शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पुन्हा वाढला; नवजाला ५५ मिलीमीटरची नोंद! 

By नितीन काळेल | Updated: July 11, 2024 20:41 IST

साताऱ्यात उघडीप कायम : कोयना धरणात ३३ टीएमसीवर पाणीसाठा 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेला पाऊस पुन्हा वाढू लागला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ५५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे ३० आणि महाबळेश्वरला २२ मिलीमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठाही ३३ टीएमसीवर पोहोचला आहे. तर सातारा शहरात पावसाची उघडीप कायम आहे.

जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस पडत आहे. आतापर्यंत बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला. तसेच भात लागणही जोरात सुरू आहे. त्यातच जुलै महिना सुरू झाल्यापासून पाऊस वाढला. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वी जोर कमी झाला होता. पण, बुधवारपासून पुन्हा पश्चिम भागात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत.

गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ५५ मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत १ हजार ७६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगर येथे आतापर्यंत १ हजार ५९३ तर महाबळेश्वरला १ हजार ३७४ मिलीमीटर पाऊस झाला. तसेच तीन दिवस कोयना पाणलोट क्षेत्रातही जोर कमी होता. त्यामुळे कोयना धरणातील आवक कमी झाली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ६ हजार ६२० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ३३.०३ टीएमसी झालेला. धरण भरण्यासाठी अजूनही सुमारे ७२ टीएमसी पाण्याची गरज आहे.

सातारा शहरात चार दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यानंतर सातारकरांना सूर्यदर्शनही झाले. तर माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा आदी तालुक्यात पावसाची उघडीप आहे. कधीतरी एखादी सर येऊन कोसळत आहे.

धोम, कण्हेर, तारळी धरणक्षेत्रात पावसाची पाठ...जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रमुख आणि मोठे सहा पाणीप्रकल्प आहेत. या धरणक्षेत्रातही पावसाची पाठ असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढत नाही. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणक्षेत्रातच ३० मिलीमीटर पाऊस झाला. तर बलकवडी २ आणि उरमोडी धरणक्षेत्रात १२ मिलीमीटरची नोंद झाली. पण, धोम, कण्हेर आणि तारळी धरण पाणलोट क्षेत्रात २४ तासांत काहीही पाऊस झालेला नाही. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर