवीर सहकारी साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांकडे २५ ते ३० गांवे असल्याने पाचवड येथे उड्डाणपुल व्हावे, अशी विनंती माजी आमदार मदन भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याबाबत पोलिस यंत्रणा व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना वाहतूक व सदर रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांबाबतचा सर्व्हे करुन पाचवड या ठिकाणी उड्डाण पुला बाबत संयुक्तीक अहवाल सादर कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.