शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंना शेतकऱ्यांच्या व्यथा काय समजणार?

By admin | Updated: October 9, 2014 23:08 IST

कार्वेत पृथ्वीराज चव्हाणांसाठी सभा : शंकरराव गोडसे यांचा सवाल

कऱ्हाड : ‘उद्धव ठाकरेंना गुळाची ढेप दिली तर हे महाशय फळ एवढे आहे, तर झाड केवढे असेल, असे म्हणतील. अशा लोकांना शेतकऱ्यांच्या व्यथा काय कळणार. त्यांच्या हाती राज्याची सूत्रे द्यायची का?,’ असा सवाल शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी केला. गोपाळनगर-कार्वे येथे कऱ्हाड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. बाबूराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंतराव जगताप, सरपंच वैभव थोरात, उपसरपंच ज्ञानदेव हुलवान, माजी उपसरपंच सुनील शिंंदे, प्रवीण पाटील, संपतराव थोरात, आरपीआयचे नेते अप्पासाहेब गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मारुती जाधव, ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव, माणिकराव थोरात, शब्बीर मुजावर, संभाजी थोरात यांची उपस्थिती होती. गोडसे म्हणाले, ‘बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर काहीना ते चार महिन्यांत परत जाणार, असे वाटले होते. परंतु चार वर्षे कधी संपली हेही त्यांनाच कळाले नाही. काँग्रेसची आघाडी तुटली ते बरे झाले. कारण गेली १५ वर्षे राज्यातील काही मतदारसंघांत हाताचे चिन्ह गायब झाले होते. आता तेच चिन्ह सर्वत्र दिसू लागले आहे. दक्षिणेचे आमदार म्हणतात की, मला बाबांनी अडकविले; परंतु जे काही बोलता ते तुम्ही सहानुभूतीसाठी बोलत आहात. दुसऱ्या भाजपच्या उमेदवाराने उत्तर व दक्षिणमधील तरुणांना व्यसनाधीन केले. या दोघांनाही जनता नाकारेल.’ आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘एकीकडे पृथ्वीराज बाबा हे विकासबाबा ठरले, तर दुसरीकडे बिसलरी बाबा आहेत. ते बिसलरीच्या पाण्याने हात धुतात. विद्यमान आमदारांचा साखर कारखाना बंद पडला़ कोयना दूध संघाचे तर त्यांनी वाटोळे केले. पृथ्वीराज चव्हाणांनी साडेतीन वर्षांत दक्षिणमध्ये विकासाची गंगा आणली. शिक्षण, आरोग्य, शेती व सोयी-सुविधा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. त्यांच्या संकल्पेनतून राजीव गांधी जीवनादायी योजनाही लोकोपयोगी ठरली आहे. तसेच १०८ व १०४ टोलफ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर अत्याधुनिक रुग्णवाहिका व रक्तपेढीची सोय झाल्याने हजारोंचे प्राण वाचले आहेत.’ संभाजी थोरात यांचे भाषण झाले. आनंदा पवार यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप जाधव यांनी स्वागत केले व आभार मानले. (प्रतिनिधी)