शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

सातारकरांनो आरोग्य सांभाळा; जुलै वाढवू लागलाय ‘ताप’..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा : पावसाळ्यात कमाल तापमान २५ अंशाच्या खाली येते. पण, मागील काही दिवसांत पावसाची दडी असल्याने जुलै महिन्यातच कमाल ...

सातारा : पावसाळ्यात कमाल तापमान २५ अंशाच्या खाली येते. पण, मागील काही दिवसांत पावसाची दडी असल्याने जुलै महिन्यातच कमाल तापमान ३२ अंशावर गेले. यामुळे पावसाळ्यात उन्हाचा चटका जाणवला. परिणामी बदलत्या हवामानामुळे आरोग्य सांभाळण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे जाते. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचा विचार करता कमाल तापमान ४२ अंशावर पोहोचले होते. पण, यंदा उन्हाळा जाणवलाच नाही. कारण, कमाल तापमानाने एकदाही ४० अंशाचा टप्पा पार केला नाही. त्यातच यावर्षी वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे कमाल पारा २५ अंशाच्याही खाली आला होता. पण, गेल्या काही दिवसांत पावसाने दडी मारली. त्यामुळे कमाल तापमान वाढत गेले. दुपारच्या सुमारास ऊन पडत होते. तसेच उकाडाही चांगलाच जाणवला. रात्रीच्या वेळी तर पंखे सुरू करुन झोपण्याची वेळ नागरिकांवर आली होती.

हवामान विषयक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पावसात अनेक दिवस खंड पडला. तर अशी स्थिती अनुभवास मिळते. त्यामुळे आताही जुलै महिन्यात कमाल तापमान वाढल्याचे दिसून आले. यामुळे पिकांवरही याचा परिणाम होतो. तसेच वैद्यकीय तज्ञ सांगतात या वातावरणामुळे किरकोळ आजार वाढतात.

चौकट :

सरासरी तापमान ५ अंशाची वाढ...

जुलै महिन्यात चांगला पाऊस होतो. त्यामुळे कमाल तापमान हे २५ अंशापेक्षा कमी राहते. यावर्षी मात्र; २० दिवस पावसाने दडी मारली. वातावरण कोरडे होते. त्यामुळे कमाल तापमान ३२ अंशावर गेले होते. सरासरी ५ अंशाची वाढ झाली.

साताºयातील कमाल तापमाने असे :

दि. २५ जून २७.०३, २६ जून ३०, २७ जून २६.०२, २८ जून ३१.०४, २९ जून ३१.०६, ३० जून ३०.०८, दि. १ जुलै २९.०९, २ जुलै २९.०८, ३ जुलै ३१.०५, ४ जुलै ३२.०४, ५ जुलै ३२.०४, ६ जुलै ३२.०१, दि. ७ जुलै ३२.०२, ८ जुलै ३०.०५ आणि ९ जुलै २७.०६

..................................................

१२ दिवस उनाची तीव्रता...

- जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाची उघडीप राहिली. जवळपास २० दिवस पावसात खंड होता. त्यामुळे २६ जूनपासून ८ जुलैपर्यंत उनाची तीव्रता जाणवली.

- या १२ दिवसांत सातारा शहरातील कमाल तापमान बहुतांशीवेळा ३० अंशाच्या पुढेच होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागला.

- मागील दोन दिवसांपासून मान्सूनचा पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे कमाल तापमान कमी होत चालले आहे. सध्या ३० अंशाच्या खाली पारा आहे.

..............................................................

असे नोंद झाले जुलैत तापमान

३२.०४- २०२१

३१.०८-२०२०

३२.०५-१९९९

३३.०५-१९९८

३३.०५-१९९५

३२.०५-१९९३

३२.०५-१९९२

...........................

प्रतिक्रिया...

जून महिन्यात पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यानंतर उन्हाचा चटका वाढला. त्यातच आता ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पाऊसही पडतोय. त्यामुळे सततच्या हवामान बदलाने सर्दी, तापसारखे आजार होऊ शकतात. नागरिकांनी अशा काळात आरोग्याची काळजी घ्यावी, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

.......................................

हवामानातील बदलामुळे जगातील बहुतेक देशात जुलै महिन्यात उष्णतेच्या लाटा येत आहेत. परंतु, ही स्थिती नेहमीच अशी राहत नाही. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने हवेतील उकाड्यात वाढ झाली. त्यामुळे जुलै महिन्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही वाढ खरीप पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. बदलत्या हवामानाचे ते एक निर्देशक आहे.

- प्रा. डॉ. सुभाष कारंडे

..............................................................