शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

आंतर जिल्हा बदलीनंतर शिक्षिकांना कोसळलं रडू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:08 IST

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने एकूण ३५४ शिक्षक बदलून आले आहेत. त्यापैकी हजर झालेले १४८ शिक्षकांना गुरुवारी आॅनलाइन पद्धतीने शाळा देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्रशासनाने शासन आदेशानुसार जरी आॅनलाईन प्रक्रिया राबवून दुर्गम डोंगरी शाळांचा बॅकलॉॅग भरून काढला

ठळक मुद्दे♦ आॅनलाईन बदल्या पूर्ण : १४८ शिक्षकांची यादी जाहीर♦ महिला शिक्षिकांना तरी सवलत देता येईल का,♦ मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.♦ ग्रामविकास खात्याशी चर्चा करून तोडगा काढावा,

लोकमत न्यूज नेटवर्कअसला तरी या आॅनलाइन प्रक्रियेत महिला शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होऊ लागलीय. दुर्गम डोंगरी भागात जिथं कोणतेही वाहन जाऊ शकत नाही, अशा शाळा महिलांना स्वीकाराव्या लागल्यामुळे सभागृहातच महिला शिक्षिकांना अश्रू अनावर झाले.जिल्हा परिषदेमध्ये आंतर जिल्हा बदली होऊन आलेल्या प्राथमिक शिक्षकांना गुरुवारी आॅन लाईन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, उपमुख्यकार्यकरी अधिकारी सत्यजित बढे, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, एच. एन. यादव आदी मान्यवर उपस्थित होते.बदली प्रक्रिया राबवताना जिल्हा परिषद प्रशासनाने सुरुवातीलाच सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. ही प्रक्रिया पूर्णपणे शासन आदेशानुसारच राबवली जाणार असून, प्रथम दुर्गम, डोंगरी, भागातील शाळा भरल्या जातील. त्यानुसार ही आॅन लाइन प्रक्रिया होईल, हे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट करून सर्व सूचना सभागृहातील शिक्षकांना करून प्रक्रियेस सुरुवात केली. ही प्रक्रिया करताना १२१ दुर्गम, डोंगरी शाळा,तर ० शिक्षक असलेल्या १३ शाळा या प्रथम स्क्रीनवर दाखवण्यात आल्या. व सेवाज्येष्ठता यादीनुसार शिक्षकांना आपल्या शाळा निवडण्याचा अधिकार देण्यात आला.त्यामुळे दुर्गम शाळांमधील पहिल्या फेरीतच सातारा,कोरेगाव,माण, फलटण, खटाव, खंडाळा, तालुक्यातील शाळा पूर्णपणे भरल्या गेल्या.त्यामुळे नंतरच्या टप्प्यात पाटण, महाबळेश्वर,जावळी, तालुक्यातील शाळा उरल्यामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये या बदल्यासंदर्भात नाराजी निर्माण झाली. प्रक्रिया सुरू असतानाच काही महिला शिक्षिकांनी या प्रक्रियेवर एकत्र येऊन आक्षेप नोंदवला. यावेळी काही शिक्षिकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शासन आदेशानुसारच ही प्रक्रिया सुरू असून त्यांचा आक्षेप चुकीचा असल्याचे स्पष्ट करीत पुढील प्रक्रिया पूर्ण केली.जिल्हा बदलीने हजर झालेल्या १४८ शिक्षकांना आॅन लाइन पद्धतीने जिल्हा परिषदेने पदस्थापना देऊन संबंधित शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षण अधिकारी पुनीता गुरव तसेच कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.महिला शिक्षिकांची गैरसोय दूर करावी..बदली प्रक्रियेत महिला शिक्षकांनी आपल्यावर अन्याय झाला असल्याचे मत मांडले. दहा वर्ष दुसºया जिल्ह्यात काम करून स्वजिल्ह्यात येऊनही आमची गैरसोयच झाली असल्याची भावना महिलांनी अगदी रडत-रडत मांडली. आरव, पर्वत, खिरखिंडी अशा दुर्गम शाळांवर महिला कशा काम करणार, असा प्रश्न शिक्षिकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी देशमुख, शिक्षणसभापती राजेश पवार यांच्या समोर मांडला. त्यामुळे प्रशासनाने किमान अशा दुर्गम शाळांमध्ये बदली स्वीकारलेल्या महिला शिक्षिकांना तरी सवलत देता येईल का, याबाबत ग्रामविकास खात्याशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी सर्व शिक्षिकांनी केली.दुर्गम-डोंगरी शाळांचा बॅकलॉक भरून निघालाजिल्ह्यातील पाटण, जावळी,महाबळेश्वर, अशा दुर्गम डोंगरी तालुक्यातील बहुतांश शाळा या कायमस्वरूपी रिक्तच राहतात. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी शासन आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करीत प्रथम या तालुक्यांमधील रिक्त शाळांचा बॅकलॉग भरून काढण्याच्या उद्देशाने प्रथम दुर्गम-डोंगरी आॅनलाइन प्रक्रियेत घेतल्या. त्यामुळेच अशा भागातील विद्यार्थ्यांना आता शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.