शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

वाघनखं योग्यवेळी आली, वेळेवर उपयोग करु; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

By नितीन काळेल | Updated: July 19, 2024 19:24 IST

माझे ओरखडे बसले तर सांगताही येत नसल्याचा ठाकरेंना टोला, फडणवीस म्हणाले..

सातारा : वाघनखं आली हा अभिमानाचा दिवस आहे. पण, वाघनखांबद्दल काही लोक शंका उपस्थित करतात हे दुर्दैव आहे. चांगल्या कामाला गालबोट लावण्याचं हे काम आहे. तरीही ही वाघनखं योग्यवेळी आलीत. त्याचा योग्यवेळी वापर करु, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत. बसले तर तोंड उघडूनही सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांना लगावला. दरम्यान, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही काहींच्या बुध्दीवर बुरशी चढल्याची टीका करत विरोधकांवर घणाघात केला.सातारा जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात शिवशस्त्रशौर्यगाथा- शिवकालीन शस्त्र प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लंडनमधून वाघनखं आणून सरकारनं आपला शब्द पाळला. कारण, ही वाघनखं महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दगाबाज अफजलखानाचा कोथळा याच वाघनखानं काढला होता. वाघनखांमुळे सर्वांत आनंद दिसत आहे. पण, यावर शंका घेतली जात आहे. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शाैर्य आणि वीरतेचा अपमान केला जातोय. राज्यातील शिवभक्त हे कदापाही सहन करणार नाहीत.राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम सरकार करत आहे. महिला, शेतकरी, तरुण, विद्याऱ्थी यांच्यासाठी योजना आणल्या आहेत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, विरोधक पैसे कोठून आणणार म्हणून योजनांवर आक्षेप घेतात. तरीही आम्ही तिघांनी ठरवलं तर काहीही होतं. कारण योजनांचे पैसे वेळच्यावेळी लाभाऱ्श्यांच्या खात्यावर पोहोचतील. कारण आम्हाला वैयक्तीक स्वाऱ्थ नाही. आम्ही देणारे आहोत.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाची सुरूवात आक्रमकपणे केली. ते म्हणाले, वाघनखं आणून दर्शनासाठी खुली केली. यापेक्षा मोठे भाग्य नाही. पण, काहींचा वादविवाद करण्याचा धंदा आहे. हा काय आजचा रोग नाही. याचा छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्रास झाला. तरीही त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. येथील काहींच्या बुध्दीवर बुरशी आणि गंज चढला आहे. ते काढण्याचे काम मुख्यमंत्री नक्की करतील असा विश्वास वाटतो.

प्रतापगड विकास प्राधीकरण; १५० कोटींची तरतूद..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान राज्यातील गडकोट, किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचे काम सरकारचे असल्याचे सांगितले. तसेच प्रतापगड विकास प्राधिकारणची खासदार उदयनराजेंच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली असल्याचे सांगत त्याचा अध्यादेश दाखवला. नंतर अध्यादेश खासदार उदयनराजेंकडे देण्यात आला. तसेच यासाठी शासनाने १५० कोटींची तरतूद केल्याचेही जाहीर केले. तर संगम माहुली येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा जीर्णाेध्दारही करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

अजित पवारांचा हल्लाबोल अन् कायद्यामुळे जीव असेपर्यंत दारु उतरणार..उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकावर चांगलाच हल्लाबोल केला. तसेच वाघनखांवरुनही जोरदार फैरी झाडल्या. चांगले घडत असेल तर खोडा घालण्याचे काम करण्यात येते. त्यांना यातून काय समाधान मिळते हे माहीत नाही. अऱ्थसंकल्पातही सरकारने नवीन योजना जाहीर केल्या. चांगल्या योजना असूनही विराेधक टिका करतात. चुनावी जुमला बंद करा म्हणतात. पण, जनतेलाही खोटं कोण बोलतंय हे कळतंय, असा टोला लगावला. तसेच लोकसभेला दुर्लक्ष झालं. विधानसभेला जरा लक्ष द्या, असेही त्यांनी उपस्थितांना हसत-हसत आवाहन केले. किल्ल्यावरील मद्यप्राशनाबद्दल कडक कायदा करणार आहे. कारवाई झाली की जीव असेपर्यंत त्याची उतरलेली असेल. परत कधीच चढणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदे