शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

औद्योगिक प्रकल्पांमुळेच तालुक्याची भरभराटी होईल : विजय शिवतारे

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

दुष्काळी कलंक पुसण्यासाठी खटाव-माण तालुक्यांतील औद्योगिक धोरण गतीने राबविणे काळाची गरज

वडूज : ‘या भागाचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी खटाव-माण तालुक्यांतील औद्योगिक धोरण गतीने राबविणे काळाची गरज असून, सुरू असलेल्या औद्योगिक प्रकल्पांमुळेच खटाव-माण तालुक्यांची भरभराटी होईल,’ असा ठाम विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. पिंगळी, ता. माण येथील माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सह. सूतगिरणीच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, माजी सभापती धर्मराज जगदाळे, सुभाष जगदाळे, मोहन जगदाळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पवार, युवराज जगदाळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘माण-खटाव या दोन्ही तालुक्यांचा भौगोलिक अभ्यास करून रणजितसिंह देशमुख या युवकाने औद्योगिक क्रांती घडवली आहे. अत्याधुनिक मशनरी असलेली ही सूतगिरणी राज्याला आदर्श ठरणार असून, येथील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव व रोजगार उपलब्ध होणार आहे.’ रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री यांच्याकडे पूर्णपणे विकासाचा दृष्टिकोन असल्यानेच खटाव-माण तालुक्यांतील सिंचन योजना मार्गी लागून औद्योगिक प्रकल्पांना नवे बळ मिळणार आहे. शिवसेना-भाजप युतीच्या काळातच या दोन्ही प्रकल्पांना मान्यता मिळून हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे समाधान आपणास आहे. पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिदिन १५ टन उत्पादन निघते.’ यावेळी जनरल मॅनेजर सयाजी सुर्वे, टेक्निकल जनरल मॅनेजर हर्षल देशपांडे, चीफ अकौउंटंट हणमंत सावंत, इलेक्ट्रिक इंजिनिअर संतोष कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)