शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका, कोयना धरणाचा पायथा वीजगृह पडला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 10:49 IST

४० मेगावॅट वीज निर्मिती ठप्प.

निलेश साळुंखे कोयनानगर : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाला बसला आहे. पायथा गृहातून होणारी वीज निर्मिती ठप्प झाली असून वीज निर्मितीनंतर सिंचनासाठी सोडले जाणारे पाणीही बंद झाले आहे. सिंचनासाठी गरज भासल्यास बुधवारी दुपारी धरणाचे वक्र दरवाजे उघडले जाण्याची शक्यता व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आली आहे.राज्यातील ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी तसेच ४२ हजार कंत्राटी कामगार, सुरक्षारक्षकांनी ७२ तासाचा संप पुकारला आहे. त्यामुळे तीन दिवस महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता मंगळवारी रात्रीपासून वर्तवली जात होती. वीज वितरणच्या खाजगीकरणाला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात आला आहे. त्यातच महावितरणने महत्त्वपूर्ण माहिती देत संप असला तरी वीजपुरवठा सुरळीत राहील, असे आश्वासित केले होते. मात्र, बुधवारी रात्रीच संपाचा पहिला फटका कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाला बसला. पायथा वीजगृहातून प्रति सेकंद ४० मेगावॕट वीजनिर्मिती करून २१०० क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जाते.

मात्र संपामुळे बुधवारी रात्री नऊ वाजता पायथा वीजगृह बंद पडला. वीजगृहातून तयार होणारी ४० मेगावॕट वीज निर्मिती बंद झाली आहे. तसेच नदीपात्रात सोडले जाणारे २१०० क्युसेक्स पाणीही बंद करण्यात आले आहे. वीज निर्मिती बंद पडल्यामुळे त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यातच सिंचनासाठी धरणातून सोडले जाणारे पाणीही बंद झाल्याने नदीपात्राची पाणी पातळी कमी होणार आहे. सिंचनासाठी आवश्यकता भासल्यास धरणाचे वक्र दरवाजे उघडून बुधवारी दुपारनंतर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता धरण व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजStrikeसंप