शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या :  संतोष धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:27 IST

: टँकर फिडिंग पॉर्इंटमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर द्यावा, कुठल्याही परिस्थितीत जनतेला अशुद्ध पाणी जाऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी शासकीय यंत्रणेला केल्या. माण तालुक्यात तीन ठिकाणांहून पाणी घेऊन ते दुष्काळी गावांना टँकरने पुरविले जाते. तसेच माण तालुक्यांतील विविध गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देटँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या : संतोष धोत्रेमाण तालुक्यातील पाणी टंचाईचा घेतला आढावा

म्हसवड : टँकर फिडिंग पॉर्इंटमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर द्यावा, कुठल्याही परिस्थितीत जनतेला अशुद्ध पाणी जाऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी शासकीय यंत्रणेला केल्या.माण तालुक्यात तीन ठिकाणांहून पाणी घेऊन ते दुष्काळी गावांना टँकरने पुरविले जाते. तसेच माण तालुक्यांतील विविध गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेचा लाभ जनतेला योग्य पद्धतीने मिळतोय का? याची माहिती घेण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी मंगळवारी माण तालुक्याचा दौरा केला.ढाकणी, पिंगळी खुर्द आणि पिंगळी बुद्रुक या तीन फिडिंग पॉर्इंटमधून टँकरमध्ये पाणी भरले जाते. तब्बल ७० टँकरमध्ये या फिडिंग पॉर्इंटमधून पाणी घेतले जाते. जनतेला पाणी पुरविण्याआधी ते योग्य प्रकारे शुद्ध करण्यात यावे. याबाबत शासकीय यंत्रणेने तपासणी करावी, तसेच टँकरच्या जेवढ्या खेपा मंजूर आहेत, तेवढ्या रोजच्या रोज झाल्या पाहिजेत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना धोत्रे यांनी यावेळी केल्या. टँकरमधून पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धताही त्यांनी तपासली.यानंतर भाटकी (ता. माण) येथील जनावरांच्या छावणीत जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. छावणीतील पाणी व्यवस्था, चारा, सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा याची पाहणी त्यांनी केली. या छावणीमध्ये १ हजार २३ जनावरे असल्याची माहिती मिळाली. जनावरांना योग्य चारा, पाणी मिळते का? अशी विचारणा त्यांनी शेतकºयांना केली. दुष्काळी उपाययोजना राबविताना अडचणी येऊ देणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.दुष्काळग्रस्तांशी साधला संवादसंतोष धोत्रे यांनी भाटकी येथील जनावरांच्या चारा छावणीत दुष्काळी जनतेशीही संवाद साधला. लोकांकडून दुष्काळाची तीव्रता त्यांनी जाणून घेतली. यावेळी लोकांनी दुष्काळामुळे हतबलता वाढल्याचे सांगितले. शासनाने टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर