शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आनेवाडी टोलनाक्यावर कदापिही मॉल नाही!

By admin | Updated: May 29, 2015 23:45 IST

जमीन फक्त टोलनाक्यासाठी आणि नियंत्रण कार्यालय, अपघातग्रस्त मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच संपादन

मुदगल : पुणे-बंगळूर महामार्गावरील कामांबाबतच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करासातारा : राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे कामकाज जलद गतीने पुर्ण करावे, असे आदेश देत आनेवाडी व विरमाडे येथील जमीन मॉल साठी नव्हे तर फक्त टोलनाक्यासाठी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच आवश्यक असेल तेवढी संपादीत करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाबाबत उड्डाण पुलांवरील चालू असलेल्या व बंद असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.बैठकीस राजेश कुंडल (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग पुणे), भूसंपादन समन्वयचे उपजिल्हाधिकारीे अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे, वाईचे प्रांताधिकारी रविंद्र खेबुडकर, सातारा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री शिवणकर, माजी आमदार मदन भोसले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या उड्डाण पुलाचे काम चालू आहे ते जून २०१५ पूर्वी पूर्ण करुन वाहतूकीसाठी सुरु करावेत. तसेच ज्या उड्डाण पुलाची कामे अद्याप सुरु झालेली नाहीत अशी कामे तात्काळ सुरु करावीत. महामार्गाच्या सहापदरीच्या ठिकाणी दिशादर्शक किंवा वाहतूकीचे सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आनेवाडी व विरमाडे येथील टोल नाक्यासाठी जमीन संपादनाबाबत, मॉलसाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात येणार आहे अशी अफवा पसरल्याने त्याठिकाणी जमीन संपादन करण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणांत विरोध आहे. ती जमीन फक्त टोलनाक्यासाठी आणि नियंत्रण कार्यालय, अपघातग्रस्त मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच संपादन करण्यात येणार आहे.पुवीर्ची मोजणी आलेली रद्द करुन दुरुस्त मोजणी नकाशा सादर करण्यासाठी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांना सुचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी म्हणाले, आनेवाडीमधील ० हेक्टर ६२ आर आणि विरमाडेमधील एक हेक्टर १२ आर ऐवढी जमीन संपादीत करावी. विरमाडे मधील स्थानिकशेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन झालेला गैरसमज दुर करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी रविंद्र खेबूडकर यांना दिल्या. (प्रतिनिधी)उड्डाणपुलाबाबत प्रस्ताव सादर करापाचवड येथे किसनवीर सहकारी साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांकडे २५ ते ३० गांवे असल्याने पाचवड येथे उड्डाणपुल व्हावे, अशी विनंती माजी आमदार मदन भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याबाबत पोलिस यंत्रणा व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना वाहतूक व सदर रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांबाबतचा सर्व्हे करुन पाचवड या ठिकाणी उड्डाण पुला बाबत संयुक्तीक अहवाल सादर कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.