शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

‘त्यांनी’ केलेला विकास शाश्वत नाही--

By admin | Updated: January 2, 2015 00:23 IST

‘पृथ्वीराज चव्हाण सर्वांत निष्क्रिय मुख्यमंत्री’: विलासराव उंडाळकर

 कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणाला नैतिक अधिष्ठान नसल्याचा आरोपकऱ्हाड : ‘आगामी ५० वर्षांचा विचार करून कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाला आपण विकासाचे रोल मॉडेल बनविले. या मतदारसंघात नव्या आमदारांना गटारे अन् गल्लीबोळातील रस्ते वगळता करण्यासारखे काही विकासकामे ठेवलेले नाही. चव्हाण हे चार वर्षे मुख्यमंत्री होते. मात्र, नैतिक अधिष्ठान नसल्याने व दलालामार्फत राजकारण केल्याने मतदारसंघाच्या विकासासाठी शाश्वत असे काहीही करू शकले नाहीत,’ अशी टीका माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केली.नांदलापूर येथे आभार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अशोकराव थोरात, प्रा. धनाजी काटकर, अ‍ॅड. अशोक मोहिते, कऱ्हाड तालुका सहकारी खरेदीविक्री संघाचे संचालक शेखर शिर्के, विश्वास निकम, सरपंच विलास शिर्के, उपसरपंच सुरेश शिंंदे, पांडुरंग बोंद्रे, दिग्गू मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.अशोकराव थोरात म्हणाले, ‘संधीसाधू राजकारण लोकांसाठी संकट ठरते. कराडमधील शंभर फुटी रस्त्याचा प्रश्न असो, अथवा मलकापुरातील वाढीव घरपट्टी हे प्रश्न संधीसाधू राजकारणामुळेच वाढले. घरपट्टीवाढी संदर्भातील सुनावणीलाही लोकांचे म्हणणे ऐकून न घेता मनमानी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. धनाजी काटकर, विश्वास निकम यांनी मनोगत व्यक्त केले. शेखर शिर्के यांनी प्रास्ताविक केले. जयवंत शिर्के यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘पृथ्वीराज चव्हाण सर्वांत निष्क्रिय मुख्यमंत्री’उंडाळकर म्हणाले, ‘दक्षिणेत माझा पराभव झाला; पण मी पराभवाने खचलेलो नाही. मात्र, कोणत्या प्रवृत्तीचा विजय झाला व तो कसा झाला, याबाबत येथील जनतेमध्ये प्रबोधन झाले पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. चार वर्षांची सत्ता त्यांनी राजकीय जिरवाजिरवीसाठी वापरली. इतर पक्षांना संपवताना स्वत:चा पक्षही संपविला. लाचारांची फौज घेऊन फार काळ राजकारण करता येत नाही. यासाठी कार्यकर्त्यांनी राजकारणात सजग राहिले पाहिजे.’