शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीचे कारण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशोक गायकवाड यांची मागणी

By दीपक देशमुख | Updated: June 10, 2023 16:26 IST

युती केली म्हणजे तुमच्याकडे भांडी घासायला नाही

सातारा : उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळालेल्या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अकरा महिन्यांत बदली कशी केली जाते. बदली मागचे नेमके कारण मुख्यमंत्र्यानी जनतेला सांगावे अशी मागणी रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हाेते.

जिल्हाधिकारी जयवंशी हे सर्वसामान्यांना वेळ देणारे आणि त्यांची बाजू ऐकून घेणारे अधिकारी होते. त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी, बेकायदा बांधकामे कारवाई सूरू केली. या कारणामुळे त्यांची बदली केली असेल तर हे निंदनीय असल्याचेही ते म्हणाले. तसेच अक्षय भालेराव हत्या, बोतालजी आत्महत्या व इतर अनेक अत्याचारांच्याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा ही दिला. कोल्हापुरातील दंगलीबाबत गायकवाड म्हणाले, दंगलीने प्रश्न सुटत नाहीत. दंगलीत सर्वसामान्यांचीच घरे, दुकाने फुटतात. जे आक्षेपार्ह प्रकार करतो, त्याविरोधात प्रशासनाला धारेवर धरून कारवाईची मागणी केली होती असे मत व्यक्त केले.महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडीबाबतही त्यांनी भाष्य केले. एकेरी वाहतुकीमुळे स्थानिक, विद्यार्थ्यांना त्रास होणार असून त्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली. तसेच टोलनाक्यावरून मोठ्या प्रमाणावर टोल वसुली होत असताना त्याप्रमाणात सुविधा मिळत नाहीत. पाच सेकंदात गाडी पास झाली नाही तर टोल द्यायचा नाही, असा नियम असताना दोन-दोन कि.मी रांगा लागतात. महाबळेश्वरमधील टोलनाका बंद करण्याची मागणी त्यांनी केली. युती केली म्हणजे तुमच्याकडे भांडी घासायला नाहीअधिकाऱ्यांच्या बदलीवरून अशोक गायकवाड म्हणाले, तुमच्या सोयीसाठी व लॉबिंगसाठी अधिकारी बदलले जात असतील तर सर्वसामान्य असुक्षित होणार आहेत. आमची युती तुमच्या सोबत आहे म्हणजे आम्ही तुमच्या घरी भांडी घासायला नाही. आम्ही एका विचाराने तुमच्या सोबत आलो आहे. त्यामुळे आम्ही काही निर्णय घेतला तर तुम्हाला परवडणार नाही, असा इशाराही दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी