शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

तीन दिवसांचा बंद संपला, सातारा जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायतींचा कारभार उद्यापासून सुरू होणार 

By नितीन काळेल | Updated: December 20, 2023 17:35 IST

सातारा : सरंपच, उपसरंपचांच्या मानधनात वाढ करावी, संगणक चालकांना शासनपातळीवर नियुक्ती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे १४०० ग्रामपंचायतींना ...

सातारा : सरंपच, उपसरंपचांच्या मानधनात वाढ करावी, संगणक चालकांना शासनपातळीवर नियुक्ती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे १४०० ग्रामपंचायतींना टाळा होता. यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झालेला. बुधवारी तीन दिवसांचा बंद संपला असून गुरुवारपासून गावगाडा पुन्हा  सुरू होणार आहे. यामुळे रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. तर यामध्ये सरपंच, उपसरपंचांसह संगणक चालक, ग्रामरोजगार सेवक सहभागी झाले होते.याबाबत सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना ग्रामपंचायतीच्या विविध अडचणी, मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये सरपंच मानधन १० हजार तर उपसरपंचांचे ३ हजार रुपये करावे, अशी मागणी केली होती. तसेच १५ वा वित्त आयोग निधी २०११ च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार न देता सध्याच्या लोकसंख्येवर वितरित करण्यात यावा, संगणक आॅपरेटरची नियुक्ती शासनपातळीवर करावी किंवा त्यांचे अधिकार ग्रामपंचायतीला द्यावेत. कर्जमाफी योजनेतील ५० हजार रुपये त्वरित जमा करावेत यासह आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या. यासाठी तीन दिवसांचा बंद पुकारला.सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीही या आंदोलनात सहभागी होत्या. जिल्ह्यात १४९२ ग्रामपंचायती आहेत. त्यामधील सुमारे १४०० ग्रामपंचायती सहभागी झाल्याचा अंदाज आहे. यामुळे सर्व गावगाडा ठप्प झाला. ग्रामपंचायती बंद असल्याने लोकांना वेळेत दाखलेही मिळाले नाहीत. त्यामुळे हेलपाटे मारण्याची वेळ आली. आता तीन दिवसांचा बंद संपला असून गुरुवारपासून ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सुरू होणार आहे.

ग्रामसेवकही बंदमध्ये सहभागी..महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई १३६) या बंदमध्ये सहभागी होती. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करुन पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे, अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करावी. विस्तार अधिकारीपदाची संख्या वाढविणे, कंत्राटी ग्रामसेवक भरती बंद करणे, ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधीत्व मिळावे आदी मागण्यांसाठी ग्रामसेवक बंदमध्ये सहभागी होते.

राज्य शासनाकडे आम्ही विविध मागण्या केल्या होत्या. यासाठी जिल्ह्यातील १४०० हून अधिक ग्रामपंचायती तीन दिवस बंद ठेवण्यात आलेल्या. त्यामुळे कोणतेही काम झाले नाही. शासनही मागण्यांबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे गुरुवारपासून ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सुरू होत आहे. तरीही शासनाने मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. - जितेंद्र भोसले, प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतStrikeसंप