शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलन समाजाचे मन समृद्ध करते - शरणकुमार लिंबाळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:32 IST

हे संमेलन संपूर्ण जिल्ह्याची अस्मिता : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : ‘साहित्य संमेलन म्हणजे केवळ लेखकांचा उत्सव नसून तो समाजाचा आरसा आहे. १८७८ साली न्यायमूर्ती, रानडे यांनी समाजप्रबोधनाच्या हेतूने लावलेले हे रोपटे आता शंभराव्या संमेलनाकडे दिमाखात वाटचाल करत आहे. पुस्तकांमध्ये माणसाचे मन आणि पर्यायाने जग बदलण्याची ताकद असते. साताऱ्यातील साहित्य संमेलन लोकांचे, देशाचे आणि समाजाचे मन समृद्ध करण्यासाठी नक्कीच प्रेरक ठरेल,’ असा विश्वास ‘सरस्वती सन्मान’प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केला.साताऱ्यात दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ मंगळवारी (दि. १६) सकाळी शरणकुमार लिंबाळे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी संतोष पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाहक सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.लिंबाळे पुढे म्हणाले, ‘साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखकाला वाचक, प्रकाशक आणि रसिक अशा तिन्ही घटकांशी संवाद साधता येतो. हे संमेलन साहित्यिकांसाठी आत्मभान देणारे ठरेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले, तर सुनीताराजे पवार व नंदकुमार सावंत यांनी संमेलन यशस्वी करण्याची ग्वाही दिली.

हे संमेलन संपूर्ण जिल्ह्याची अस्मिता : शिवेंद्रसिंहराजे‘९९ व्या संमेलनासाठी कोल्हापूर, इचलकरंजी आणि औदुंबर यांसारख्या शहरांची नावे शर्यतीत होती. मात्र, ‘मसाप’च्या सातारा शाखेने घेतलेल्या परिश्रमांमुळे हा बहुमान सातारा नगरीला मिळाला आहे. हे संमेलन केवळ शहरापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण जिल्ह्याचे आहे. साहित्याच्या या महाकुंभात प्रत्येक जिल्हावासीयाने सहभागी व्हावे,’ असे आवाहन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.‘कृष्णकाठचा थाट’ दिसेल : प्रा. मिलिंद जोशी९८ वे संमेलन देशाच्या राजधानीत झाले होते, तर ९९ वे संमेलन छत्रपतींच्या ऐतिहासिक राजधानीत होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीत होणारे हे पहिलेच अखिल भारतीय संमेलन आहे. संमेलने केवळ आर्थिक बळावर नाही, तर समाजाच्या योगदानावर यशस्वी होतात. सातारा जिल्ह्याने या संमेलनातून कृष्णकाठचा थाट काय असतो, हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावे, असे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Literature enriches society's mind: Sharan Kumar Limbale at Sahitya Sammelan.

Web Summary : Sahitya Sammelan, more than a festival, mirrors society. Sharan Kumar Limbale inaugurated the 99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Satara, emphasizing literature's power to transform minds. Shivendrasinhraje Bhosale highlighted the event's significance for the entire district, inviting participation. Milind Joshi urged showcasing Satara's unique cultural essence.