शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीचे कारण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशोक गायकवाड यांची मागणी

By दीपक देशमुख | Updated: June 10, 2023 16:26 IST

युती केली म्हणजे तुमच्याकडे भांडी घासायला नाही

सातारा : उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळालेल्या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अकरा महिन्यांत बदली कशी केली जाते. बदली मागचे नेमके कारण मुख्यमंत्र्यानी जनतेला सांगावे अशी मागणी रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हाेते.

जिल्हाधिकारी जयवंशी हे सर्वसामान्यांना वेळ देणारे आणि त्यांची बाजू ऐकून घेणारे अधिकारी होते. त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी, बेकायदा बांधकामे कारवाई सूरू केली. या कारणामुळे त्यांची बदली केली असेल तर हे निंदनीय असल्याचेही ते म्हणाले. तसेच अक्षय भालेराव हत्या, बोतालजी आत्महत्या व इतर अनेक अत्याचारांच्याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा ही दिला. कोल्हापुरातील दंगलीबाबत गायकवाड म्हणाले, दंगलीने प्रश्न सुटत नाहीत. दंगलीत सर्वसामान्यांचीच घरे, दुकाने फुटतात. जे आक्षेपार्ह प्रकार करतो, त्याविरोधात प्रशासनाला धारेवर धरून कारवाईची मागणी केली होती असे मत व्यक्त केले.महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडीबाबतही त्यांनी भाष्य केले. एकेरी वाहतुकीमुळे स्थानिक, विद्यार्थ्यांना त्रास होणार असून त्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली. तसेच टोलनाक्यावरून मोठ्या प्रमाणावर टोल वसुली होत असताना त्याप्रमाणात सुविधा मिळत नाहीत. पाच सेकंदात गाडी पास झाली नाही तर टोल द्यायचा नाही, असा नियम असताना दोन-दोन कि.मी रांगा लागतात. महाबळेश्वरमधील टोलनाका बंद करण्याची मागणी त्यांनी केली. युती केली म्हणजे तुमच्याकडे भांडी घासायला नाहीअधिकाऱ्यांच्या बदलीवरून अशोक गायकवाड म्हणाले, तुमच्या सोयीसाठी व लॉबिंगसाठी अधिकारी बदलले जात असतील तर सर्वसामान्य असुक्षित होणार आहेत. आमची युती तुमच्या सोबत आहे म्हणजे आम्ही तुमच्या घरी भांडी घासायला नाही. आम्ही एका विचाराने तुमच्या सोबत आलो आहे. त्यामुळे आम्ही काही निर्णय घेतला तर तुम्हाला परवडणार नाही, असा इशाराही दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी