शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आपले सरकार सेवा केंद्रातील अपहार आकडा ५० लाखांवर ! 

By नितीन काळेल | Updated: September 12, 2022 19:47 IST

प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार? 

सातारा : खटाव तालुक्यात  ‘आपले सरकार सेवा केंद्र’ नावाने बनावट बँक बचत खाते काढून ४५ लाखांचा अपहार केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानंतर आता अन्य तालुक्यांतही अपहाराचा संशय असून एकूण आकडा ५० लाखांवर जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आहे. सातारा जिल्ह्यातही केंद्रे आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींनी केंद्र मोबदल्याची अग्रीम रक्कम जिल्हास्तरावरील खात्यात जमा करण्यासाठी २०१६ मध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मोबदला नावाने बँकेचे सातारा शहरात खाते उघडण्यात आले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून २०२१-२२ या वर्षासाठी एकूण मागणीपैकी १२२६ ग्रामपंचायतींची अग्रीम मागणी १० कोटी ३१ लाख ८९ हजार ४२२ होती. त्यापैकी ९ कोटी ८७ लाख ४६ हजार ६६४ इतकी रक्कम ग्रामपंचायतींनी जिल्हास्तरावरील बँक खात्यात वर्ग केलेली. परंतु ग्रामपंचायतींनी अग्रीम मागणीपेक्षा ४४ लाख ४२ हजार ७५८ रुपये कमी वर्ग केली. तसेच उर्वरित २६६ ग्रामपंचायतींची मागणी अग्रीम २ कोटी ४६ लाख २६ हजार २२९ रक्कम अद्यापही वर्ग नव्हती. त्यामुळे थकीत रकमेबाबत जिल्हास्तरावर बैठक झाली होती. 

ग्रामपंचायतनिहाय आढावा घेतला त्यावेळी खटाव तालुक्यात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. तालुका व्यवस्थापकांनाही विचारणा केली. त्यावेळी त्यांनी रक्कम वर्ग केल्याचे सांगितले होते; मात्र त्यानंतर बँक स्क्रोलनुसार ताळमेळ घातल्यावर रक्कम जुळत नसल्याचे दिसून आले. सखोल माहिती घेतल्यावर खटाव तालुक्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने बनावट बचत खाते अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले. तसेच व्यवहार पाहता तालुका व्यवस्थापकांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. 

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबत चौकशी समिती तयार केली. या समितीने तपासणी करुन अहवाल द्यायचा होता. आता ही समिती कार्यान्वित होऊन १५ दिवस होऊन गेले. तसेच या समितीलाही काही तालुक्यात किरकोळ का प्रमाणात असेना अपहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आपले सरकार सेवा केंद्रातील घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते. तसेच ४५ रुन ५० लाखांवर घोटाळ्याचा आकडा जाण्याची शक्यता आहे. बनावट बँक बचत खाते काढून ‘आपले सरकार सेवा केंद्र’मध्ये सुमारे ४५ लाखांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी खटाव तालुक्यात समोर आले आहे. आता जिल्ह्यात आणखी कोठे गैरव्यवहार झाला आहे का? यासाठी चौकशी समिती नियुक्त केली होती. काही ठिकाणी १० ते १५ हजारांपर्यंतचा अपहार दिसून आला आहे. समितीचा अंतरिम अहवाल दोन दिवसात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. विनय गौडा,मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Governmentसरकार