शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार सेवा केंद्रातील अपहार आकडा ५० लाखांवर ! 

By नितीन काळेल | Updated: September 12, 2022 19:47 IST

प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार? 

सातारा : खटाव तालुक्यात  ‘आपले सरकार सेवा केंद्र’ नावाने बनावट बँक बचत खाते काढून ४५ लाखांचा अपहार केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानंतर आता अन्य तालुक्यांतही अपहाराचा संशय असून एकूण आकडा ५० लाखांवर जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आहे. सातारा जिल्ह्यातही केंद्रे आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींनी केंद्र मोबदल्याची अग्रीम रक्कम जिल्हास्तरावरील खात्यात जमा करण्यासाठी २०१६ मध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मोबदला नावाने बँकेचे सातारा शहरात खाते उघडण्यात आले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून २०२१-२२ या वर्षासाठी एकूण मागणीपैकी १२२६ ग्रामपंचायतींची अग्रीम मागणी १० कोटी ३१ लाख ८९ हजार ४२२ होती. त्यापैकी ९ कोटी ८७ लाख ४६ हजार ६६४ इतकी रक्कम ग्रामपंचायतींनी जिल्हास्तरावरील बँक खात्यात वर्ग केलेली. परंतु ग्रामपंचायतींनी अग्रीम मागणीपेक्षा ४४ लाख ४२ हजार ७५८ रुपये कमी वर्ग केली. तसेच उर्वरित २६६ ग्रामपंचायतींची मागणी अग्रीम २ कोटी ४६ लाख २६ हजार २२९ रक्कम अद्यापही वर्ग नव्हती. त्यामुळे थकीत रकमेबाबत जिल्हास्तरावर बैठक झाली होती. 

ग्रामपंचायतनिहाय आढावा घेतला त्यावेळी खटाव तालुक्यात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. तालुका व्यवस्थापकांनाही विचारणा केली. त्यावेळी त्यांनी रक्कम वर्ग केल्याचे सांगितले होते; मात्र त्यानंतर बँक स्क्रोलनुसार ताळमेळ घातल्यावर रक्कम जुळत नसल्याचे दिसून आले. सखोल माहिती घेतल्यावर खटाव तालुक्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने बनावट बचत खाते अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले. तसेच व्यवहार पाहता तालुका व्यवस्थापकांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. 

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबत चौकशी समिती तयार केली. या समितीने तपासणी करुन अहवाल द्यायचा होता. आता ही समिती कार्यान्वित होऊन १५ दिवस होऊन गेले. तसेच या समितीलाही काही तालुक्यात किरकोळ का प्रमाणात असेना अपहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आपले सरकार सेवा केंद्रातील घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते. तसेच ४५ रुन ५० लाखांवर घोटाळ्याचा आकडा जाण्याची शक्यता आहे. बनावट बँक बचत खाते काढून ‘आपले सरकार सेवा केंद्र’मध्ये सुमारे ४५ लाखांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी खटाव तालुक्यात समोर आले आहे. आता जिल्ह्यात आणखी कोठे गैरव्यवहार झाला आहे का? यासाठी चौकशी समिती नियुक्त केली होती. काही ठिकाणी १० ते १५ हजारांपर्यंतचा अपहार दिसून आला आहे. समितीचा अंतरिम अहवाल दोन दिवसात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. विनय गौडा,मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Governmentसरकार