शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

साखर कारखानदारांनी पहिली उचल चार हजारांवर द्यावी; शेतकरी संघटनांची बैठकीत भूमिका

By नितीन काळेल | Updated: October 7, 2024 22:04 IST

२१ आॅक्टोबरपर्यंत मुदत; तरच जिल्ह्यातील हंगाम सुरू करा  

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यावर्षीच्या गळीत हंगामात टनाला पहिली उचल चार हजार रुपयांवर द्यावी. यासाठी २१ आॅक्टोबरपर्यंत दर जाहीर करावा. अन्यथा कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करू देणार नाही. त्यासाठी संघर्ष अटळ आहे, अशी भूमिकाl शेतकरी संघटनांनी बैठकीत घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाना अधिकारी आणि शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांची ऊस दर आंदोलनाच्या निमित्ताने बैठक झाली. शेतकरी संघटनांचे राजू शेळके, अर्जून साळुंखे, मधुकर जाधव, सोनू साबळे, कमलाकर भोसले, वसीम इनामदार आदी उपस्थित होते.

शेतकरी संघटना प्रतिनिधींनी माहिती दिल्यानुसार, बैठकीत मागीलवर्षीच्या हंगामात उसाला जाहीर दरावर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी जाहीर केलेला दर एफआरपीपेक्षा जादा असलातरी तो कारखान्यांना द्यावा लागेल. तसेच कारखान्यांनी १४ दिवसानंतर शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले असतीलतर त्यासाठी कायद्याप्रमाणे व्याजासह रक्कम द्यावी. यासाठी साखर आयुक्त कार्यालयाच्या प्रतिनिधींना सूचना करण्यात आली. यासाठी यंदाच्या हंगामापूर्वी म्हणजे २१ आॅक्टोबरपर्यंत पूर्तता करावी. त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी साखर आयुक्त कार्यालयाला पत्रव्यवहार करु, असा इशाराही देण्यात आला. तसेच पुढील बैठकीला साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांनी उपस्थित रहावे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले. तर यावेळी शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांनीही यावर्षीच्या दराबाबत मागणी केली.

साताऱ्याशेजारील जिल्ह्यातील साखर कारखाने रिकव्हरी कमी असूनही उच्च दर देतात. मग, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांची रिकव्हरी एक ते दीड टक्का अधिक असते. त्यामुळे जिल्ह्यातील कारखाने दरात मागे का ? यावर्षीच्या हंगामात पहिली उचल चार हजार रुपयांवर द्यावी, अशीच आमची भूमिका राहील, असा इशारा शेतकरी संघटना प्रतिनिधींनी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर