शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सातारकरांनो आरोग्य सांभाळा; जुलै वाढवू लागलाय ‘ताप’..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा : पावसाळ्यात कमाल तापमान २५ अंशाच्या खाली येते. पण, मागील काही दिवसांत पावसाची दडी असल्याने जुलै महिन्यातच कमाल ...

सातारा : पावसाळ्यात कमाल तापमान २५ अंशाच्या खाली येते. पण, मागील काही दिवसांत पावसाची दडी असल्याने जुलै महिन्यातच कमाल तापमान ३२ अंशावर गेले. यामुळे पावसाळ्यात उन्हाचा चटका जाणवला. परिणामी बदलत्या हवामानामुळे आरोग्य सांभाळण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे जाते. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचा विचार करता कमाल तापमान ४२ अंशावर पोहोचले होते. पण, यंदा उन्हाळा जाणवलाच नाही. कारण, कमाल तापमानाने एकदाही ४० अंशाचा टप्पा पार केला नाही. त्यातच यावर्षी वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे कमाल पारा २५ अंशाच्याही खाली आला होता. पण, गेल्या काही दिवसांत पावसाने दडी मारली. त्यामुळे कमाल तापमान वाढत गेले. दुपारच्या सुमारास ऊन पडत होते. तसेच उकाडाही चांगलाच जाणवला. रात्रीच्या वेळी तर पंखे सुरू करुन झोपण्याची वेळ नागरिकांवर आली होती.

हवामान विषयक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पावसात अनेक दिवस खंड पडला. तर अशी स्थिती अनुभवास मिळते. त्यामुळे आताही जुलै महिन्यात कमाल तापमान वाढल्याचे दिसून आले. यामुळे पिकांवरही याचा परिणाम होतो. तसेच वैद्यकीय तज्ञ सांगतात या वातावरणामुळे किरकोळ आजार वाढतात.

चौकट :

सरासरी तापमान ५ अंशाची वाढ...

जुलै महिन्यात चांगला पाऊस होतो. त्यामुळे कमाल तापमान हे २५ अंशापेक्षा कमी राहते. यावर्षी मात्र; २० दिवस पावसाने दडी मारली. वातावरण कोरडे होते. त्यामुळे कमाल तापमान ३२ अंशावर गेले होते. सरासरी ५ अंशाची वाढ झाली.

साताºयातील कमाल तापमाने असे :

दि. २५ जून २७.०३, २६ जून ३०, २७ जून २६.०२, २८ जून ३१.०४, २९ जून ३१.०६, ३० जून ३०.०८, दि. १ जुलै २९.०९, २ जुलै २९.०८, ३ जुलै ३१.०५, ४ जुलै ३२.०४, ५ जुलै ३२.०४, ६ जुलै ३२.०१, दि. ७ जुलै ३२.०२, ८ जुलै ३०.०५ आणि ९ जुलै २७.०६

..................................................

१२ दिवस उनाची तीव्रता...

- जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाची उघडीप राहिली. जवळपास २० दिवस पावसात खंड होता. त्यामुळे २६ जूनपासून ८ जुलैपर्यंत उनाची तीव्रता जाणवली.

- या १२ दिवसांत सातारा शहरातील कमाल तापमान बहुतांशीवेळा ३० अंशाच्या पुढेच होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागला.

- मागील दोन दिवसांपासून मान्सूनचा पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे कमाल तापमान कमी होत चालले आहे. सध्या ३० अंशाच्या खाली पारा आहे.

..............................................................

असे नोंद झाले जुलैत तापमान

३२.०४- २०२१

३१.०८-२०२०

३२.०५-१९९९

३३.०५-१९९८

३३.०५-१९९५

३२.०५-१९९३

३२.०५-१९९२

...........................

प्रतिक्रिया...

जून महिन्यात पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यानंतर उन्हाचा चटका वाढला. त्यातच आता ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पाऊसही पडतोय. त्यामुळे सततच्या हवामान बदलाने सर्दी, तापसारखे आजार होऊ शकतात. नागरिकांनी अशा काळात आरोग्याची काळजी घ्यावी, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

.......................................

हवामानातील बदलामुळे जगातील बहुतेक देशात जुलै महिन्यात उष्णतेच्या लाटा येत आहेत. परंतु, ही स्थिती नेहमीच अशी राहत नाही. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने हवेतील उकाड्यात वाढ झाली. त्यामुळे जुलै महिन्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही वाढ खरीप पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. बदलत्या हवामानाचे ते एक निर्देशक आहे.

- प्रा. डॉ. सुभाष कारंडे

..............................................................