शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

आपले सरकार सेवा केंद्रातील अपहार आकडा ५० लाखांवर ! 

By नितीन काळेल | Updated: September 12, 2022 19:47 IST

प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार? 

सातारा : खटाव तालुक्यात  ‘आपले सरकार सेवा केंद्र’ नावाने बनावट बँक बचत खाते काढून ४५ लाखांचा अपहार केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानंतर आता अन्य तालुक्यांतही अपहाराचा संशय असून एकूण आकडा ५० लाखांवर जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आहे. सातारा जिल्ह्यातही केंद्रे आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींनी केंद्र मोबदल्याची अग्रीम रक्कम जिल्हास्तरावरील खात्यात जमा करण्यासाठी २०१६ मध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मोबदला नावाने बँकेचे सातारा शहरात खाते उघडण्यात आले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून २०२१-२२ या वर्षासाठी एकूण मागणीपैकी १२२६ ग्रामपंचायतींची अग्रीम मागणी १० कोटी ३१ लाख ८९ हजार ४२२ होती. त्यापैकी ९ कोटी ८७ लाख ४६ हजार ६६४ इतकी रक्कम ग्रामपंचायतींनी जिल्हास्तरावरील बँक खात्यात वर्ग केलेली. परंतु ग्रामपंचायतींनी अग्रीम मागणीपेक्षा ४४ लाख ४२ हजार ७५८ रुपये कमी वर्ग केली. तसेच उर्वरित २६६ ग्रामपंचायतींची मागणी अग्रीम २ कोटी ४६ लाख २६ हजार २२९ रक्कम अद्यापही वर्ग नव्हती. त्यामुळे थकीत रकमेबाबत जिल्हास्तरावर बैठक झाली होती. 

ग्रामपंचायतनिहाय आढावा घेतला त्यावेळी खटाव तालुक्यात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. तालुका व्यवस्थापकांनाही विचारणा केली. त्यावेळी त्यांनी रक्कम वर्ग केल्याचे सांगितले होते; मात्र त्यानंतर बँक स्क्रोलनुसार ताळमेळ घातल्यावर रक्कम जुळत नसल्याचे दिसून आले. सखोल माहिती घेतल्यावर खटाव तालुक्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने बनावट बचत खाते अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले. तसेच व्यवहार पाहता तालुका व्यवस्थापकांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. 

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबत चौकशी समिती तयार केली. या समितीने तपासणी करुन अहवाल द्यायचा होता. आता ही समिती कार्यान्वित होऊन १५ दिवस होऊन गेले. तसेच या समितीलाही काही तालुक्यात किरकोळ का प्रमाणात असेना अपहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आपले सरकार सेवा केंद्रातील घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते. तसेच ४५ रुन ५० लाखांवर घोटाळ्याचा आकडा जाण्याची शक्यता आहे. बनावट बँक बचत खाते काढून ‘आपले सरकार सेवा केंद्र’मध्ये सुमारे ४५ लाखांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी खटाव तालुक्यात समोर आले आहे. आता जिल्ह्यात आणखी कोठे गैरव्यवहार झाला आहे का? यासाठी चौकशी समिती नियुक्त केली होती. काही ठिकाणी १० ते १५ हजारांपर्यंतचा अपहार दिसून आला आहे. समितीचा अंतरिम अहवाल दोन दिवसात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. विनय गौडा,मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Governmentसरकार