शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

तमाशा कलावंत, वगनाट्यकार रामचंद्र बनसोडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 21:30 IST

जिवंत आणि रांगड्या अभिनयातून तांबव्याचा विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांसारखी अनेक वगनाट्ये अजरामर करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत, लेखक, वगनाट्यकार रामचंद्र लक्ष्मण बनसोडे  उर्फ आर. एल. बनसोडे (वर 75) यांचे बुधवारी करवडी ता. कराड येथे दिर्घ आजाराने निधन झाले.

कराड : जिवंत आणि रांगड्या अभिनयातून तांबव्याचा विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांसारखी अनेक वगनाट्ये अजरामर करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत, लेखक, वगनाट्यकार रामचंद्र लक्ष्मण बनसोडे  उर्फ आर. एल. बनसोडे (वर 75) यांचे बुधवारी करवडी ता. कराड येथे दीर्घ आजाराने निधन झाले. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर यांचे ते पती होत.करवडी (ता. कराड) येथील रामचंद्र लक्ष्मण बनसोडे यांनी त्यांच्या पत्नी मंगला बनसोडे यांच्या बरोबरीने 1980 च्या दशकात तमाशा फडाची उभारणी करून श्रीगणेशा केला होता. विठाबाई भाऊ मांग नारारणगावकर यांची कन्या असलेल्या  मंगला बनसोडे यांच्या जोडीने हा तमाशा अल्पावधीतच लोकप्रिय  झाला तो रामचंद्र बनसोडे यांच्या सत्य घटनेवर आधारीत आणि धार्मिक, ऐतिहासिक वगनाट्यामुळे. 1984 च्या दरम्यान रामचंद्र बनसोडे यांनी स्वतंत्र तमाशा काढल्यानंतर बनसोडे यांनी लेखन केलेल्या वगनाट्याच्या जोरावरच हा तमाशा राज्यभर नावाजला गेला. कृष्णा काठचा फरारी, जन्मठेप कुंकवाची, भक्त प्रल्हाद, येथे नांदते मराठेशाही, बाळू मामाची मेंढरं, वहिणी आमची मायेची या वगनाट्यांचे त्यांनी लेखन केले. सत्य  घटनेवर आधारीत वगनाट्य ही मंगला बनसोडे तमाशा मंडळाची खासियत होती. रामचंद्र बनसोडे यांनी बापू बिरू वाटेगावकर, तांबव्याचा विष्णू बाळा, कारगिलच्या  युद्ध ज्वाला,  हर्षद मेहता, राजीव गांधी हत्याकांड, देव चोरला जेजुरीचा, अनिल डोंबे खून खटला या सत्य घटनेवर आधारीत वगनाट्यांचे लेखन केले होते. ही वगनाट्ये राज्यभर गाजली. सत्य घटनेवर आधारीत लेखनामुळे त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. तमाशा फडावर हल्ला, कनाती पेटवणे आणि धमकी या सर्व अडचणींना तोंड देत बनसोडे यांनी तमाशा कलेची सेवा सुरूच ठेवली होती. तांबव्याचा विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर या वगनाट्याने राज्यभर गर्दीचा उच्चांक गाठला. तमाशा रसिक फक्त ही वगनाट्ये पाहण्यासाठी येत असत. बापू बिरू वाटेगावकर वगनाट्याचे लेखन करण्यासाठी रामचंद्र बनसोडे यांनी राज्य शासनाची परवानगी घेवून तुरूंगात वाटेगावकर सोबत चार दिवस मुक्काम केला होता.विष्णू बाळाचे लेखन करण्यासाठी बनसोडे हे तांबवे येथे आण्णा बाळा यांच्या घरी अनेक दिवस मुक्कामी होते. मुलगा नितीन बनसोडे यांना तमाशा फडावर आणण्यासाठी त्यांनी भक्त प्रल्हाद या नाटकाचे लेखन केले होते. कृष्णा काठचा फरारी, तांबव्याचा विष्णू बाळा, बापू बिरू वाटेगावकर या वगनाट्यातील त्यांचा अभिनयाला तमाशा रसिकांनी मोठी दाद दिली होती. गेले काही दिवस रामचंद्र बनसोडे हे आजारपणामुळे अंथरूणावर होते. त्यांच्यावर कराड, मिरज, पुणे येथे उपचारही करण्यात आले. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या दरम्यान मंगला बनसोडे आणि नितीन बनसोडे अहमदनगर येथे तमाशा कार्यक्रम करत होते. दरम्यान रामचंद्र बनसोडे यांच्या पश्चात पत्नी मंगला बनसोडे, मुलगा अनिल व नितीन, मुलगी लक्ष्मी, तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. रामचंद्र बनसोडे यांच्या पार्थिवावर करवडी येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.