शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहा एकरातील पीक गव्यांकडून उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST

सणबूर : शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून डोळ्यात तेल घालून राखण केलेल्या सुमारे दहा एकरातील गव्हासह ...

सणबूर : शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून डोळ्यात तेल घालून राखण केलेल्या सुमारे दहा एकरातील गव्हासह अन्य पिकांचे शिवार गव्यांच्या कळपाने उद्ध्वस्त केले आहे. निवी (ता. पाटण) येथे घडलेल्या या घटनेने शेतकरी हतबल झाले आहेत.

सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील निवीसह लगतच्या अन्य गावांमध्ये वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतीसह पशुधन अडचणीत आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले असून, प्रतिवर्षी पडीक क्षेत्र वाढत आहे. काही शेतकरी एकत्र येऊन धाडसाने शेती करत असले तरी क्षणात होत्याचे नव्हते होत आहे. निवीतील दहा शेतकऱ्यांनाही दोन दिवसांपूर्वी रात्री असाच अनुभव आला. गावानजीक असलेल्या पट्टी नावाच्या शिवारात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दीड ते दोन महिन्यांपूर्वी गहू, कांदे, मका, वाटाणा, हरभरा आदी पिकांची लागवड केली. तसेच शेताभोवती चोहोबाजूंनी काटेरी कुंपण घातले. दररोज शेतकरी डोळ्यात तेल घालून शिवारात जागता पहारा देत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांना झोप लागली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. सर्व शेत गव्यांनी फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

विष्णू साबळे, तुकाराम साबळे, पांडुरंग साबळे, सदाशिव साबळे, शंकर साबळे, ईश्वर साबळे, झिंगूबाई साबळे, मारुती साबळे, सतीश साबळे आदी शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे.

- चौकट

वन विभागाकडून केवळ आश्वासन

जंगलालगत वसलेल्या निवी, कसणी व अन्य गावांना भेडसावणारा वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव रोखून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी वन विभागाने जंगलाच्या बाजूने सौरकुंपण घालावे किंवा चर काढावी, अशी मागणी वारंवार होत आहे. त्याबाबत वन विभागाकडूनही आश्वासन दिले जात आहे. मात्र, अद्याप कुंपण किंवा चर प्रत्यक्षात काढण्यात आलेला नाही. धोक्यात आलेली शेती आणि वाढते पडीक क्षेत्र हा त्याचाच परिणाम आहे.