शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
3
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
4
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
5
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
6
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
7
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
8
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
9
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
10
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
11
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
12
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
13
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
14
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
15
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
16
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
17
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
18
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
19
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
20
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या :  संतोष धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:27 IST

: टँकर फिडिंग पॉर्इंटमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर द्यावा, कुठल्याही परिस्थितीत जनतेला अशुद्ध पाणी जाऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी शासकीय यंत्रणेला केल्या. माण तालुक्यात तीन ठिकाणांहून पाणी घेऊन ते दुष्काळी गावांना टँकरने पुरविले जाते. तसेच माण तालुक्यांतील विविध गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देटँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या : संतोष धोत्रेमाण तालुक्यातील पाणी टंचाईचा घेतला आढावा

म्हसवड : टँकर फिडिंग पॉर्इंटमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर द्यावा, कुठल्याही परिस्थितीत जनतेला अशुद्ध पाणी जाऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी शासकीय यंत्रणेला केल्या.माण तालुक्यात तीन ठिकाणांहून पाणी घेऊन ते दुष्काळी गावांना टँकरने पुरविले जाते. तसेच माण तालुक्यांतील विविध गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेचा लाभ जनतेला योग्य पद्धतीने मिळतोय का? याची माहिती घेण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी मंगळवारी माण तालुक्याचा दौरा केला.ढाकणी, पिंगळी खुर्द आणि पिंगळी बुद्रुक या तीन फिडिंग पॉर्इंटमधून टँकरमध्ये पाणी भरले जाते. तब्बल ७० टँकरमध्ये या फिडिंग पॉर्इंटमधून पाणी घेतले जाते. जनतेला पाणी पुरविण्याआधी ते योग्य प्रकारे शुद्ध करण्यात यावे. याबाबत शासकीय यंत्रणेने तपासणी करावी, तसेच टँकरच्या जेवढ्या खेपा मंजूर आहेत, तेवढ्या रोजच्या रोज झाल्या पाहिजेत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना धोत्रे यांनी यावेळी केल्या. टँकरमधून पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धताही त्यांनी तपासली.यानंतर भाटकी (ता. माण) येथील जनावरांच्या छावणीत जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. छावणीतील पाणी व्यवस्था, चारा, सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा याची पाहणी त्यांनी केली. या छावणीमध्ये १ हजार २३ जनावरे असल्याची माहिती मिळाली. जनावरांना योग्य चारा, पाणी मिळते का? अशी विचारणा त्यांनी शेतकºयांना केली. दुष्काळी उपाययोजना राबविताना अडचणी येऊ देणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.दुष्काळग्रस्तांशी साधला संवादसंतोष धोत्रे यांनी भाटकी येथील जनावरांच्या चारा छावणीत दुष्काळी जनतेशीही संवाद साधला. लोकांकडून दुष्काळाची तीव्रता त्यांनी जाणून घेतली. यावेळी लोकांनी दुष्काळामुळे हतबलता वाढल्याचे सांगितले. शासनाने टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर