शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पाऊस पुन्हा वाढला; नवजाला ५५ मिलीमीटरची नोंद! 

By नितीन काळेल | Updated: July 11, 2024 20:41 IST

साताऱ्यात उघडीप कायम : कोयना धरणात ३३ टीएमसीवर पाणीसाठा 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेला पाऊस पुन्हा वाढू लागला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ५५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे ३० आणि महाबळेश्वरला २२ मिलीमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठाही ३३ टीएमसीवर पोहोचला आहे. तर सातारा शहरात पावसाची उघडीप कायम आहे.

जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस पडत आहे. आतापर्यंत बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला. तसेच भात लागणही जोरात सुरू आहे. त्यातच जुलै महिना सुरू झाल्यापासून पाऊस वाढला. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वी जोर कमी झाला होता. पण, बुधवारपासून पुन्हा पश्चिम भागात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत.

गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ५५ मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत १ हजार ७६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगर येथे आतापर्यंत १ हजार ५९३ तर महाबळेश्वरला १ हजार ३७४ मिलीमीटर पाऊस झाला. तसेच तीन दिवस कोयना पाणलोट क्षेत्रातही जोर कमी होता. त्यामुळे कोयना धरणातील आवक कमी झाली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ६ हजार ६२० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ३३.०३ टीएमसी झालेला. धरण भरण्यासाठी अजूनही सुमारे ७२ टीएमसी पाण्याची गरज आहे.

सातारा शहरात चार दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यानंतर सातारकरांना सूर्यदर्शनही झाले. तर माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा आदी तालुक्यात पावसाची उघडीप आहे. कधीतरी एखादी सर येऊन कोसळत आहे.

धोम, कण्हेर, तारळी धरणक्षेत्रात पावसाची पाठ...जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रमुख आणि मोठे सहा पाणीप्रकल्प आहेत. या धरणक्षेत्रातही पावसाची पाठ असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढत नाही. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणक्षेत्रातच ३० मिलीमीटर पाऊस झाला. तर बलकवडी २ आणि उरमोडी धरणक्षेत्रात १२ मिलीमीटरची नोंद झाली. पण, धोम, कण्हेर आणि तारळी धरण पाणलोट क्षेत्रात २४ तासांत काहीही पाऊस झालेला नाही. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर