शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

रस्त्यालगतच्या जागेचा मोह झाडांच्या मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:49 IST

सातारा : बोगदा सोडला की अवघ्या एक किलोमीटर अंतरावर टपोऱ्या जांभळांच्या झाडांची रांग होती. सुमारे पाच दशके या ...

सातारा : बोगदा सोडला की अवघ्या एक किलोमीटर अंतरावर टपोऱ्या जांभळांच्या झाडांची रांग होती. सुमारे पाच दशके या झाडांनी उन्हाळ्यात प्रवाशांना सावली आणि गोड जांभळे देऊन तृप्त केलं. पण रस्त्यालगत असणाऱ्या जागेचा फ्रंट या वृक्षांच्या जीवावर उठला. या रस्त्यावर आपले जेमतेम अस्तित्व टिकवून असणाऱ्या दोन-तीन झाडांचे बुंधे पेटवून दिल्याने एकेकाळी झाडांची दाट सावली असलेला हा रस्ता पूर्णपणे बोडका झाला आहे.

काही वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत जांभळं खायला जाण्याचं मुलांचं आणि अवघ्या सातारकरांचं हक्काचं ठिकाण म्हणजे डबेवाडी ! उताराने गाडी लागली गाव लागायच्या आधी टपोऱ्या जांभळांचे भले मोठी वृक्ष सावली करून प्रवाशांच्या स्वागतासाठी जणू उभे असायचे. या रस्त्यावर पन्नासहून अधिक जांभळांची झाडे वीस-वीस फुटांच्या अंतरावर होती. हातातला दगड भिरकावला की जांभळांचा सडा रस्त्यावर पडायचा; पण आत्ता येथील स्थिती पाहिली तर यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही.

उन्हाळ्याची सुट्टी लागली की, लहान मुलांचे ग्रुप या रस्त्यावर जांभळांसाठी अक्षरश: धुडगूस घालायचे. वाहनांची वर्दळही फार नसल्यामुळे येथे सुरक्षितता होती. विशेष म्हणजे या जांभळांमध्ये अजिबात तुरटपणा नव्हता. गोडीलाही ही जांभळे उत्कृष्ट होती.

मात्र, गेल्या काही वर्षांत झाडांच्या बुंध्यात आग लावून झाड पाडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारामुळे सावलीबरोबरच दर्जेदार जांभळांच्या वाणाचेही अस्तित्व या कृत्यामुळे धोक्यात आले आहे. राजरोसपणे बांधावरील झाडे जाळणाऱ्या समाजकंटकांवर वन विभागाने कारवाई करण्याची मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे.

............

वसाहत वाढली... झाडे कमी झाली !

गेल्या काही वर्षांत बोगद्याबाहेरील परिसरालाही शहरीकरणाचे रूपडे येऊ लागले आहे. या परिसरात हॉटेल्सबरोबरच घरांचीही संख्या चांगलीच वाढली आहे. अलिशान घर, अंगणात बगीचा अशा संकल्पना येथे रुजल्या; पण मानवाचा वावर येथे वाढला आणि या रस्त्यालगतच्या झाडांची संख्या झपाट्याने खालावली.

पॉईंटर :

सज्जनगड आणि ठोसेघर यापेक्षाही या परिसरात आता शैक्षणिक संकुल उभे राहिले. नैसर्गिक वरदानाबरोबरच विद्येची नवीन दालने खुली झाल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर तरुणाईची वर्दळ वाढली. या परिसरात हॉटेल, रेसॉर्ट आणि चुलीवरच्या जेवणांची लज्जत घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू झाली. त्यामुळे हा रस्ता आणि त्याच्याशेजारील जागेला सोन्याचा भाव आला. तोच या झाडांच्या मुळावर उठला.

झाड पेटविण्याचे कारण?

वन विभागाच्या कायद्यात वृक्षतोड करणाऱ्याला शिक्षा आणि आर्थिक दंड भरावा लागतो. त्यामुळे बांधावरील झाडे तोडण्यापेक्षा बुंध्यात चिंद्या कोंबून त्यावर पेट्रोल किंवा रॉकेल ओतून ही झाडे रात्रीच्या अंधारात पेटवली जातात. याविषयी वन विभागाकडे तक्रार झालीच तर बांधावरील गवताने पेट घेतला व त्यातच ही झाडे जळाली, असा बचाव करता येतो.

रात्रीत पेटवले

बोगद्याबाहेर रोज सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसभरही येथे चांगलीच वर्दळ असते. म्हणूनच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे झाडांचे बुंधे जाळण्यात आले. रात्री दहा ते अकराच्या दरम्यान हा प्रकार केला जातो. हे बुंधे ओले असल्यामुळे ते जळण्यास चांगलाच वेळ लागला. तीन-तीन दिवस बुंध्यातील आग धुमसत राहते. या धुमसणाऱ्या बुंध्यांवर पाणी ओतण्याचे कर्तव्यही कोणी केले नाही.

फोटो ओळ :

बोगदा ते डबेवाडी या रस्त्यावर पूर्वी जांभळांच्या झाडांची मोठी रांग होती. ऐन उन्हाळ्यातही या रस्त्यावर गारवा होता. वाढत्या नागरिकरणाच्या नावाखाली हा रस्ता पूर्ण बोडका झाला आहे. (जावेद खान)

....................