शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

ठाकरेंना शेतकऱ्यांच्या व्यथा काय समजणार?

By admin | Updated: October 9, 2014 23:08 IST

कार्वेत पृथ्वीराज चव्हाणांसाठी सभा : शंकरराव गोडसे यांचा सवाल

कऱ्हाड : ‘उद्धव ठाकरेंना गुळाची ढेप दिली तर हे महाशय फळ एवढे आहे, तर झाड केवढे असेल, असे म्हणतील. अशा लोकांना शेतकऱ्यांच्या व्यथा काय कळणार. त्यांच्या हाती राज्याची सूत्रे द्यायची का?,’ असा सवाल शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी केला. गोपाळनगर-कार्वे येथे कऱ्हाड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. बाबूराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंतराव जगताप, सरपंच वैभव थोरात, उपसरपंच ज्ञानदेव हुलवान, माजी उपसरपंच सुनील शिंंदे, प्रवीण पाटील, संपतराव थोरात, आरपीआयचे नेते अप्पासाहेब गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मारुती जाधव, ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव, माणिकराव थोरात, शब्बीर मुजावर, संभाजी थोरात यांची उपस्थिती होती. गोडसे म्हणाले, ‘बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर काहीना ते चार महिन्यांत परत जाणार, असे वाटले होते. परंतु चार वर्षे कधी संपली हेही त्यांनाच कळाले नाही. काँग्रेसची आघाडी तुटली ते बरे झाले. कारण गेली १५ वर्षे राज्यातील काही मतदारसंघांत हाताचे चिन्ह गायब झाले होते. आता तेच चिन्ह सर्वत्र दिसू लागले आहे. दक्षिणेचे आमदार म्हणतात की, मला बाबांनी अडकविले; परंतु जे काही बोलता ते तुम्ही सहानुभूतीसाठी बोलत आहात. दुसऱ्या भाजपच्या उमेदवाराने उत्तर व दक्षिणमधील तरुणांना व्यसनाधीन केले. या दोघांनाही जनता नाकारेल.’ आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘एकीकडे पृथ्वीराज बाबा हे विकासबाबा ठरले, तर दुसरीकडे बिसलरी बाबा आहेत. ते बिसलरीच्या पाण्याने हात धुतात. विद्यमान आमदारांचा साखर कारखाना बंद पडला़ कोयना दूध संघाचे तर त्यांनी वाटोळे केले. पृथ्वीराज चव्हाणांनी साडेतीन वर्षांत दक्षिणमध्ये विकासाची गंगा आणली. शिक्षण, आरोग्य, शेती व सोयी-सुविधा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. त्यांच्या संकल्पेनतून राजीव गांधी जीवनादायी योजनाही लोकोपयोगी ठरली आहे. तसेच १०८ व १०४ टोलफ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर अत्याधुनिक रुग्णवाहिका व रक्तपेढीची सोय झाल्याने हजारोंचे प्राण वाचले आहेत.’ संभाजी थोरात यांचे भाषण झाले. आनंदा पवार यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप जाधव यांनी स्वागत केले व आभार मानले. (प्रतिनिधी)