शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: फलटणमध्ये पितृपक्षानंतर मोठा राजकीय भूकंप?, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:29 IST

बड्या नेत्याचा नवा अध्याय 

विकास शिंदेफलटण : फलटणच्याराजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. पितृपक्षानंतर, म्हणजेच २२ सप्टेंबरनंतर तालुक्यात एक मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याची कुजबुज खासगीत ऐकायला मिळत आहे. एका बड्या नेत्याच्या पक्षांतराचा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला असून, हा नेता नेमका कोण, तो ज्येष्ठ आहे की उमदा तरुण, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.फलटण हे राजकारणाचे केंद्रस्थान मानले जाते, जिथे घडणाऱ्या घडामोडींचा प्रभाव राज्यावरही दिसून येतो. त्यामुळे एका बड्या नेत्याच्या पक्षांतराची चर्चा सर्वांसाठीच औत्सुक्याचा विषय ठरली आहे. राजकीय नेत्यांना एखाद्या पक्षात न्याय मिळाला नाही, कामाची संधी मिळाली नाही किंवा सत्ता मिळाली नाही, तर दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग नेहमीच खुला असतो.फलटणच्या राजकारणातही गेल्या काही दिवसांपासून सोयीचे राजकारण आणि बदललेली समीकरणे स्पष्टपणे दिसत आहेत. अनेक वर्षे ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्याशीच जुळवून घेण्याची भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसमोर तलवारी उपसून लढणाऱ्या नेत्यांनी आता जणू आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. त्यामुळे, बदलत्या परिस्थितीत हा राजकीय भूकंप अटळ असल्याचं बोललं जात आहे.

नवा अध्याय, नवी दिशा..यापूर्वीही अनेकदा अशा राजकीय भूकंपांच्या चर्चा झाल्या. तारखाही ठरल्या, मुहूर्तही काढले; पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचणींमुळे या घडामोडी पुढे ढकलल्या गेल्या. आता मात्र, वातावरण पूर्णपणे बदलले आहे. फलटणच्या विकासाची चर्चा जाणीवपूर्वक केली जात आहे आणि यामागे नव्या राजकीय रंग भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. या बदललेल्या परिस्थितीत, पितृपक्षानंतर एक नवा अध्याय घेऊन येणार असल्याचं मानलं जात आहे. हा नेता ज्येष्ठ आहे की तरुण, हे मात्र २२ सप्टेंबरनंतरच स्पष्ट होईल. या राजकीय भूकंपाची चर्चा केवळ तालुक्यातच नाही, तर संपूर्ण राज्यात उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.

तर बदलतील बरीच समीकरणेसध्याच्या पक्षात राजकीय ताकद मिळत नसल्याने तसेच मागण्यांची पूर्तता होत नसल्याने राजकीय भविष्याची चिंता लागून राहिलेले नेतृत्व मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत समझोत्याने जागावाटप होऊन राजकीय अस्थिरता थांबवण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. पितृपक्षानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडीनंतर फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी जोरदार चर्चा आहे.