शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीचे कारण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशोक गायकवाड यांची मागणी

By दीपक देशमुख | Updated: June 10, 2023 16:26 IST

युती केली म्हणजे तुमच्याकडे भांडी घासायला नाही

सातारा : उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळालेल्या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अकरा महिन्यांत बदली कशी केली जाते. बदली मागचे नेमके कारण मुख्यमंत्र्यानी जनतेला सांगावे अशी मागणी रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हाेते.

जिल्हाधिकारी जयवंशी हे सर्वसामान्यांना वेळ देणारे आणि त्यांची बाजू ऐकून घेणारे अधिकारी होते. त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी, बेकायदा बांधकामे कारवाई सूरू केली. या कारणामुळे त्यांची बदली केली असेल तर हे निंदनीय असल्याचेही ते म्हणाले. तसेच अक्षय भालेराव हत्या, बोतालजी आत्महत्या व इतर अनेक अत्याचारांच्याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा ही दिला. कोल्हापुरातील दंगलीबाबत गायकवाड म्हणाले, दंगलीने प्रश्न सुटत नाहीत. दंगलीत सर्वसामान्यांचीच घरे, दुकाने फुटतात. जे आक्षेपार्ह प्रकार करतो, त्याविरोधात प्रशासनाला धारेवर धरून कारवाईची मागणी केली होती असे मत व्यक्त केले.महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडीबाबतही त्यांनी भाष्य केले. एकेरी वाहतुकीमुळे स्थानिक, विद्यार्थ्यांना त्रास होणार असून त्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली. तसेच टोलनाक्यावरून मोठ्या प्रमाणावर टोल वसुली होत असताना त्याप्रमाणात सुविधा मिळत नाहीत. पाच सेकंदात गाडी पास झाली नाही तर टोल द्यायचा नाही, असा नियम असताना दोन-दोन कि.मी रांगा लागतात. महाबळेश्वरमधील टोलनाका बंद करण्याची मागणी त्यांनी केली. युती केली म्हणजे तुमच्याकडे भांडी घासायला नाहीअधिकाऱ्यांच्या बदलीवरून अशोक गायकवाड म्हणाले, तुमच्या सोयीसाठी व लॉबिंगसाठी अधिकारी बदलले जात असतील तर सर्वसामान्य असुक्षित होणार आहेत. आमची युती तुमच्या सोबत आहे म्हणजे आम्ही तुमच्या घरी भांडी घासायला नाही. आम्ही एका विचाराने तुमच्या सोबत आलो आहे. त्यामुळे आम्ही काही निर्णय घेतला तर तुम्हाला परवडणार नाही, असा इशाराही दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी